शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कचरा पडतो रस्त्यावर मात्र कचरागाडीच्या नावावर निघतात लाखोची बिले; माजलगाव पालिकेतील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:50 IST

स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देणारे पदाधिकारी भंगारमध्ये पडलेल्या कचराकुंडी गाडीच्या नावावर वर्षाकाठी लाखोची बिले उचलत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून शहरातील कचरा बायपास रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

माजलगाव ( बीड ): स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देणारे पदाधिकारी भंगारमध्ये पडलेल्या कचराकुंडी गाडीच्या नावावर वर्षाकाठी लाखोची बिले उचलत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून शहरातील कचरा बायपास रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील ओला, सुका कचरा उचलून तो केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये टाकण्यासाठी काही वर्षापूर्वी मोठा टेम्पो नगर पालिकेने खरेदी केला होता. शहरात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्या थेट उचलून त्या घनकचरा युनिटमध्ये टाकण्याचे काम या गाडीने करण्यात येत होते. परंतु मागील तीन- चार वर्षांपासून कचराकुंडी घेऊन जाणारी गाडी नादुरुस्त अवस्थेत बायपासला भंगारमध्ये पडलेली आहे. जुलै २०१७ मध्ये औरंगाबादच्या आयुक्त कार्यालयातील एक पथक माजलगाव शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित यांनी शहरातील कचरा कचराकुंडी वाहून नेणार्‍या गाडीने उचलून तो केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये टाकण्यात येत असल्याचा अहवाल २७ जुलै २०१७ रोजी आयुक्त कार्यालयाला देण्यात आला होता.

पालिका प्रशासनाने चुकीचा अहवाल देण्यामागचे गुपित काय, असा प्रश्न निर्माण होत असून, यातून पालिका पदाधिकारी बंद पडलेल्या गाडीच्या नावावर लाखो रु पयांचे बिल उचलून स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप नगरसेवक शेख मंजूर यांनी केला आहे. शहरातील कचर्‍याची सद्य परिस्थती पाहता शहरातील कचर्‍याची विल्हेवाट केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये न लावता तो चक्क शहराच्या बायपास रोडच्या बाजूला, सिंदफणा नदीपात्राच्या कडेला टाकण्यात येत आहे.

रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकण्यात येत असल्याने येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून नदीपात्रातील पाणीही दूषित होत आहे. पालिका कर्मचारी टाकलेला कचरा जळून देत असल्याने मोठ्या प्रमाणात दूषित वायू निर्माण होत असून नागरिकांना श्वसनाचे आजार जडत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. वास्तविक शहरात सर्वत्र कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरली असून स्वच्छ शहर सुंदर शहराचा नारा हवेतच विरल्याचे सत्य परिस्थिती दिसून येत आहे. 

अहवालाची कल्पना नाही आयुक्तांना अहवाल दिल्याची मला काहीही माहीत नाही. शिवाय पालिकेचे कर्मचारी शहरातील कचरा कुठे टाकतात याची माहिती घेऊन तो रस्त्याच्या कडेला टाकला जात असेल तर यापुढे तो घनकचरा युनिटला टाकण्यात येईल. - लक्ष्मण राठोड, प्रभारी मुख्याधिकारी

टॅग्स :Beedबीड