शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पोटच्या मुलींवर अत्याचार करणार्‍या बापास सक्त मजुरी; आष्टी तालुक्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 16:31 IST

पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार करणार्‍या नराधम बापास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष सत्र  न्या. बी. व्ही. वाघ यांनी ठोठावली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना ३० डिसेंबर २०१४ रोजी आष्टी तालुक्यात घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.

बीड : पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार करणार्‍या नराधम बापास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष सत्र  न्या. बी. व्ही. वाघ यांनी ठोठावली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना ३० डिसेंबर २०१४ रोजी आष्टी तालुक्यात घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.

या प्रकरणात पीडित मुली १२ व १६ वर्षाच्या आहेत. मोठ्या मुलीवर या बापाची नजर गेली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मोठ्या मुलीवर अत्याचारास सुरुवात केली. अनेक दिवस मोठी मुलगी बदनामीपोटी गप्प राहिली. तिच्या गप्प राहण्याचा फायदा घेत त्याने छोट्या मुलीकडे मोर्चा वळवला. मोठी मुलगी शाळेत व त्यांची आई बाहेर गेल्यानंतर तो तिच्याशी लगट करायचा. यातून तिला धमक्या देत अत्याचार करु लागला.

ही बाब पीडित मुलींनी आईला सांगितली. आईलाही हा प्रकार ऐकून धक्का बसला. तिने धीर धरत या नराधम बापाविरुद्ध आष्टी ठाण्यात फिर्याद नोंदवली. पीडित मुलींनीही तक्रार दिली. त्यानुसार नराधम बापावर कलम ३७६ (२) (एच), ३२३, ५०४, ५०६ भादंवि, कलम ४, ६, ११ लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम, २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. आष्टी ठाण्याचे तत्कालीन पो. नि. दिनेश आहेर यांनी या प्रकरणाच्या तपासास सुरुवात केली. तपासाअंती दोषारोप पत्र विशेष न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी बीड येथील विशेष न्या. व अति. जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांच्या न्यायालयात झाली.

सरकारी पक्षाच्या वतीने १२ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार, परिस्थितीजन्य पुराव्यांचे अवलोकन करुन जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी युक्तिवाद केला. त्यावरुन बापास लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम, २०१२ चे कलम ५ (एन) व भादंविचे कलम ३७६, ५०६, ५११, ३२३ प्रमाणे दोषी ठरवत १० व ५ वर्षे एकत्रित सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील अजय राख यांना सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे, नामदेव साबळे व इतर सहायक सरकारी वकिलांनी सहकार्य केले. तपास अधिकारी म्हणून दिनेश आहेर यांनी काम पाहिले.

वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले

पीडित मुली, आईची साक्ष महत्त्वपूर्ण बहुतांश प्रकरणात न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर फिर्यादी साक्ष बदलात. मात्र, येथे पीडित मुलींनी दिलेली साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. तसेच त्यांच्या आईची साक्षही महत्त्वाची ठरली. या साक्षीबरोबरच वैद्यकीय पुरावेही बापास शिक्षा देण्यास महत्त्वाचे ठरले.