शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

घराला आग लागली, राख झाल्यानंतर मदत करणार काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:24 IST

बीड : आठ- नऊ महिन्यांपासून शेतकरी व जनता होरपळत असताना दुष्काळप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा आरोप माकपच्या पॉलीट ब्यूरो सदस्य ...

ठळक मुद्देवृंदा कारत : सरकारने ‘जुमलेबाजी’ बाजूला ठेवून तात्काळ दुष्काळी उपाय करावेत

बीड : आठ- नऊ महिन्यांपासून शेतकरी व जनता होरपळत असताना दुष्काळप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा आरोप माकपच्या पॉलीट ब्यूरो सदस्य वृंदा कारत यांनी केला. जुमलाबाजी बाजूला ठेवून वास्तवाचे भान राखून सरकारने दुष्काळी उपायोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळाचा संदर्भ देत सध्या घरात आग लागली आहे, राख झाल्यानंतर मदत पुरविण्यात काय अर्थ आहे? असे कारत म्हणाल्या.बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी शनिवारपासून त्या दौऱ्यावर आहेत. १८ गावांमधील विदारक स्थितीचे अवलोकन केल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकाºयांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी माकपचे मोहन जाधव, पी. एस. घाडगे, उत्तम माने, प्रा. मारुती वाघमारे आदी उपस्थित होते.या वेळी कारत म्हणाल्या, सरकारने दोन महिन्यांपूर्वी दुष्काळ जाहीर केला पण मदतकार्य अद्याप सुरु झालेले नाही. पुढच्या दोन महिन्यात दुष्काळाचा त्रास वाढून आणीबाणी निर्माण होईल. स्थलांतर वाढलेआहे. मनरेगा कायद्यानुसार २०० दिवस कामाची संधी आहे. मात्र, यातील १०० दिवस काम मिळालेल्यांची संख्या केवळ ३५ ते ४० टक्के आहे. उर्वरित संख्या तर त्याहीपेक्षा कमी आहे. मोदी सरकार निधी उपलब्ध करुन देत नाही, मग संसदेत २०० दिवस कामाच्या हमीची घोषणा का केली ? असे त्या म्हणाल्या.एकीकडे जिल्हाधिकाºयांना मर्यादीत अधिकार व सरकारची उदासीनता पाहता खासदार, आमदार, पदाधिकाºयांनी आवाज उठविण्याची गरज आहे. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी नियोजन महत्वाचे आहे. ‘यह सरकार उठाने से भी नहीं उठती’ या शब्दात दुष्काळप्रश्नी सरकारचे हे धोरण अत्याचारासारखे आहे. दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी केंद्राच्या निकषांमध्ये बदलाची गरज आहे. मागणीप्रमाणे काम हवे असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, शेतकरीदेखील काम मागत आहे. मजुरीच्या दरात वाढीची गरज आहे. तसेच नियोजनपूर्वक वाडी- तांड्यावर पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सरकारची आहे.

टॅग्स :BeedबीडGovernmentसरकार