शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

अंबाजोगाईतील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:32 IST

सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंबाजोगाईत मुकुंदराज व्हॅली, नागनाथ मंदिर, बालाघाटाच्या डोंगर कपारीत असलेले बुट्टेनाथ मंदिर, रेणुका ...

सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंबाजोगाईत मुकुंदराज व्हॅली, नागनाथ मंदिर, बालाघाटाच्या डोंगर कपारीत असलेले बुट्टेनाथ मंदिर, रेणुका देवी मंदिर, दासोपंत समाधी, हत्तीखाना, सकलेश्वर मंदिर, डोंगर तुकाई मंदिराशेजारील धबधबा, ही अंबाजोगाईची ओळख आहे.

यासोबतच बालाघाटच्या डोंगरपट्ट्यात नैसर्गिक सौंदर्य लपले आहे. मात्र दुर्लक्षामुळे येथील पर्यटनस्थळाचा विकास रखडला आहे. शहराच्या उत्तरेला चार किलोमीटर अंतरावर डोंगतुकाई मंदिर आणि उंचावरून पडणारा धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण असून, ते दुर्लक्षित आहे. शहर व परिसरातील अनेक निसर्गरम्य स्थळांकडे जाण्यासाठी रस्ता नाही. या परिसरात असणाऱ्या आकर्षक धबधब्याकडे आणि निसर्गरम्य स्थळांकडे जाण्यासाठी पक्का रस्ता झाला तर शेकडो नागरिक येथे जाऊ शकतील. या भागात ‘व्यूहपॉइंट’ निर्माण करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शहरात अनेक जुने वाडे, विहिरी आहेत. संगीत आणि साहित्यावर जिवापाड प्रेम करणारे अनेक नागरिक आहेत. शैक्षणिक दृष्टीने शहर अग्रेसर आहे. शहरात विविध प्रकारांची वीस महाविद्यालये आणि चाळीस विद्यालये आहेत. अनेक संगीत मैफली, कवी संमेलने, समाजप्रबोधन करणारी व्याख्याने येथे होतात. विविध क्रीडा व बौद्धिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. त्यामुळे येथील पर्यटन विकासाला चालना देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दुर्मिळ साहित्य, मंदिरांचे जतन व्हावे

येथील देशपांडे गल्लीतील देवघरात सर्वज्ञ दासोपंतांनी लिहिलेले ऐतिहासिक पासोडी आहे. तो दुर्मिळ साहित्याचा नमुना आहे. नागझरी परिसरातील महादेव मंदिराशेजारी दगडी गोमुखातून पाणी वाहते. बाजूला संत भगवानबाबांचे मंदिर आहे. शहरात योगेश्वरी देवी मंदिर, खोलेश्वर मंदिर, काशीविश्वनाथ मंदिर, बडा हनुमान मंदिर, अमृतेश्वर मंदिर व इतर मंदिरे आहेत. खोलेश्वर मंदिरात दगडी शिलालेख आहे. बाजूला ऐतिहासिक शहाबुरूज दिमाखाने उभा आहे, या व अन्य पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाने पावले उचलण्याची मागणी निवेदनात केली आहे.

विकासाचा अनुशेष भरून काढावा

अंबाजोगाई येथे पर्यटन केंद्र झाल्यास शहराचा विकास होईल.

शहराशेजारी असलेल्या या पर्यटनस्थळांचा विकास झाला, तर बेरोजगारांना रोजगार मिळेल. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील पर्यटनस्थळांच्या विकास रखडला आहे. पर्यटनस्थळांच्या विकासाचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी पर्यटनस्थळांच्या विकासाची मागणी पर्यटनमंत्री आणि पर्यटन सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.