शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

ऐकलं का ! घाणीचे साम्राज्य असलेल्या बीड शहराचा स्वच्छतेत देशात ६७ वा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 18:12 IST

Swachh Bharat Abhiyan in Beed: गतवर्षी देशात बीड पालिकेचा देशात ११३वा क्रमांक होता. यावर्षी स्वच्छतेच्या सुधारणा तर काहीच झाल्या नाहीत. तरीही बीड पालिकेने ६७वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे अश्चर्य व्यक्त होत आहे.

- सोमनाथ खताळ

बीड : शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात. तसेच अपवादात्मक वगळता सर्वच रस्त्यांची चाळणी झाली असून लाखो बीडकरांना याचा त्रास होत आहे. असे असले तरी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये ( Swachh Bharat Abhiyan 2021) बीड पालिका देशात ६७ व्या क्रमांकावर ( Beed Nagarpalika Ranks 67th in Swachh Bharat Abhiyan ) असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता सर्वेक्षण करणाऱ्या समितीने काय पाहून बीड पालिकेला हा क्रमांक दिला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

देशात प्रत्येक वर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले जाते. यावर्षीही ते नेहमीप्रमाणे राबविण्यात आले. स्वच्छता, रस्ते, शौचालये, कागदपत्रे आदींची अचानक भेट ऑनलाईन तपासणी केली जाते. देशातील १ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या गटात जवळपास ३७५ पालिकांनी यात सहभाग घेतला होता. यात बीड पालिकेचाही समोवश होता. एप्रिल २०२१ मध्ये एका पथकाने बीड शहराची तपासणी केली होती. यात बीड पालिकेला ६ हजार पैकी ३ हजार ६२१.३१ एवढे गुण मिळाले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत बीड पालिका देशात ६७ व्या स्थानी असल्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. आरोग्य व शहर विकास मंत्रालयाने हे सर्वेक्षण केले होते. हा निकाल ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. बीड शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे, ठिकठिकाणी नाल्य तुंबलेल्या आहेत, रस्ते उखडले असून पादचाऱ्यांसह वाहनधारकांना कसरत करावी लागते. हद्द वाढ भागात आजही काही लोक उघड्यावर शौचास बसतात. मग काय पाहून मंत्रालयाने पालिकेला देशात ६७ वा क्रमांक दिला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी आलेली समितीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांचीच चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वणी नॉट रिचेबल होता. तर अभियंता राहुल टाळके यांनी भ्रमणध्वणी घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.

आगोदर ११३ वा, यावर्षी ६७गतवर्षी देशात बीड पालिकेचा देशात ११३वा क्रमांक होता. यावर्षी स्वच्छतेच्या सुधारणा तर काहीच झाल्या नाहीत. तरीही बीड पालिकेने ६७वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे अश्चर्य व्यक्त होत आहे.

२७ लाख खर्चूनही शहर घाणचशहरात स्वच्छतेचे कंत्राट एका खासगी व्यक्तीला दिलेले आहे. त्यांना एका घरामागे ५१ रुपये दिले जातात. महिन्याकाठी पालिका या कंत्राटदाराला २७ लाख रुपये देतात. परंतु तरीही शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. हा कंत्राटदार कायमच वादात सापडलेला आहे. कामगारांचे वेतन न देणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे आदी तक्रारी त्यांच्याविरोधात आहेत. तरीही या कंत्राटदारावर कसलीच कारवाई अद्याप झालेली नाही.

टॅग्स :BeedबीडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान