शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

विजेच्या लपंडावाने आंबेवडगावात पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:34 IST

धारूर : तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भागात रब्बीची पिके चांगली असताना योग्यवेळी पाणी मिळत नसल्याने शेतीतील रब्बीची हातची पिके ...

धारूर

: तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भागात रब्बीची पिके चांगली असताना योग्यवेळी पाणी मिळत नसल्याने शेतीतील रब्बीची हातची पिके जागेवर वाळू लागल्याने आंबेवडगाव परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील आंबेवडगाव ३३ के. व्ही. सबस्टेशनवरून विद्युत पुरवठ्यात विस्कळीतपणा आल्याने दिवसाकाठी दोन गुंठे पिकाला पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली होती. परंतु आता विजेच्या लपंडावामुळे पाणी उपलब्ध असूनही त्याचा फायदा होत नसल्याची स्थिती आहे. शेतातील उभी पिके पाण्यावाचून डोळ्यादेखत करपत आहे. याला वीज वितरणचा कारभार जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत असून आंदोलनाचा इशारा अक्षय घोळवे यांनी दिला आहे.

तांत्रिक अडचणींमुळे विजेचा प्रश्न

सध्या विजेची मागणी वाढली आहे. दाब वाढल्यामुळे १३२ के.व्ही. तेलगाव येथून वीजपुरवठा होणाऱ्या तारा तुटू लागल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा बंद करावा लागत आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल असे सहायक कार्यकारी अभियंता कुणाल पेन्सिलवार यांनी सांगितले.