शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

शासकीय कार्यालयांभोवती वाढले गवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST

धारुर : मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला व शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ...

धारुर : मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला व शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम लगतच्या लोकवस्तीवर होत असून, शहर व ग्रामीण भागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन स्वच्छता करून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी जागृतीची गरज

वडवणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ग्रामीण भागात व शहरातील नागरिकांची गती मिळत नसल्याची स्थिती आहे. लस उपलब्ध असतानाही ऑनलाइनच्या गोंधळामुळे नागरिक लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाने तसेच सामाजिक संस्थांनी जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिक बोलतात.

प्लॅस्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर

माजलगाव : महाराष्ट्र राज्यात प्लास्टिकच्या वापरास बंदी असताना शहरात मात्र प्लास्टिकच्या कॅरिबॅग सर्रास वापरल्या जात आहेत. स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. किरकोळ तसेच ठोक विक्रेत्यांकडून प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर सुरू असून, प्रशासनाची नियंत्रण मोहीम थंडावली आहे.

कृषी औषध खरेदीसाठी गर्दी

धारूर : तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने खरिपाची पिके जोमात आहेत; मात्र सोयाबीन, कपाशी व अन्य पिकांवर किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे खते व कृषी औषो खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्याची मागणी

वडवणी : कर्जमाफीची घोषणा होऊन दोन वर्षे होत आहेत. शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु दोन वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांनी या अनुदान वाटपाची मागणी केली आहे.

वेगवान वाहनांमुळे अपघातात वाढ

अंबाजोगाई : शहर व तालुक्यात सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भरगर्दीच्या रस्त्यातही काही टवाळखोर युवक सुसाट वेगाने दुचाकी चालवीत असल्याने इतर वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. सुसाट वेगाने वाहन चालविल्यामुळे अपघातही वाढले आहेत. त्यामुळे अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची गरज आहे.

पावसाळ्यापूर्वी फवारणी करावी

अंबाजोगाई : कोरोनाचा उद्रेक कमी झाला असला तरी ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतींनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात विविध साथीचे आजार डोके वर काढत आहेत. पावसामुळे दलदल निर्माण होऊन डासांचा उपद्रव वाढला असून, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतींनी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.