शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कचरा पडतो रस्त्यावर मात्र कचरागाडीच्या नावावर निघतात लाखोची बिले; माजलगाव पालिकेतील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:50 IST

स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देणारे पदाधिकारी भंगारमध्ये पडलेल्या कचराकुंडी गाडीच्या नावावर वर्षाकाठी लाखोची बिले उचलत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून शहरातील कचरा बायपास रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

माजलगाव ( बीड ): स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देणारे पदाधिकारी भंगारमध्ये पडलेल्या कचराकुंडी गाडीच्या नावावर वर्षाकाठी लाखोची बिले उचलत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून शहरातील कचरा बायपास रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील ओला, सुका कचरा उचलून तो केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये टाकण्यासाठी काही वर्षापूर्वी मोठा टेम्पो नगर पालिकेने खरेदी केला होता. शहरात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्या थेट उचलून त्या घनकचरा युनिटमध्ये टाकण्याचे काम या गाडीने करण्यात येत होते. परंतु मागील तीन- चार वर्षांपासून कचराकुंडी घेऊन जाणारी गाडी नादुरुस्त अवस्थेत बायपासला भंगारमध्ये पडलेली आहे. जुलै २०१७ मध्ये औरंगाबादच्या आयुक्त कार्यालयातील एक पथक माजलगाव शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित यांनी शहरातील कचरा कचराकुंडी वाहून नेणार्‍या गाडीने उचलून तो केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये टाकण्यात येत असल्याचा अहवाल २७ जुलै २०१७ रोजी आयुक्त कार्यालयाला देण्यात आला होता.

पालिका प्रशासनाने चुकीचा अहवाल देण्यामागचे गुपित काय, असा प्रश्न निर्माण होत असून, यातून पालिका पदाधिकारी बंद पडलेल्या गाडीच्या नावावर लाखो रु पयांचे बिल उचलून स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप नगरसेवक शेख मंजूर यांनी केला आहे. शहरातील कचर्‍याची सद्य परिस्थती पाहता शहरातील कचर्‍याची विल्हेवाट केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये न लावता तो चक्क शहराच्या बायपास रोडच्या बाजूला, सिंदफणा नदीपात्राच्या कडेला टाकण्यात येत आहे.

रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकण्यात येत असल्याने येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून नदीपात्रातील पाणीही दूषित होत आहे. पालिका कर्मचारी टाकलेला कचरा जळून देत असल्याने मोठ्या प्रमाणात दूषित वायू निर्माण होत असून नागरिकांना श्वसनाचे आजार जडत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. वास्तविक शहरात सर्वत्र कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरली असून स्वच्छ शहर सुंदर शहराचा नारा हवेतच विरल्याचे सत्य परिस्थिती दिसून येत आहे. 

अहवालाची कल्पना नाही आयुक्तांना अहवाल दिल्याची मला काहीही माहीत नाही. शिवाय पालिकेचे कर्मचारी शहरातील कचरा कुठे टाकतात याची माहिती घेऊन तो रस्त्याच्या कडेला टाकला जात असेल तर यापुढे तो घनकचरा युनिटला टाकण्यात येईल. - लक्ष्मण राठोड, प्रभारी मुख्याधिकारी

टॅग्स :Beedबीड