शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

अतिवृष्टीचा तडाखा ! मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, शेतीचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 09:53 IST

Rain In Beed शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

ठळक मुद्देनद्यांचे पाणी मोठया प्रमाणात शेतात घुसलेपाण्याचा प्रवाह वाढल्याने गेट वरूनही वाहू लागले पाणी

अंबाजोगाई : गुरुवारी (दि.२३) झालेल्या मुसळधार पावसाने  मांजरा धरणात पाण्याची आवक अतिप्रचंड वेगाने सुरू आहे. परिणामी मांजरा धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच  मीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याची आवक पाहता लवकरच धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे. 

मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बुधवारी (दि.२२) सकाळी सहा दारवाजे  सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. रात्री पाणीपातळी कमी झाल्याने चार दरवाजे बंद करून फक्त दोन दरवाजे चालू ठेवण्यात आले होते. गुरुवारी रात्री ८ वाजता हे दोन दरवाजे देखील बंद करण्याचे नियोजन होते. मात्र, गुरुवारी दुपारपासूनच मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली. रात्रीच्या वेळी तर पावसाने रौद्ररूप धारण केले. अतिवृष्टीमुळे धरणात अतिवेगाने पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे रात्री सहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. परंतु, पाणी पातळीत अत्यंत वेगाने वाढ होत  असल्याने अखेर आज शुक्रवारी सकाळी ७ वाजता धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीला पुर येऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, धरणात अजूनही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दरवाज्याच्या वरुन पाणी वाहत असल्याने लवकरच सर्व दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. 

शेतीचे अतोनात नुकसानद

रम्यान, अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली जाऊन शेतीचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. तर, धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी असताना सध्या धरणात २२६.५ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाणी शेकडो एकर शेतात घुसून शेते पाण्याखाली बुडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बंधाऱ्याचे दरवाजे तुटले, पूल पाण्याखाली

दरम्यान, धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रचंड वेगाने अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपुर - कानडी बोरगाव येथील बंधाऱ्याचे दरवाजे तुटल्याही माहिती सूत्रांनी दिली. तर, आवाड शिरपुरा सहित इतर अनेक लहान पूल पाण्याखाली गेले आहेत. 

सतर्कता बाळगण्याच्या आ. नमिता मुंदडांच्या सूचना

धरणातून पाणी नदीपात्रात नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांनी पहाटेच केज आणि अंबाजोगाईच्या तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांनाही पूर्णवेळ हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. तसेच, राज्य शासनाने आता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही आ. मुंदडा यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांना प्रतीहेक्टरी ५० हजारांची मदत द्या

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील  शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी २ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी किसान कॉँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष अ ॅड. माधव जाधव यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडManjara Damमांजरा धरणRainपाऊस