शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

ऐतिहासिक किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ कचऱ्याचे ढिग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

धारूर : शहरामध्ये नगर परिषदेतर्फे मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवले जाते असे सांगितले जात असले तरी चित्र मात्र ...

धारूर : शहरामध्ये नगर परिषदेतर्फे मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवले जाते असे सांगितले जात असले तरी चित्र मात्र वेगळेच आहे. शहरासह धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात ढिग असल्याने येणाऱ्या पर्यटकांसह नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या परिसराची तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी इतिहास प्रेमीतून होत आहे.

नगर परिषदेचे स्वच्छता अभियान अस्तित्वात आहे का नाही अशी शंका उपस्थित होत आहे. शहरामध्ये गल्लोगल्ली कचऱ्याचे ढिगारे आहेत. नाल्या तुंबल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे रहदारीच्या ठिकाणी वाहतूक करणे देखील अवघड झाले आहे. किल्ले धारूर ऐतिहासिक ठेवा असलेला महादुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळच कचऱ्याचे ढिगारे असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे. तसेच या किल्ल्याच्या परिसरात नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणी टाकले जात नसून त्याची देखभाल नगर परिषदेकडून केली जात नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.

किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने तेही नाराजी व्यक्त करतात. नगर परिषदेने स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.