शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

घराला आग लागली, राख झाल्यानंतर मदत करणार काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:24 IST

बीड : आठ- नऊ महिन्यांपासून शेतकरी व जनता होरपळत असताना दुष्काळप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा आरोप माकपच्या पॉलीट ब्यूरो सदस्य ...

ठळक मुद्देवृंदा कारत : सरकारने ‘जुमलेबाजी’ बाजूला ठेवून तात्काळ दुष्काळी उपाय करावेत

बीड : आठ- नऊ महिन्यांपासून शेतकरी व जनता होरपळत असताना दुष्काळप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा आरोप माकपच्या पॉलीट ब्यूरो सदस्य वृंदा कारत यांनी केला. जुमलाबाजी बाजूला ठेवून वास्तवाचे भान राखून सरकारने दुष्काळी उपायोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळाचा संदर्भ देत सध्या घरात आग लागली आहे, राख झाल्यानंतर मदत पुरविण्यात काय अर्थ आहे? असे कारत म्हणाल्या.बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी शनिवारपासून त्या दौऱ्यावर आहेत. १८ गावांमधील विदारक स्थितीचे अवलोकन केल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकाºयांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी माकपचे मोहन जाधव, पी. एस. घाडगे, उत्तम माने, प्रा. मारुती वाघमारे आदी उपस्थित होते.या वेळी कारत म्हणाल्या, सरकारने दोन महिन्यांपूर्वी दुष्काळ जाहीर केला पण मदतकार्य अद्याप सुरु झालेले नाही. पुढच्या दोन महिन्यात दुष्काळाचा त्रास वाढून आणीबाणी निर्माण होईल. स्थलांतर वाढलेआहे. मनरेगा कायद्यानुसार २०० दिवस कामाची संधी आहे. मात्र, यातील १०० दिवस काम मिळालेल्यांची संख्या केवळ ३५ ते ४० टक्के आहे. उर्वरित संख्या तर त्याहीपेक्षा कमी आहे. मोदी सरकार निधी उपलब्ध करुन देत नाही, मग संसदेत २०० दिवस कामाच्या हमीची घोषणा का केली ? असे त्या म्हणाल्या.एकीकडे जिल्हाधिकाºयांना मर्यादीत अधिकार व सरकारची उदासीनता पाहता खासदार, आमदार, पदाधिकाºयांनी आवाज उठविण्याची गरज आहे. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी नियोजन महत्वाचे आहे. ‘यह सरकार उठाने से भी नहीं उठती’ या शब्दात दुष्काळप्रश्नी सरकारचे हे धोरण अत्याचारासारखे आहे. दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी केंद्राच्या निकषांमध्ये बदलाची गरज आहे. मागणीप्रमाणे काम हवे असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, शेतकरीदेखील काम मागत आहे. मजुरीच्या दरात वाढीची गरज आहे. तसेच नियोजनपूर्वक वाडी- तांड्यावर पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सरकारची आहे.

टॅग्स :BeedबीडGovernmentसरकार