शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावांमध्ये १५८४ व्यक्तींनी भरला अधिकच्या क्षेत्रावर विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 18:52 IST

पीकविमा भरताना बोगसगिरी उघड

ठळक मुद्देसर्वेक्षणात समोर आला प्रकार  बोगसगिरी केल्यामुळे इतर शेतकऱ्यांना बसतो फटका  

बीड : पीक विमा योजनेत विमा कंपनीकडून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत तसेच शेतकऱ्यांची फरपट केली जात आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील ५ गावांमध्ये केलेल्या सॅम्पल सर्वेक्षणात काही लोकांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत बोगसगिरी केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील  पाच गावांत आठ अ प्रमाणे कमी क्षेत्रफळ असताना देखील जास्तीच्या क्षेत्रफळावर पिकविमा भरला आहे तर ज्यांना शेतीच नाही अशा १६८६ पीक विमा भरल्याचे समोर आले आहे. अशा लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

बीड जिल्ह्यातील काही भागात पीक विमा योजनेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच गावात सॅम्पल सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार घाटनांदूर , अंबाजोगाई (ग्रामीण ), बदार्पूर , पूस आणि पट्टीवडगाव ही मोठ्याप्रमाणात विमा भरलेलेली गावे निवडण्यात आली होती. या गावातील विमा भरलेल्या प्रत्येक खातेदाराचे क्षेत्रनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. यात काही ठिकाणी सुरु असलेली बोगसगिरी समोर आली आहे. अंबाजोगाईचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. 

घटनांदूर २४३, अंबाजोगाई ग्रामीण ९५६, बर्दापूर २३०, पट्टीवडगाव २१७ , पूस ३६ इतक्या व्यक्तींनी विमा भरला. मात्र त्यांच्या नावे शेत जमीन असल्याचे सर्वेमध्ये उघड झाले आहे. त्याच प्रमाणे याच ५ गावांमध्ये १५८४ शेतकऱ्यांनी क्षेत्रापेक्षा जास्त विमा भरल्याचे समोर आले आहे. घटनांदूर, पट्टीवडगाव आणि पूस या गावांमध्ये लागवडीयोग्य क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात विमा भरण्यात आला असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बोगसगिरी केल्यामुळे इतर शेतकऱ्यांना बसतो फटका  पीकविमा योजनेतून गैरप्रकार करून लाभ घेतल्याचे समोर आल्यामुळे, जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांचा पीक विमा जाहीर झाला, मात्र परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात कंपनीने अद्याप विमा जाहीर केलेला नाही.विमा संरक्षित क्षेत्र वाढते. हे लागवडीयोग्य किंवा पेरणी झालेल्या क्षेत्रापेक्षा जास्त दिसून आले की नुकसानभरपाईची जबाबदारी टाळण्यासाठी विमा कंपनी सर्रास सर्वांनाच ह्यओव्हर इन्शुअरन्सह्ण च्या नावाखाली विमा नाकारते. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना मात्र फटका बसतो.

कंपनीनेने केलेला सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा प्रशासनस प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, मात्र, जास्तीचे क्षेत्र दाखवून किंवा शेती नसताना पीकविमा भरु नये असे प्रकार पुढे आले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते    - रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी बीड  

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCrop Insuranceपीक विमा