शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

खतांच्या किंमतीत ३०० ते ४०० रूपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:35 IST

अविनाश कदम आष्टी : कोरोना लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळे संपूर्ण देशात व शेतकरी उदध्वस्त झालेला असताना आता केंद्र सरकारने रासायनिक ...

अविनाश कदम

आष्टी : कोरोना लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळे संपूर्ण देशात व शेतकरी उदध्वस्त झालेला असताना आता केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे सात एप्रिल पासून खतांच्या किंमतीमध्ये प्रति बॅग ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थ चक्राला मोठा दणका बसणार असून या दरवाढीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

इफको कंपनीने खतांच्या किंमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताच्या ५० किलो बॅगला आता १९०० रुपये मोजावे लागणार आहे. याआधी या बॅगची किंमत १३०० रुपये होती. तसेच १०:२६ :२६ या खताची किंमत १७७५ रुपये झाली असून यापूर्वी या खताची किंमत ११७५ रुपये होती. १५ :१५ या खताची किंमत पंधराशे रुपये प्रति बॅग झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत १ हजार रुपये प्रति बॅग होती. १२: ३२ : १६ हे खत १२५० रूपयांना मिळत होते. आता या खताच्या बॅगला १८०० रुपये लागणार आहेत. २०: २० : ० खताची किंमत ९५० होती, ती आता १३५० रुपये झाली आहे.

काळाबाजार रोखण्याची गरज

तब्बल पाचशे ते सहाशे रुपये प्रमाणे खताच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे अजून इतर कंपन्यांनी आपले दर जाहीर केलेले नाहीत. सध्या बाजारात जुन्या दराचे लाखो मेट्रीक टन खते गोदामामध्ये असून या सर्व खतांचा खत विक्रेत्यांकडून काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकरी संतप्त

गेल्या पंधरा वीस वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात खतांच्या किंमती कधीच वाढलेल्या नव्हत्या. रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखवली त्यामुळे रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतात प्रचंड दरवाढ केल्याचे बोलले जात आहे. खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांत मात्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

आज इफ्को कंपनीचे नवीन खताचे दर पत्रक पाहिले बघून धक्काच बसला. खते महाग झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे होईल. खत वापराचे प्रमाण कमी होईल. परिणामी शेतकऱ्यांची उत्पादने कमी होतील. या दरवाढीचा मी निषेध करतो. -

कैलास आंधळे ,प्रगतशील शेतकरी आंधळेवाडी ता. आष्टी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आयात होणारी खते बंद झाली आहेत. फॉस्फरिक ऍसिडच्या किमती जागतिक बाजारात गगनाला भिडल्याने ही दरवाढ अटळ आहे. केंद्र शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे किंवा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात खताचे अनुदान जमा करावे म्हणजे खताचा काळाबाजार कमी होईल आणि हवे तेवढेच शेतकरी खताचा वापर करतील

-

अनिल मेहेर, अध्यक्ष, आष्टी तालुका खते बियाणे असोसिएशन.