शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

कचरा पडतो रस्त्यावर मात्र कचरागाडीच्या नावावर निघतात लाखोची बिले; माजलगाव पालिकेतील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:50 IST

स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देणारे पदाधिकारी भंगारमध्ये पडलेल्या कचराकुंडी गाडीच्या नावावर वर्षाकाठी लाखोची बिले उचलत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून शहरातील कचरा बायपास रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

माजलगाव ( बीड ): स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देणारे पदाधिकारी भंगारमध्ये पडलेल्या कचराकुंडी गाडीच्या नावावर वर्षाकाठी लाखोची बिले उचलत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून शहरातील कचरा बायपास रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील ओला, सुका कचरा उचलून तो केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये टाकण्यासाठी काही वर्षापूर्वी मोठा टेम्पो नगर पालिकेने खरेदी केला होता. शहरात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्या थेट उचलून त्या घनकचरा युनिटमध्ये टाकण्याचे काम या गाडीने करण्यात येत होते. परंतु मागील तीन- चार वर्षांपासून कचराकुंडी घेऊन जाणारी गाडी नादुरुस्त अवस्थेत बायपासला भंगारमध्ये पडलेली आहे. जुलै २०१७ मध्ये औरंगाबादच्या आयुक्त कार्यालयातील एक पथक माजलगाव शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित यांनी शहरातील कचरा कचराकुंडी वाहून नेणार्‍या गाडीने उचलून तो केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये टाकण्यात येत असल्याचा अहवाल २७ जुलै २०१७ रोजी आयुक्त कार्यालयाला देण्यात आला होता.

पालिका प्रशासनाने चुकीचा अहवाल देण्यामागचे गुपित काय, असा प्रश्न निर्माण होत असून, यातून पालिका पदाधिकारी बंद पडलेल्या गाडीच्या नावावर लाखो रु पयांचे बिल उचलून स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप नगरसेवक शेख मंजूर यांनी केला आहे. शहरातील कचर्‍याची सद्य परिस्थती पाहता शहरातील कचर्‍याची विल्हेवाट केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये न लावता तो चक्क शहराच्या बायपास रोडच्या बाजूला, सिंदफणा नदीपात्राच्या कडेला टाकण्यात येत आहे.

रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकण्यात येत असल्याने येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून नदीपात्रातील पाणीही दूषित होत आहे. पालिका कर्मचारी टाकलेला कचरा जळून देत असल्याने मोठ्या प्रमाणात दूषित वायू निर्माण होत असून नागरिकांना श्वसनाचे आजार जडत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. वास्तविक शहरात सर्वत्र कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरली असून स्वच्छ शहर सुंदर शहराचा नारा हवेतच विरल्याचे सत्य परिस्थिती दिसून येत आहे. 

अहवालाची कल्पना नाही आयुक्तांना अहवाल दिल्याची मला काहीही माहीत नाही. शिवाय पालिकेचे कर्मचारी शहरातील कचरा कुठे टाकतात याची माहिती घेऊन तो रस्त्याच्या कडेला टाकला जात असेल तर यापुढे तो घनकचरा युनिटला टाकण्यात येईल. - लक्ष्मण राठोड, प्रभारी मुख्याधिकारी

टॅग्स :Beedबीड