शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

के.एस.के.महाविद्यालयात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST

यावेळी व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. विश्वास कंधारे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, ९ ऑगस्ट १९४२ रोजी म. गांधी ...

यावेळी व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. विश्वास कंधारे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, ९ ऑगस्ट १९४२ रोजी म. गांधी यांनी छोडो भारत आंदोलनाची गर्जना केली आणि करेंगे या मरेंगे हा मंत्र देशातील हजारो तरूणांना दिला. हे आंदोलन अहिसेंच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले होते. यावेळी १८५७ ते १९४२ या कालखंडातील क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले आणि त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ. आबासाहेब हांगे यांनी सांगितले की, ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्याचा विचार क्रांतिकारकांनी केला. त्यामध्ये लाल-बाल-पाल यांनी एक लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचा मोलाचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. खाकरे पंडित तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शिंदे अनिता यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, कमवि उपप्राचार्य प्रा. सय्यद एल.एन., पदवीधर विभाग प्रमुख डॉ. रेखा गुळवे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिता शिंदे, डॉ. खान ए.एस., प्रा. दत्तात्रय नेटके, प्रा.रवींद्र शिंदे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते.

100821\10bed_12_10082021_14.jpg

के.एस.के.महाविद्यालयात स्वातंत्र्यवीराना अभिवादन.