शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

देवऱ्याची वाडीचा राज्यात झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 23:37 IST

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बीड तालुक्यातील देव-याचीवाडी या गावाने राज्यस्तरावर बाजी मारली असून या गावाला तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले आहे.

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’चे तिसरे बक्षीस : बीड जिल्ह्यातील ६ गावे ठरली तालुकास्तरीय विजेती

बीड : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बीड तालुक्यातील देव-याचीवाडी या गावाने राज्यस्तरावर बाजी मारली असून या गावाला तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. याबरोबरच बीड जिल्ह्यातील सहा गावे तालुकास्तरावर प्रथम आली आहेत.पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धा २०१९ च्या तालुका व राज्यस्तरीय पारितोषिकांचे वितरण रविवारी पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाले. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील आनोरे (ता. अंमळनेर), वाशिम जिल्ह्यातील बोरव्हा खुर्द (ता. मंगरूळ पीर) आणि बीड जिल्ह्यातील देवºयाची वाडी (ता. बीड ) या गावांना राज्य पातळीवरील तिसरे पारितोषिक मिळाले. संयुक्तपणे ४० लाख रूपये व प्रमाणपत्र असे या पारितोषकाचे स्वरूप आहे. तसेच बीड जिल्ह्यातील गिरवली आपेट (ता. अंबाजोगाई), सराटेवडगाव (ता. आष्टी), नामेवाडी (ता. केज), मोठेवाडी (ता. धारूर), सरफराजपूर (ता. परळी), आणि मांडवखेल (ता. बीड) या सहा गावांना तालुकास्तरावरील पहिले पारितोषिक मिळाले आहे.चौथ्या वॉटर कप स्पर्धेत बीड जिल्ह्यातील ६ तालुक्यांचा समावेश होता. बीड तालुक्याचा प्रथमच या स्पर्धेत सहभाग असताना तालुक्यातील देवºयाची वाडी या गावाने उत्कृष्ट काम करून राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १५ गावांची निवड झाली होती. केलेल्या श्रमदानामुळे गावे दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करतीलच मात्र वॉटर कप पुरस्कारामुळे गावाच्या विकासाला नवा आकार मिळणार आहे.तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणेबीड - देवºयाची वाडी (प्रथम) मांडाखेल (द्वितीय), गुंदेवाडी (तृतीय), आष्टी - सराटे वडगाव, पांगुळ, शेरी बु., धारुर - मोठेवाडी, मोरफळी, सोनीमोहा, केज - नामेवाडी, पाथरा, आवसगाव, परळी - सरफराजपूर, गोपाळपूर, संगम, अंबाजोगाई-गिरवली आपेट, ममदापूर, धानोराग्रामस्थांच्या एकजुटीचे यशस्पर्धेत जरी तिसरा क्र मांक पटकावला असला तरी वितरणावेळी मात्र पहिला बहुमान मिळाला. या यशाचा आनंद ग्रामस्थांनी गावात ढोलताशे व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी एकजूट होऊन दुष्काळावर मात करण्यासाठी प्रचंड मेहनतीने श्रमदान केले. यामध्ये गावातील आबालवृद्ध तसेच महिलांनी मोठया संख्येने सहभागी होऊन श्रमदान केल्याने गावाचा महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक आला. हा सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे संभाजी सुर्वे म्हणाले.

टॅग्स :BeedबीडWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा