शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

औषधांसाठीची हेल्पलाईनच ‘डेड’; ७०० तक्रारी; एकीचीही दखल नाही

By सोमनाथ खताळ | Updated: October 7, 2023 05:19 IST

सरकारी दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्व औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर दिली.

सोमनाथ खताळ

बीड : सरकारी दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्व औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर दिली. जर असे केले नाही तर १०४ क्रमांकावर तक्रारी करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

म्हटले होते.  स्वातंत्र्य दिनापासून आतापर्यंत ७०० तक्रारी टोल फ्री क्रमांकावर आल्या आहेत. याची कसलीही दखल घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. रुग्णांना खासगी मेडिकलमधूनच औषध खरेदी करावी लागत आहेत.

१५ ऑगस्टपासून सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये औषध-गोळ्यांसह तपासणी व उपचार मोफत करण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांपुढे रांगा लागत आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्यांपैकी मोजक्याच गोळ्या सरकारी दवाखान्यात मिळत आहेत. इतर औषधे खासगीतून विकत घ्यावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे.  त्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत.

‘लोकमत’ने काय पाहिले...

बीड जिल्हा रुग्णालयात २९ ऑगस्ट रोजी तरुणीचे पोट दुखत असल्याने तपासणी करण्यात आली. त्यात २ गोळ्या तिला दिल्या. इतर दोन नाहीत असे सांगण्यात आले. म्हणून तिच्या नातेवाइकांनी १०४ क्रमांकावर कॉल केला. परंतु, अद्यापही याची कसलीही दखल घेतलेली नाही. ऑक्टोबरमध्ये याची विचारणा केल्यावर अद्याप माहिती मिळाली नाही, असे सांगण्यात आले.

बीड रुग्णालयातच ऑक्टोबरमध्ये एका तरुणाला पाच प्रकारची औषधे दिली. यातील दोन मिळाली तर तीन मिळाली नाहीत. याचीही तक्रार १०४ वर केली. परंतु, त्याचीही कसलीच दखल घेतली नाही. 

१०४ टोल फ्री क्रमांक नावालाच

औषधे मिळत नाहीत म्हणून १०४ या टोल फ्रीवर तक्रारी करण्यास सांगितले, परंतु त्या तक्रारी निकाली निघाल्या का? याचा कसलाही आढावा घेतला जात नाही. केवळ टोल फ्री क्रमांक देऊन शासन हात झटकत आहे.