शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

उपद्रवींवर प्रतिबंध केल्याने प्रथमच निवडणूक ‘निर्विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:16 IST

जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही बीड लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली. यावेळी मतदानाच्या दिवशी कसलाही गडबड गोंधळ न होता निर्विघ्नपणे ही प्रक्रिया शांततेत पार पडली.

ठळक मुद्देबीड लोकसभा निवडणूक : २०१४ ला २८ गुन्हे, यावेळेस मात्र किरकोळ २ घटना

बीड : जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही बीड लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली. यावेळी मतदानाच्या दिवशी कसलाही गडबड गोंधळ न होता निर्विघ्नपणे ही प्रक्रिया शांततेत पार पडली. मागील महिनाभरपासून पोलिसांनी केलेले नियोजन आणि उपद्रवींवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांमुळे हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत २८ गुन्हे दाखल झाले होते. यावेळेस मात्र किरकोळ २ घटना घडल्या आहेत. यावरून निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था सुरळीत व शांततेत पार पडल्याचे स्पष्ट होते. जाणकारांच्या माहितीनुसार असे पहिल्यांदाच घडल्याचे सांगण्यात येते.बीड जिल्ह्यातील राजकारणाची राज्यभर चर्चा होते. यावेळीही ही चर्चा कायम होती. राजकीय चर्चा होत असली तरी प्रशासनाकडूनही ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीपर्यंतचे सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एक प्रकार वगळता ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान, निवडणूक काळात आचारसंहिता भंगाचे दोन आणि इतर तीन असे पाच गुन्हे दाखल झाले. मात्र, मतदानाच्या दिवशी गुन्हा घडू न देता दप्तर कोरे ठेवण्यात पोलिसांना यश आले. अंबाजोगाई ग्रामीण ठाणे हद्दीत मद्यपीने घातलेला गोंधळ आणि नेकनूर ठाणे हद्दीत झालेली शिवीगाळ हे अपवादात्मक किरकोळ प्रकार सोडले तर मतदान शांततेत झाले.दरम्यान, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सर्व ठाणेदारांची बैठक घेतली. सर्व उपद्रवी, गुन्हेगारांची यादी मागविली. त्यांच्या गुन्ह्यांनुसार त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया, एमपीडीए, हद्दपारीसारख्या कारवाया केल्या. यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यासह अपर अधीक्षक विजय कबाडे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणे प्रमुख यांनी तत्पर केलेला बंदोबस्त, यामुळेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे सांगण्यात आले.पोलिसांचे नियोजन : पहिली फेरी फत्ते; दुसरी फेरी २३ मे रोजीबीड पोलिसांच्या माहितीनुसार ८ एप्रिलपर्यंत जुगार, दारूसह इतर गुन्हे करणाऱ्या ११ टोळ्यांमधील ५६ गुन्हेगारांवर मपोका ५५ व ५६ नुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवैध शस्त्र बाळगणाºया ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.३ अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई करून त्यांना स्थानबद्ध केले आणि औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात त्यांची रवानगी केली.दारूबंदी व जुगार अड्डयांवरही धाडी टाकल्या. यामध्ये दारूबंदीच्या ५५१ केसेस करून ४६ हजार ४०९ लिटर म्हणजेच १६ लाख ५६ हजार ५७० रूपयांची दारू जप्त केली आहे.७० जुगार अड्डयांवर धाडी टाकून ११२६ आरोपी ताब्यात घेत त्यांना न्यायालसमोर हजर करण्यात आले आहे. ११२६ आरोपींना अजामीनपत्र वॉरन्टही बजावण्यात आले आहेत.पाहिजे/फरारी असलेल्या १०४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ३२१७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.याबाबरोबरच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला सोबत घेऊन ६ ठिकाणी तर पोलिसांच्या विविध तुकड्या घेऊन ४ अशा जिल्ह्यात १० ठिकाणी पथसंचलन करण्यात आले आहे. तसेच दंगल नियंत्रणाची रंगीत तालीमही करण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडPoliceपोलिसVotingमतदान