शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खतांच्या किंमतीत ३०० ते ४०० रूपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:35 IST

अविनाश कदम आष्टी : कोरोना लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळे संपूर्ण देशात व शेतकरी उदध्वस्त झालेला असताना आता केंद्र सरकारने रासायनिक ...

अविनाश कदम

आष्टी : कोरोना लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळे संपूर्ण देशात व शेतकरी उदध्वस्त झालेला असताना आता केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे सात एप्रिल पासून खतांच्या किंमतीमध्ये प्रति बॅग ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थ चक्राला मोठा दणका बसणार असून या दरवाढीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

इफको कंपनीने खतांच्या किंमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताच्या ५० किलो बॅगला आता १९०० रुपये मोजावे लागणार आहे. याआधी या बॅगची किंमत १३०० रुपये होती. तसेच १०:२६ :२६ या खताची किंमत १७७५ रुपये झाली असून यापूर्वी या खताची किंमत ११७५ रुपये होती. १५ :१५ या खताची किंमत पंधराशे रुपये प्रति बॅग झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत १ हजार रुपये प्रति बॅग होती. १२: ३२ : १६ हे खत १२५० रूपयांना मिळत होते. आता या खताच्या बॅगला १८०० रुपये लागणार आहेत. २०: २० : ० खताची किंमत ९५० होती, ती आता १३५० रुपये झाली आहे.

काळाबाजार रोखण्याची गरज

तब्बल पाचशे ते सहाशे रुपये प्रमाणे खताच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे अजून इतर कंपन्यांनी आपले दर जाहीर केलेले नाहीत. सध्या बाजारात जुन्या दराचे लाखो मेट्रीक टन खते गोदामामध्ये असून या सर्व खतांचा खत विक्रेत्यांकडून काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकरी संतप्त

गेल्या पंधरा वीस वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात खतांच्या किंमती कधीच वाढलेल्या नव्हत्या. रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखवली त्यामुळे रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतात प्रचंड दरवाढ केल्याचे बोलले जात आहे. खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांत मात्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

आज इफ्को कंपनीचे नवीन खताचे दर पत्रक पाहिले बघून धक्काच बसला. खते महाग झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे होईल. खत वापराचे प्रमाण कमी होईल. परिणामी शेतकऱ्यांची उत्पादने कमी होतील. या दरवाढीचा मी निषेध करतो. -

कैलास आंधळे ,प्रगतशील शेतकरी आंधळेवाडी ता. आष्टी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आयात होणारी खते बंद झाली आहेत. फॉस्फरिक ऍसिडच्या किमती जागतिक बाजारात गगनाला भिडल्याने ही दरवाढ अटळ आहे. केंद्र शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे किंवा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात खताचे अनुदान जमा करावे म्हणजे खताचा काळाबाजार कमी होईल आणि हवे तेवढेच शेतकरी खताचा वापर करतील

-

अनिल मेहेर, अध्यक्ष, आष्टी तालुका खते बियाणे असोसिएशन.