शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

महावितरणकडून केजमध्ये वीजबिलांची सक्तीने वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

केज : लॉकडाऊनच्या काळात वापरलेल्या विजेचे बिल माफ करण्याची भूमिका शासनाने घेतल्याने अनेक वीज ग्राहकांनी लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल भरणा ...

केज : लॉकडाऊनच्या काळात वापरलेल्या विजेचे बिल माफ करण्याची भूमिका शासनाने घेतल्याने अनेक वीज ग्राहकांनी लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल भरणा केला नाही. मात्र वीजबिल तर माफ झालेच नाही उलट वीज ग्राहकांच्या दारात वीज कंपनीचे वसुली पथक जाऊन बिलाची सक्तीने वसुली करत असल्याचे चित्र शहरासह तालुक्यात दिसून येत आहे. घरगुती ग्राहकांनंतर वीज कंपनी शेती पंपाच्या वीजबिल वसुलीसाठी कामाला लागणार असल्याने शेतकऱ्यांनाही वसुलीचा शॉक बसणार आहे.

कोरोनाच्या काळात वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल माफ करण्याची भूमिका शासनाने घेतली होती. याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ३ नोव्हेंबर रोजी प्रसार माध्यमांना कोरोनाकाळातील वाढीव वीजबिलात सवलत देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण करण्यापूर्वीच त्यांनी पंधरा दिवसांच्या कालावधीत आपला शब्द फिरवला. वीज ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नसल्याने वीज ग्राहकांनी वीज मीटरप्रमाणे बिलांचा भरणा करावे, असे सांगितले. मात्र याचा फटका नियमितपणे वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना बसला. त्यातच कोरोनाकाळात वापरलेल्या विजेच्या अधिकच्या आलेल्या बिलाची ना दुरुस्ती, ना भरलेल्या बिलाची कपात यामुळे वीज ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.

वसुलीसाठी पथक घरोघरी

वीज देयकाच्या वसुलीसाठी पथक तैनात करण्यात आल्याने कार्यालय सुनसान झाले आहे. घरगुती वीज ग्राहकांकडून वीजबिलाची सक्तीने वसुली चालू असतानाच शेतकऱ्याच्या शेतातील शेती पंपाच्या विजेची वसुली करण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही शेती पंपाच्या वीजबिल वसुलीचा शॉक बसणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सवलत योजना

शेतकऱ्यांसाठी वीज वितरण कंपनीने सवलत योजना चालू केली असून शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सप्टेंबर २०२० च्या वीज पंपाच्या बिलातील ५० टक्के मूळ थकबाकी भरल्यास उर्वरित थकबाकी माफ करण्यात येणार आहे. ही योजना २०२४ पर्यंत चालणार असल्याची माहिती विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी दिली.

दीड कोटीची वसुली

शहरात सक्तीने वीजबिल वसुली करण्यात येत असल्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सक्तीने वीजबिल वसुली करत नसल्याचे सांगितले. तसेच वीज ग्राहकांकडून आजतागायत १ कोटी ६० लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी लोकमतला दिली.