शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

लपलेले चेहरे दिसू लागले, वाढदिवस, उपक्रम वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:37 IST

अंबेजोगाई : नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्याची चाहूल आता शहरवासीयांनाही लागली आहे. गेल्या अनेक वर्षांत न फिरकणारे नगरसेवकही खडबडून जागे ...

अंबेजोगाई : नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्याची चाहूल आता शहरवासीयांनाही लागली आहे. गेल्या अनेक वर्षांत न फिरकणारे नगरसेवकही खडबडून जागे झाले आहेत. या निमित्ताने आता रखडलेल्या समस्याही ऐरणीवर आल्या आहेत, तर अनेकांनी आता विविध उपक्रम व कार्यक्रम सुरू केले आहेत.

कोरोनामुळे गेले दीड वर्षे ठप्प राहिले. अंबेजोगाई शहर एप्रिल व मे महिन्यांत कोरोनाचे हॉटस्पॉट राहिले. शहरात हजारो जणांना कोरोनाची बाधा झाली, तर शेकडो जणांचा बळी गेला. जून-जुलैपासून परिस्थिती नियंत्रणात आली. अनेक कुटुंबांवर संकटांचा डोंगर कोसळला. यात अनेक जण सावरले, पण कुटुंबातील सदस्य गमावल्याची रुखरुख आजही अनेकांच्या मनात आहे. अशा कठीण प्रसंगांत कोण कोणाच्या मदतीला धावून आले, कोणाची मदत कशी झाली, कोणी कोणाला बगल दिली. या सर्व गोष्टींची उकल आता सुरू झाली आहे. शासनाने कडक निर्बंध दूर करून, बाजारपेठेसह अनेक गोष्टी खुल्या केल्या आहेत. त्यातच न्यायालयानेही आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेवर घ्या, असे शासनाला सुचविल्याने नगरपरिषदेच्या निवडणुका लवकरच लागतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

डिसेंबर महिन्यात नगरपरिषदेचा कालावधी संपतो. जर निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या, तर तीन महिन्यांत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच कमी झालेले निर्बंधामुळे अनेकांनी १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कामाची सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांनंतर या वर्षीचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होताना दिसला, तर आता इच्छुकांचे वाढदिवसही जोरात होऊ लागले आहेत. शहरात हळूहळू बॅनरबाजी जोर धरू लागली आहे. वाढदिवसानिमित्त जेवणावळी वाढल्या आहेत. प्रभागात रखडलेली कामे, निर्माण झालेल्या समस्याही अचानक ऐरणीवर आल्या आहेत, तर राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकही आता दररोज नगरपरिषद कार्यालयात दिसू लागले आहेत. एकूणच राजकीय वातावरण निर्माण होऊ लागले आहे. शहरातही आता नगरपरिषद निवडणुकीबाबत चर्चा होऊ लागली आहे. नवीन इच्छुकांनीही कोणी सेवेच्या तर कोणी बॅनरबाजीच्या माध्यमातून आपण भावी उमेदवार आहोत, अशी आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकंदरीत दीड वर्षापासून झालेले शांततामय वातावरण मात्र आता राजकीय रंग घेऊ लागले आहे.