शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धारुरच्या किल्ल्यात मद्यापी, आंबटशौकिनांचा वावर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:31 IST

धारूर : येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. सहा महिन्यांच्या ...

धारूर : येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. सहा महिन्यांच्या आत बांधलेली भिंत पडून गेली. ती बांधण्यासाठी किल्लेप्रेमींनी पाठपुरावा केला. यानंतर शहरातील नागरिकांनी प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहीम राबविली. मात्र, पुरातत्त्व विभागाने प्रवेशद्वारावर असलेले सुरक्षारक्षक कमी केल्यामुळे किल्ल्यात मद्यपी, आंबटाशौकिनांनी हैदोस घातला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केले आहे.

धारूर येथील ऐतिहासिक किल्ला तब्बल चाळीस एकर परिसरात पसरलेला आहे. किल्ल्याची मोठी पडझड झाल्यामुळे दुरुस्तीसाठी शहरातील किल्लाप्रेमींनी मोहीम राबवत आंदोलने करीत, निवेदने देत किल्ल्याच्या डागडुजीसाठी तीन टप्प्यांत सात कोटी रुपयांचा निधी पुरातत्त्व विभागाकडून मंजूर करून घेतला. दर्शनीय भागात पडझड झालेल्या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली. पूर्वीप्रमाणे भव्यदिव्य असे प्रवेशद्वार बसविण्यात आले. बाहेरील सर्व चोर रस्ते बंद केले. त्यामुळे प्रवेशद्वारातून फक्त प्रवेश करता येऊ लागला. याठिकाणी खासगी सुरक्षा संस्थेचे दोन सुरक्षारक्षकही नेमले होते. यामुळे किल्ल्यात होणारे गैरप्रकार बंद झाले. दरम्यानच्या काळात डागडुजी केलेल्या भिंती निकृष्ट कामामुळे ढासळल्या. हे काम करण्यापूर्वी कंत्राटदाराला पाच वर्षांची जबाबदारी देण्यात आलेली होती. मात्र, कंत्राटदार काम करण्यास चालढकल करताच किल्लेप्रेमींनी पुराततत्त्व विभागाच्या विरोधात मोहीम राबवत विभागीय सहायक संचालक अजित खंदारे यांना जाब विचारला होता. यानंतर कंत्राटदाराला दुरुस्तीचे काम करावे लागले. हे काम करताना किल्लेप्रेमींनी दर्जेदार काम करण्याकडे लक्ष दिले. तेव्हापासून पुरातत्त्व विभागाने किल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोपही शहरातील नागरिकांनी केला आहे. याच काळात राज्य पुरातत्त्व विभागाने नेमलेले दोन सुरक्षारक्षक कमी केले आहेत. त्यामुळे किल्ल्याचा दरवाजा बंद करण्यासाठीही कोणीही कर्मचारी त्याठिकाणी हजर नसतो. त्यामुळे दारुड्यांचा हा अड्डा बनला आहे. याशिवाय अनेक आंबटशौकीनही किल्ल्यामध्ये फिरताना आढळत आहेत. कोणतेही बंधन नसल्यामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू झाला आहे. रविवारी कायाकल्प प्रतिष्ठानतर्फे रविवारी किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबविताना आडोशाला मद्याच्या रिकाम्या बाटल्याचे ढीग आढळून आले. तसेच इतरही अक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. या ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य जपण्यासाठी सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणीही प्रतिष्ठानतर्फे पुरातत्त्व विभागाकडे करण्यात आली आहे.

चौकट,

सहायक संचालकांनी नंबर केले ब्लॉक

शहरातील किल्लेप्रेमी किल्ल्यात होणाऱ्या गैरप्रकाराची तक्रार विभागाचे सहायक संचालक अजित खंदारे यांच्याकडे सतत करीत असतात. किल्ल्यात डागडुजींचे निकृष्ट दर्जाचे काम होत असतानाही त्याविषयी पाठपुरावा संचालकांकडे करण्यात आला होता. मात्र, सहायक संचालकांनी धारुर शहरातून सतत तक्रारी करणाऱ्यांचे मोबाईल क्रमांक ब्लॉक केले असल्याची माहिती दुर्गप्रेमी विजय शिनगारे यांनी दिली. त्यामुळे यापुढे सहायक संचालकांच्या गैरकारभाराचा पाढा सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या वाचण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. याविषयी सहायक संचालक अजित खंदारे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.