शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

धारूर तालुक्यात भर उन्हाळ्यात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST

धारूर : दिवसेंदिवस चढता पारा, असह्य उकाडा असताना आणि वैशाख वणवा सुरू होण्याआधीच तालुक्यातील नागरिकांना मुसळधार पावसाचा अनुभव ...

धारूर

: दिवसेंदिवस चढता पारा, असह्य उकाडा असताना आणि वैशाख वणवा सुरू होण्याआधीच तालुक्यातील नागरिकांना मुसळधार पावसाचा अनुभव आला. रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नागरिक चक्रावून गेले. काही गावांना जोडणाऱ्या नदीवरील पुलावर पाणी वाहत होते. दरम्यान या पावसामुळे फळबागा आणि भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले असून अंजनडोह येथे वीज कोसळून एक बैल ठार झाला.

तालुक्यात सतत तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने नागरिक वैतागून गेले आहेत. रविवारी दुपारी दीड तास वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. पावसाळ्यात मोठा पाऊस व्हावा, असा अनुभव नागरिकांना आला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत होते. कुंडलिका, वाण, सरस्वती नद्याही भरून वाहत होत्या. रुईधारूर जहागीरमोहा, अंबेवडगाव येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली होती. नागरिकांना नदीकाठी ताटकळावे लागले.

फळबागांचे नुकसान

तालुक्यातील आरणवाडी, रुईधारूर, अंजनडोह, पहाडी पारगाव, धुनकवड ,जहागीरमोहा, सोनीमोहा, आवरगाव येथे फळबागांचे मोठे नुकसान झाले. विविध ठिकाणी शेतातील कोठ्यांवरील पत्रे उडून जाण्याचे अनेक प्रकार घडले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

अंजनडोह बैल ठार

तालुक्यातील अंजनडोह येथील शेतकरी शंकर हरिश्चंद्र रेपे यांचा बैल वादळीवाऱ्यासह पावसादरम्यान वीज पडून जागीच ठार झाला. पेरणीचे दिवस तोंडावर आलेले असताना हे नुकसान झाले. या घटनेचा तत्काळ पंचनामा करून प्रशासनाने मदत देण्याची मागणी योगेश साखरे यांनी केली आहे.