शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

ऐकलं का ! घाणीचे साम्राज्य असलेल्या बीड शहराचा स्वच्छतेत देशात ६७ वा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 18:12 IST

Swachh Bharat Abhiyan in Beed: गतवर्षी देशात बीड पालिकेचा देशात ११३वा क्रमांक होता. यावर्षी स्वच्छतेच्या सुधारणा तर काहीच झाल्या नाहीत. तरीही बीड पालिकेने ६७वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे अश्चर्य व्यक्त होत आहे.

- सोमनाथ खताळ

बीड : शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात. तसेच अपवादात्मक वगळता सर्वच रस्त्यांची चाळणी झाली असून लाखो बीडकरांना याचा त्रास होत आहे. असे असले तरी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये ( Swachh Bharat Abhiyan 2021) बीड पालिका देशात ६७ व्या क्रमांकावर ( Beed Nagarpalika Ranks 67th in Swachh Bharat Abhiyan ) असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता सर्वेक्षण करणाऱ्या समितीने काय पाहून बीड पालिकेला हा क्रमांक दिला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

देशात प्रत्येक वर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले जाते. यावर्षीही ते नेहमीप्रमाणे राबविण्यात आले. स्वच्छता, रस्ते, शौचालये, कागदपत्रे आदींची अचानक भेट ऑनलाईन तपासणी केली जाते. देशातील १ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या गटात जवळपास ३७५ पालिकांनी यात सहभाग घेतला होता. यात बीड पालिकेचाही समोवश होता. एप्रिल २०२१ मध्ये एका पथकाने बीड शहराची तपासणी केली होती. यात बीड पालिकेला ६ हजार पैकी ३ हजार ६२१.३१ एवढे गुण मिळाले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत बीड पालिका देशात ६७ व्या स्थानी असल्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. आरोग्य व शहर विकास मंत्रालयाने हे सर्वेक्षण केले होते. हा निकाल ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. बीड शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे, ठिकठिकाणी नाल्य तुंबलेल्या आहेत, रस्ते उखडले असून पादचाऱ्यांसह वाहनधारकांना कसरत करावी लागते. हद्द वाढ भागात आजही काही लोक उघड्यावर शौचास बसतात. मग काय पाहून मंत्रालयाने पालिकेला देशात ६७ वा क्रमांक दिला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी आलेली समितीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांचीच चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वणी नॉट रिचेबल होता. तर अभियंता राहुल टाळके यांनी भ्रमणध्वणी घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.

आगोदर ११३ वा, यावर्षी ६७गतवर्षी देशात बीड पालिकेचा देशात ११३वा क्रमांक होता. यावर्षी स्वच्छतेच्या सुधारणा तर काहीच झाल्या नाहीत. तरीही बीड पालिकेने ६७वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे अश्चर्य व्यक्त होत आहे.

२७ लाख खर्चूनही शहर घाणचशहरात स्वच्छतेचे कंत्राट एका खासगी व्यक्तीला दिलेले आहे. त्यांना एका घरामागे ५१ रुपये दिले जातात. महिन्याकाठी पालिका या कंत्राटदाराला २७ लाख रुपये देतात. परंतु तरीही शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. हा कंत्राटदार कायमच वादात सापडलेला आहे. कामगारांचे वेतन न देणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे आदी तक्रारी त्यांच्याविरोधात आहेत. तरीही या कंत्राटदारावर कसलीच कारवाई अद्याप झालेली नाही.

टॅग्स :BeedबीडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान