शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

खुशखबर! अहमदनगर-परळी रेल्वेमार्गाचे ६६ किमीचे काम पूर्ण,आता पुढचा टप्पा आष्टी ते इग्नेवाडी

By अनिल भंडारी | Updated: July 19, 2023 17:44 IST

या मार्गावर विद्युतीकरणाचे कामही सुरू आहे

बीड : अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वेमार्गाचे ६६.१८ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर एकूण २३ स्थानके असून, अहमदनगर ते आष्टीपर्यंत ६६.१८ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे तर आष्टीपासून इग्नेवाडीपर्यंतचे ६७.१२ किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे.

सुमारे ४ हजार ८०५.१७ कोटी रुपयांचा अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचा एकूण २६१.२५ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. या मार्गासाठी १८१४.५८ हेक्टर जमीन संपादित केली असून भूसंपादनाचे काम ९९.५३ टक्के झालेले आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या ६६.१८ किलोमीटरच्या अंतरात ७ रेल्वे स्थानके आहेत. यात अहमदनगर, नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा आणि आष्टी येथील स्थानकांचा समावेश आहे. आष्टी स्थानकापासून पुढे किनी, बावी, अंमळनेर, जाटनांदूर, इग्नेवाडीपर्यंतचे ६७.१२ किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम या वर्षभरात पूर्णत्वाकडे जाईल, अशी खात्री रेल्वे विभागाने दिली आहे. इग्नेवाडी ते परळी असे १२७.९५ किलोमीटरपर्यंतचे कामदेखील सुरू आहे. या नवीन मार्गाच्या पूर्ततेमुळे अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांचा रेल्वे संपर्क सुधारणार आहे.

डेमू रेल तूर्त बंदगतवर्षी सप्टेंबरमध्ये अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी 'डेमू रेल्वे' सेवा सुरु केली होती. परंतु अवघ्या दहा महिन्यांत ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद, चालकांची कमतरता तसेच अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे १३ ऑक्टोबरपर्यंत या डेमू रेलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Beedबीडrailwayरेल्वेtourismपर्यटन