शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

अंबाजोगाईतील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:32 IST

सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंबाजोगाईत मुकुंदराज व्हॅली, नागनाथ मंदिर, बालाघाटाच्या डोंगर कपारीत असलेले बुट्टेनाथ मंदिर, रेणुका ...

सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंबाजोगाईत मुकुंदराज व्हॅली, नागनाथ मंदिर, बालाघाटाच्या डोंगर कपारीत असलेले बुट्टेनाथ मंदिर, रेणुका देवी मंदिर, दासोपंत समाधी, हत्तीखाना, सकलेश्वर मंदिर, डोंगर तुकाई मंदिराशेजारील धबधबा, ही अंबाजोगाईची ओळख आहे.

यासोबतच बालाघाटच्या डोंगरपट्ट्यात नैसर्गिक सौंदर्य लपले आहे. मात्र दुर्लक्षामुळे येथील पर्यटनस्थळाचा विकास रखडला आहे. शहराच्या उत्तरेला चार किलोमीटर अंतरावर डोंगतुकाई मंदिर आणि उंचावरून पडणारा धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण असून, ते दुर्लक्षित आहे. शहर व परिसरातील अनेक निसर्गरम्य स्थळांकडे जाण्यासाठी रस्ता नाही. या परिसरात असणाऱ्या आकर्षक धबधब्याकडे आणि निसर्गरम्य स्थळांकडे जाण्यासाठी पक्का रस्ता झाला तर शेकडो नागरिक येथे जाऊ शकतील. या भागात ‘व्यूहपॉइंट’ निर्माण करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शहरात अनेक जुने वाडे, विहिरी आहेत. संगीत आणि साहित्यावर जिवापाड प्रेम करणारे अनेक नागरिक आहेत. शैक्षणिक दृष्टीने शहर अग्रेसर आहे. शहरात विविध प्रकारांची वीस महाविद्यालये आणि चाळीस विद्यालये आहेत. अनेक संगीत मैफली, कवी संमेलने, समाजप्रबोधन करणारी व्याख्याने येथे होतात. विविध क्रीडा व बौद्धिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. त्यामुळे येथील पर्यटन विकासाला चालना देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दुर्मिळ साहित्य, मंदिरांचे जतन व्हावे

येथील देशपांडे गल्लीतील देवघरात सर्वज्ञ दासोपंतांनी लिहिलेले ऐतिहासिक पासोडी आहे. तो दुर्मिळ साहित्याचा नमुना आहे. नागझरी परिसरातील महादेव मंदिराशेजारी दगडी गोमुखातून पाणी वाहते. बाजूला संत भगवानबाबांचे मंदिर आहे. शहरात योगेश्वरी देवी मंदिर, खोलेश्वर मंदिर, काशीविश्वनाथ मंदिर, बडा हनुमान मंदिर, अमृतेश्वर मंदिर व इतर मंदिरे आहेत. खोलेश्वर मंदिरात दगडी शिलालेख आहे. बाजूला ऐतिहासिक शहाबुरूज दिमाखाने उभा आहे, या व अन्य पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाने पावले उचलण्याची मागणी निवेदनात केली आहे.

विकासाचा अनुशेष भरून काढावा

अंबाजोगाई येथे पर्यटन केंद्र झाल्यास शहराचा विकास होईल.

शहराशेजारी असलेल्या या पर्यटनस्थळांचा विकास झाला, तर बेरोजगारांना रोजगार मिळेल. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील पर्यटनस्थळांच्या विकास रखडला आहे. पर्यटनस्थळांच्या विकासाचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी पर्यटनस्थळांच्या विकासाची मागणी पर्यटनमंत्री आणि पर्यटन सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.