शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

देवऱ्याची वाडीचा राज्यात झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 23:37 IST

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बीड तालुक्यातील देव-याचीवाडी या गावाने राज्यस्तरावर बाजी मारली असून या गावाला तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले आहे.

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’चे तिसरे बक्षीस : बीड जिल्ह्यातील ६ गावे ठरली तालुकास्तरीय विजेती

बीड : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बीड तालुक्यातील देव-याचीवाडी या गावाने राज्यस्तरावर बाजी मारली असून या गावाला तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. याबरोबरच बीड जिल्ह्यातील सहा गावे तालुकास्तरावर प्रथम आली आहेत.पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धा २०१९ च्या तालुका व राज्यस्तरीय पारितोषिकांचे वितरण रविवारी पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाले. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील आनोरे (ता. अंमळनेर), वाशिम जिल्ह्यातील बोरव्हा खुर्द (ता. मंगरूळ पीर) आणि बीड जिल्ह्यातील देवºयाची वाडी (ता. बीड ) या गावांना राज्य पातळीवरील तिसरे पारितोषिक मिळाले. संयुक्तपणे ४० लाख रूपये व प्रमाणपत्र असे या पारितोषकाचे स्वरूप आहे. तसेच बीड जिल्ह्यातील गिरवली आपेट (ता. अंबाजोगाई), सराटेवडगाव (ता. आष्टी), नामेवाडी (ता. केज), मोठेवाडी (ता. धारूर), सरफराजपूर (ता. परळी), आणि मांडवखेल (ता. बीड) या सहा गावांना तालुकास्तरावरील पहिले पारितोषिक मिळाले आहे.चौथ्या वॉटर कप स्पर्धेत बीड जिल्ह्यातील ६ तालुक्यांचा समावेश होता. बीड तालुक्याचा प्रथमच या स्पर्धेत सहभाग असताना तालुक्यातील देवºयाची वाडी या गावाने उत्कृष्ट काम करून राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १५ गावांची निवड झाली होती. केलेल्या श्रमदानामुळे गावे दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करतीलच मात्र वॉटर कप पुरस्कारामुळे गावाच्या विकासाला नवा आकार मिळणार आहे.तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणेबीड - देवºयाची वाडी (प्रथम) मांडाखेल (द्वितीय), गुंदेवाडी (तृतीय), आष्टी - सराटे वडगाव, पांगुळ, शेरी बु., धारुर - मोठेवाडी, मोरफळी, सोनीमोहा, केज - नामेवाडी, पाथरा, आवसगाव, परळी - सरफराजपूर, गोपाळपूर, संगम, अंबाजोगाई-गिरवली आपेट, ममदापूर, धानोराग्रामस्थांच्या एकजुटीचे यशस्पर्धेत जरी तिसरा क्र मांक पटकावला असला तरी वितरणावेळी मात्र पहिला बहुमान मिळाला. या यशाचा आनंद ग्रामस्थांनी गावात ढोलताशे व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी एकजूट होऊन दुष्काळावर मात करण्यासाठी प्रचंड मेहनतीने श्रमदान केले. यामध्ये गावातील आबालवृद्ध तसेच महिलांनी मोठया संख्येने सहभागी होऊन श्रमदान केल्याने गावाचा महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक आला. हा सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे संभाजी सुर्वे म्हणाले.

टॅग्स :BeedबीडWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा