शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

ऐतिहासिक किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ कचऱ्याचे ढिग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

धारूर : शहरामध्ये नगर परिषदेतर्फे मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवले जाते असे सांगितले जात असले तरी चित्र मात्र ...

धारूर : शहरामध्ये नगर परिषदेतर्फे मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवले जाते असे सांगितले जात असले तरी चित्र मात्र वेगळेच आहे. शहरासह धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात ढिग असल्याने येणाऱ्या पर्यटकांसह नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या परिसराची तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी इतिहास प्रेमीतून होत आहे.

नगर परिषदेचे स्वच्छता अभियान अस्तित्वात आहे का नाही अशी शंका उपस्थित होत आहे. शहरामध्ये गल्लोगल्ली कचऱ्याचे ढिगारे आहेत. नाल्या तुंबल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे रहदारीच्या ठिकाणी वाहतूक करणे देखील अवघड झाले आहे. किल्ले धारूर ऐतिहासिक ठेवा असलेला महादुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळच कचऱ्याचे ढिगारे असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे. तसेच या किल्ल्याच्या परिसरात नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणी टाकले जात नसून त्याची देखभाल नगर परिषदेकडून केली जात नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.

किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने तेही नाराजी व्यक्त करतात. नगर परिषदेने स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.