शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

औषधांसाठीची हेल्पलाईनच ‘डेड’; ७०० तक्रारी; एकीचीही दखल नाही

By सोमनाथ खताळ | Updated: October 7, 2023 05:19 IST

सरकारी दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्व औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर दिली.

सोमनाथ खताळ

बीड : सरकारी दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्व औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर दिली. जर असे केले नाही तर १०४ क्रमांकावर तक्रारी करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

म्हटले होते.  स्वातंत्र्य दिनापासून आतापर्यंत ७०० तक्रारी टोल फ्री क्रमांकावर आल्या आहेत. याची कसलीही दखल घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. रुग्णांना खासगी मेडिकलमधूनच औषध खरेदी करावी लागत आहेत.

१५ ऑगस्टपासून सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये औषध-गोळ्यांसह तपासणी व उपचार मोफत करण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांपुढे रांगा लागत आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्यांपैकी मोजक्याच गोळ्या सरकारी दवाखान्यात मिळत आहेत. इतर औषधे खासगीतून विकत घ्यावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे.  त्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत.

‘लोकमत’ने काय पाहिले...

बीड जिल्हा रुग्णालयात २९ ऑगस्ट रोजी तरुणीचे पोट दुखत असल्याने तपासणी करण्यात आली. त्यात २ गोळ्या तिला दिल्या. इतर दोन नाहीत असे सांगण्यात आले. म्हणून तिच्या नातेवाइकांनी १०४ क्रमांकावर कॉल केला. परंतु, अद्यापही याची कसलीही दखल घेतलेली नाही. ऑक्टोबरमध्ये याची विचारणा केल्यावर अद्याप माहिती मिळाली नाही, असे सांगण्यात आले.

बीड रुग्णालयातच ऑक्टोबरमध्ये एका तरुणाला पाच प्रकारची औषधे दिली. यातील दोन मिळाली तर तीन मिळाली नाहीत. याचीही तक्रार १०४ वर केली. परंतु, त्याचीही कसलीच दखल घेतली नाही. 

१०४ टोल फ्री क्रमांक नावालाच

औषधे मिळत नाहीत म्हणून १०४ या टोल फ्रीवर तक्रारी करण्यास सांगितले, परंतु त्या तक्रारी निकाली निघाल्या का? याचा कसलाही आढावा घेतला जात नाही. केवळ टोल फ्री क्रमांक देऊन शासन हात झटकत आहे.