शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अतिवृष्टीचा तडाखा ! मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, शेतीचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 09:53 IST

Rain In Beed शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

ठळक मुद्देनद्यांचे पाणी मोठया प्रमाणात शेतात घुसलेपाण्याचा प्रवाह वाढल्याने गेट वरूनही वाहू लागले पाणी

अंबाजोगाई : गुरुवारी (दि.२३) झालेल्या मुसळधार पावसाने  मांजरा धरणात पाण्याची आवक अतिप्रचंड वेगाने सुरू आहे. परिणामी मांजरा धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच  मीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याची आवक पाहता लवकरच धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे. 

मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बुधवारी (दि.२२) सकाळी सहा दारवाजे  सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. रात्री पाणीपातळी कमी झाल्याने चार दरवाजे बंद करून फक्त दोन दरवाजे चालू ठेवण्यात आले होते. गुरुवारी रात्री ८ वाजता हे दोन दरवाजे देखील बंद करण्याचे नियोजन होते. मात्र, गुरुवारी दुपारपासूनच मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली. रात्रीच्या वेळी तर पावसाने रौद्ररूप धारण केले. अतिवृष्टीमुळे धरणात अतिवेगाने पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे रात्री सहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. परंतु, पाणी पातळीत अत्यंत वेगाने वाढ होत  असल्याने अखेर आज शुक्रवारी सकाळी ७ वाजता धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीला पुर येऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, धरणात अजूनही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दरवाज्याच्या वरुन पाणी वाहत असल्याने लवकरच सर्व दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. 

शेतीचे अतोनात नुकसानद

रम्यान, अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली जाऊन शेतीचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. तर, धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी असताना सध्या धरणात २२६.५ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाणी शेकडो एकर शेतात घुसून शेते पाण्याखाली बुडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बंधाऱ्याचे दरवाजे तुटले, पूल पाण्याखाली

दरम्यान, धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रचंड वेगाने अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपुर - कानडी बोरगाव येथील बंधाऱ्याचे दरवाजे तुटल्याही माहिती सूत्रांनी दिली. तर, आवाड शिरपुरा सहित इतर अनेक लहान पूल पाण्याखाली गेले आहेत. 

सतर्कता बाळगण्याच्या आ. नमिता मुंदडांच्या सूचना

धरणातून पाणी नदीपात्रात नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांनी पहाटेच केज आणि अंबाजोगाईच्या तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांनाही पूर्णवेळ हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. तसेच, राज्य शासनाने आता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही आ. मुंदडा यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांना प्रतीहेक्टरी ५० हजारांची मदत द्या

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील  शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी २ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी किसान कॉँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष अ ॅड. माधव जाधव यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडManjara Damमांजरा धरणRainपाऊस