शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

'हॅप्पी हायपोक्झिया' घातकच; ७० टक्के रुग्णांचा मृत्यू ४८ ते ७२ तासांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 18:50 IST

कोरोनाची लक्षणे दिसू लागताच रूग्णांनी उपचारासाठी यावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोव्हीड केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरूग्णांनी लक्षणे जाणवताच उपचारासाठी यावे

अंबाजोगाई : कोरोनामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ४८ ते ७२ तासांच्या आत मृत होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी कोरोनाची लक्षणे दिसू लागताच रूग्णांनी उपचारासाठी यावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोव्हीड केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले.

अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड केअर हॉस्पिटलमध्ये ४ जून २०२० रोजी कोवीडचा पहिला रूग्ण आला. या रूग्णापाठोपाठ ट्रेसिंग दरम्यान त्याच्या कुटुंबातील इतर चार सदस्य पॉझिटीव्ह निघाले. आणि ही साखळी सतत वाढत गेली. हा पहिला रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक बरे होवून घरी गेले असले याचे समाधान असले तरी नंतर वाढत जाणारा मृत्युदर हा काळजी वाढवणारा आहे. मुळात कोरोना या आजाराबद्दल लोक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत,ही खंत आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागताच उपचारासाठी आलेले शेकडो रूग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. कोरोनामुळे उपचारासाठी येणा-या रूग्णांमध्ये पहिल्या ४८ ते ७२ तासात होणार्‍या मृत्यूचे दर ७० टक्केच्या आसपास आहे, असे निरीक्षण स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख तथा कोव्हीड केअर केंद्राचे प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी नोंदवले आहे. 

"हॅप्पी हायपोक्झिया".मुळे रुग्ण होतात गंभीर या संदर्भात बोलताना डॉ.बिराजदार पुढे म्हणाले की, कोरोनाच्या भितीमुळे मानसिक ताणतणाव निर्माण होतो. यामुळे मनात एक भीती निर्माण होऊन रूग्ण स्वतः आजार कोणालाही न सांगता अंगावर काढतो. जेव्हा आजार वाढतो,तेव्हा आपल्या फुप्फुसाचा ५० ते ७० टक्के भाग हा संक्रमित झालेला असतो. तेव्हा ऑक्सीजनचा पुरवठा करणे सुद्धा अवघड होते. या आजाराचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे "हॅप्पी हायपोक्झिया".या प्रकारात शरीरातील ऑक्सीजनची पातळी कमी होऊन सुद्धा ज्या प्रमाणात दम, लागायला पाहिजे तो लागत नसल्याने रूग्णांना आपल्या आजाराचा गंभीरपणा लक्षात येत नाही. म्हणून रूग्ण उपचारासाठी उशिरा येतो व त्याचा परिणाम त्याच्यावर उपचार करणं खुपचं अवघड होतं. हे सर्व टाळण्यासाठी  कुटुंबातील सर्व वयस्कर व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक घरी पल्स ऑक्सीमिटर हे छोटेसे यंत्र असणे गरजेचे असून त्यादृष्टीने सर्दी, खोकला, ताप आलेल्या रूग्णांचे ऑक्सीजनची पातळी तपासून, वेळीच उपचार सुरू केले तर चांगले परिणाम दिसून येतील. 

मानसिक कणखरता महत्वाची या आजारात मानसिक संतुलन राखू्न ठेवणे हे ही खुपच गरजेचे आहे. हा आजार असतांनाही अनामिक भितीने अनेक लोक रूग्णालयात येण्यास खुप उशीर करतात. किंबहुना अत्यंत अस्वस्थ झाल्यानंतरच हे रूग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये ७० वर्षांपुढील उच्च रक्तदाब, मधुमेह, न्युमोनिया, श्वसनाचे आजार व इतर आजार असणा-यांची संख्या खुप मोठी आहे. या रुग्णांच्या इतर सर्व टेस्ट करुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेळ जातो आणि परिणामी असे रूग्ण बारा ते चोवीस तासाच्या आतच दगावतात. कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांचा मृत्युदर त्या मानाने खुप कमी आहे असे रूग्ण औषधोपचारासोबत मानसिक समुपदेशानेही लवकर बरे होतात असा अनुभव आहे. मुळात कोरोना रुग्णांना घरातील लोकांनी व समाजातील लोकांनी त्याचे मानसिक बळ वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. ते फार कमी प्रमाणात होते असे दिसते. कोरोना विरूध्दचा लढा हा केवळ रूग्ण आणि डॉक्टर यांचाच नाही तर समाजातील सर्व घटकांचा आहे. सर्वांनी शासनाने लागू केलेले सर्व निर्बंध पाळत या लढ्यात सहभागी व्हायला हवे, असे आवाहनही डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड