शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

गेवराई तालुक्यातील  पंधरा गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:27 IST

तालुक्यातील लुखामसला येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधील ५ एमव्ही पॉवर ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे रेवकी-देवकी सर्कलमधील पंधराहून अधिक गावे पाच दिवसांपासून अंधारात आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे दुर्लक्ष : पाणी असतानाही विजेविना शेतीला देता येईना

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील लुखामसला येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधील ५ एमव्ही पॉवर ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे रेवकी-देवकी सर्कलमधील पंधराहून अधिक गावे पाच दिवसांपासून अंधारात आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सध्या उजव्या कालव्याला पाणी सोडलेले असताना विजेअभावी शेतीपंप बंद असल्याने पिकांचे देखील नुकसान होत आहे. तरी याकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.यावर्षी पावसाअभावी शेतकरी हवालदिल झालेला आहे.दरम्यान, सध्या शेतीसाठी पैठणच्या धरणातून उजव्या कालव्यात पाणी सोडलेले आहे. तालुक्यातील रेवकी सर्कमधील १५ हून अधिक गावातून हा कालवा गेलेला असून, हा कालवा सध्या तुडूंब भरु न वाहत आहे. मात्र रेवकी सर्कमधील गावांना वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या लुखामसाला येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील पाच एमव्हीचा ट्रान्सफार्मर पाच दिवसांपूर्वी जळाला आहे.विजेअभावी शेतीपंप बंद आहेत. परिणामी शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील दळणवळणासह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज ट्रान्सफार्मर दुरुस्त करुन प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे. १५ हून अधिक गावे अंधारात असताना देखील महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दोन दिवसात ट्रान्सफार्मर कार्यान्वित कराएकीकडे पाऊस नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. तर कालव्याला पाणी आलेले असताना विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना शेतकºयांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे याप्रकरणी आ. लक्ष्मण पवार, रेवकी गटाच्या जि.प. सदस्या सविता बाळासाहेब मस्के यांच्याकडे शेतकºयांनी गाºर्हाणे मांडताच त्यांनी दोन दिवसांत लुखामसाला येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधील जळालेला ट्रान्सफार्मर कार्यान्वित करा, असे आदेश वीजवितरण कार्यालय, बीड यांना दिले आहेत. यावेळी या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण