शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

वाढ, वृद्धी म्हणजे विकास नव्हे, देश का मामला जुगाड और जुमला-एच.एम. देसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:50 IST

देश का मामला जुगाड और जुमला या पद्धतीने चालत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा राज्य नियोजन आयोगाचे माजी सदस्य एच. एम. देसरडा यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांदूर : विकास कशाला म्हणायचे हा एक गंभीर प्रश्न असून कायदे धाब्यावर बसवून झालेला विकास कामाचा नाही. वाढवृद्धी म्हणजे विकास नसल्याचे सांगत आपल्या राज्यातच नव्हे तर देशातही शिक्षण आरोग्य व कल्याणकारी योजना गरीबांसाठी नाहीत. म्हणूनच देश का मामला जुगाड और जुमला या पद्धतीने चालत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा राज्य नियोजन आयोगाचे माजी सदस्य एच. एम. देसरडा यांनी केले.येथील वसुंधरा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘दोन दशकातील कल्याणकारी राज्याची बदलती भूमिका’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था सचिव गोविंदराव देशमुख, प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. जयकुमार शिंदे, डॉ. ज्ञानोबा मोरे, डॉ. अब्दुल समद, शेतकरी संघाचे अध्यक्ष शंकरराव चव्हाण, दत्ताजी वालेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण दळवे व आयोजक अर्थशास्त्र विभाग प्रमुखप्रा.डॉ. अर्जुन मोरे उपस्थित होते.देसरडा म्हणाले, आठ लाख वार्षिक उत्पन्नाची अट हा एक जुमला आहे. शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ८० हजारावर नाही. नोकरदारांची मात्र चंगळ आहे. जगात भारत देश सर्वात जास्त दूध उत्पादन करतो तरीही ४० टक्के मुले कुपोषित आहेत. जिस देश का बचपन भुखा हो उस देश की जवानी क्या काम की? राज्यात अनेक योजना आहेत पण त्या योजना गोर- गरीबांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे गरीब गरीबच आणि श्रीमंत श्रीमंतच होत आहे. बालमजूर, कुपोषणाचे प्रमाण वाढल्यामुळे राज्यातील योजना कल्याणकारी नाहीत. रोहयो मोडीत काढली आहे. तर जलयुक्त योजनेत सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे. राज्यातील कल्याणकारी योजनेची वस्तुस्थिती मांडताना स्वातंत्र्यपूर्व काळात पुढारी होते हल्ली मात्र पेंढारी (लुटारू) पुढारी असल्याने सर्व योजना कागदोपत्री राबवून फस्त केल्या जातात अशी टीका त्यांनी केली.राज्यात ६० हजार कोटी शिक्षणावर खर्च होतात पण ते सर्व पगारावर. मग शिक्षण कोठे आहे? समाजाच्या प्रति संवेदना नसेल तर शिक्षण काय कामाचे? ज्यांना पदवी आहे त्यांना ज्ञान नाही, असेही ते म्हणाले. महापुरूषांना (विचार) पचवून आपण निबर झाले आहोत. आता आपण नागरिक नाहीत तर फक्त ग्राहक आणि मतदार आहोत. महापुरूषांचे, महात्मा गांधीजींचे विचार आपण विसरल्याने हा सगळा अनर्थ होत असल्याचे परखड मतही देसरडा यांनी मांडले. आरटीआय, आरटीई, मनरेगा, फॉरेस्ट आणि अन्न सुरक्षा हे कायदे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.चर्चासत्रासाठी ७५ संशोधक लेख आले होते. घाटनांदूर व परिसरातील चाळीसहून अधिक शेतकरी तसेच राज्यातील संशोधक, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी सहभत्तगी होते. सूत्रसंचलन प्रा. मकरंद जोगदंड, प्रा डॉ. अलका देशमुख यांनी केले. आभार प्रा. उमेश घुले यांनी मानले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाGovernmentसरकार