शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या किंमतीत ३०० ते ४०० रूपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:35 IST

अविनाश कदम आष्टी : कोरोना लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळे संपूर्ण देशात व शेतकरी उदध्वस्त झालेला असताना आता केंद्र सरकारने रासायनिक ...

अविनाश कदम

आष्टी : कोरोना लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळे संपूर्ण देशात व शेतकरी उदध्वस्त झालेला असताना आता केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे सात एप्रिल पासून खतांच्या किंमतीमध्ये प्रति बॅग ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थ चक्राला मोठा दणका बसणार असून या दरवाढीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

इफको कंपनीने खतांच्या किंमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताच्या ५० किलो बॅगला आता १९०० रुपये मोजावे लागणार आहे. याआधी या बॅगची किंमत १३०० रुपये होती. तसेच १०:२६ :२६ या खताची किंमत १७७५ रुपये झाली असून यापूर्वी या खताची किंमत ११७५ रुपये होती. १५ :१५ या खताची किंमत पंधराशे रुपये प्रति बॅग झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत १ हजार रुपये प्रति बॅग होती. १२: ३२ : १६ हे खत १२५० रूपयांना मिळत होते. आता या खताच्या बॅगला १८०० रुपये लागणार आहेत. २०: २० : ० खताची किंमत ९५० होती, ती आता १३५० रुपये झाली आहे.

काळाबाजार रोखण्याची गरज

तब्बल पाचशे ते सहाशे रुपये प्रमाणे खताच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे अजून इतर कंपन्यांनी आपले दर जाहीर केलेले नाहीत. सध्या बाजारात जुन्या दराचे लाखो मेट्रीक टन खते गोदामामध्ये असून या सर्व खतांचा खत विक्रेत्यांकडून काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकरी संतप्त

गेल्या पंधरा वीस वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात खतांच्या किंमती कधीच वाढलेल्या नव्हत्या. रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखवली त्यामुळे रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतात प्रचंड दरवाढ केल्याचे बोलले जात आहे. खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांत मात्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

आज इफ्को कंपनीचे नवीन खताचे दर पत्रक पाहिले बघून धक्काच बसला. खते महाग झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे होईल. खत वापराचे प्रमाण कमी होईल. परिणामी शेतकऱ्यांची उत्पादने कमी होतील. या दरवाढीचा मी निषेध करतो. -

कैलास आंधळे ,प्रगतशील शेतकरी आंधळेवाडी ता. आष्टी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आयात होणारी खते बंद झाली आहेत. फॉस्फरिक ऍसिडच्या किमती जागतिक बाजारात गगनाला भिडल्याने ही दरवाढ अटळ आहे. केंद्र शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे किंवा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात खताचे अनुदान जमा करावे म्हणजे खताचा काळाबाजार कमी होईल आणि हवे तेवढेच शेतकरी खताचा वापर करतील

-

अनिल मेहेर, अध्यक्ष, आष्टी तालुका खते बियाणे असोसिएशन.