शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

अनलॉकमध्ये मास्कचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

वडवणी : जिल्ह्यासह तालुका अनलॉक केल्यानंतर काही भागात मास्क व फिजिकल डिस्टन्सचा विसर नागरिकांना पडल्याचे दिसून येते. स्थानिक ...

वडवणी : जिल्ह्यासह तालुका अनलॉक केल्यानंतर काही भागात मास्क व फिजिकल डिस्टन्सचा विसर नागरिकांना पडल्याचे दिसून येते. स्थानिक पथकाच्या कारवाया देखील थंडावल्या आहेत. नागरिकांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अंमल करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुक्या जनावरांची काळजी घ्यावी

वडवणी : पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन जनावरांचे आरोग्य सांभाळावे. पावसाळ्यात जनावरांच्या आहारात बदल झाल्यामुळे पोटाचे विकार, आजार निर्माण होतात. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला व इतरत्र नुकतेच गवत उगवलेले असते. गवताची उंची जास्त नसल्याने जनावरांचे तोंड जमिनीला घासते व जखमा होतात, असे झाल्यास पशुपालकांनी त्वरित पशुवैद्यकीय डाॅक्टरांकडून उपचार करून घ्यावेत व नुकसान टाळावे, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने गावोगावी केले आहे.

रस्त्याच्या कडेला गवताचा वेढा

वडवणी : ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला व

शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसामुळे गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील व ग्रामीण भागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन स्वच्छता करून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कठडे नसल्याने पूल धोकादायक

वडवणी : तालुक्यात अनेक नदी, नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षक कठडे नसल्याने अपघात टाळण्यासाठी पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. वडवणी कवडगाव रस्त्यावर खड्डे पडले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील नदी, नाल्यांवर संरक्षक कठडे तुटले असून काही चोरीला ही गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावेत, अशी मागणी ओमराजे जाधव यांनी केली आहे.

पुलांची उंची वाढविण्याची मागणी

वडवणी : तालुक्यातील मामला नदीवरील गावाजवळील पुलावर पावसाळ्यात पाणी वाहत असल्याने अनेक वेळा रस्ता बंद पडतो. दोन्ही बाजूचा संपर्क तुटतो. कमी उंचीच्या पुलामुळे धोका वाढला आहे, यामुळे अपघात घडतात. या बाबींचा गांभीर्याने विचार करून या पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी मामला येथील ग्रामस्थांनी केली आहे.