शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शासनाने ताब्यात घेतलेल्या जमिनीवरील पिकांची सर्रास काढणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST

गेवराई : कोल्हेर शिवारातील गट नंबर ५४ व ८४ या वादग्रस्त जमिनीबाबात कलम १४५ crpc प्रमाणे कार्यवाही करून देखील ...

गेवराई : कोल्हेर शिवारातील गट नंबर ५४ व ८४ या वादग्रस्त जमिनीबाबात कलम १४५ crpc प्रमाणे कार्यवाही करून देखील व शासनाचा नियम पायदळी तुडवत या वाद्‌ग्रस्त जमिनीवरील उभा असलेल्या तब्बल २० एक्कर ऊसाची तोडणी चालूच आहे. ही तोड बंद करून शासनाचा नियम तोडणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पक्षकाराने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

यावर आता कारवाई होती का नाही, याकडे सर्वसामान्य नागरिकाचे लक्ष लागले आहे.

कोल्हेर येथील गट नंबर ५४ व ८४ वरील वाद्‌ग्रस्त जमिन ही १८ डिसेंबर २०२० रोजी आदेश पारित करून शासनाने ताब्यात घेतली व संबंधित पक्षकाराना व अन्य व्यक्तीस तिथे जाण्यासाठी मज्जाव केला. असे असताना देखील काही लोक सदर आदेश तोडून येथे उभा असलेला तब्बल २० एक्कर ऊस तोडणी करून नेत आहेत. सदर प्रकरणी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे रितसर तक्रार करून १५ दिवस उलटून देखील झाले. याकडे महसूल विभाग व पोलिस दुर्लक्ष करत आहेत.

या प्रकरणी फक्त ४ जानेवारी २१ रोजी येथील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ऊस तोड बंद केली. मात्र पोलिस गेल्यानंतर पुन्हा ऊसतोड सुरूच ठेवुन ऊस घेवुन जात आहेत. यावर पोलिसांनी कसलीच कारवाई केली नाही. त्यामुळे यात नुकसान होत आहे. या प्रकरणी कोणी कारवाई करावी यासाठी महसूल व पोलिस एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होते. याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या वाद्‌ग्रस्त जमिन प्रकरणी पोलिसांनी आम्हाला अहवाल दिला होता. त्यानंतर आम्ही १४५ सी.आर.पी.सी प्रमाणे कारवाई केली आहे. आता पुढील प्रकरण हे पोलिसांचे असल्याचे येथील तहसिलदार सचिन खाडे यांनी सांगितले. पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड याच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.