शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST

कडा : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यास ऐन बहरात आलेली गहू,हरभरा, मका, कांदा ही पिके वाया ...

कडा : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यास ऐन बहरात आलेली गहू,हरभरा, मका, कांदा ही पिके वाया जाण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

यावर्षी पाऊस जोरदार पडल्याने तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर रबीची पेरणी झाली. कमी पाण्यात लवकर येणाऱ्या गव्हाच्या जाती उपलब्घ असल्यानेही गव्हाचे क्षेत्र वाढलेले आहे. मात्र, रबी हंगामावर यावर्षी ढगाळ वातावरणाचे सावट आहे. रोगांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागली. त्यातच चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. शिवाय सकाळी दाट धुक्याची चादर पडत असल्याने रबी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. येथील कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांना विचारणा केली असता सध्या ढगाळ वातावरणामुळे अळी व किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो यापासून बचाव करण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात असे त्यांनी सांगितले.

आभाळाचा कांद्यावर परिणाम

मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर गगनाला भिडल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. सहा हजार रुपये किलोप्रमाणे बियाणे खरेदी करून कांद्याची लागवड केलेली आहे. मात्र, आठ दिवसांपासून आष्टी तालुक्यात सूर्यदर्शनच झाले नाही. ढगाळ वातावरणाचा कांद्याच्या पिकावर मोठा परिणाम झालेला आहे. शेतातच कांद्याचे रोपे जागेवर जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

हरभरा पडतोय पिवळा

हरभराही ढगाळ वातावरणाने पिवळा पडला आहे. या रोगापासून बचावासाठी शेतकऱ्यांना आता औषध फवारणी करणे गरजेचे झाले आहे. ज्वारी पिकावरही ढगाळ वातावरणाचा मोठा परिणाम झालेला पहावयास मिळत आहे. ज्वारीला सध्या दाणे भरत असून अनेक ठिकाणी चिकटा रोग पडल्याने ज्वारीचे पीकही धोक्यात आले आहे. तर ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने गव्हावर मावा आला आहे. काही भागांत गव्हावर अळीचाही प्रादुर्भाव झाला आहे.

उत्पन्न घटण्याची भीती

गेल्या आठवड्यात सतत ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एवढेच नव्हे, तर जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी थंडी अजूनही वाढलेली नाही. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे.

- हरिभाऊ सांगळे ,शेतकरी.

पाणी आहे तर निसर्ग साथ देईना

मागील तीन वर्षे दुष्काळात गेल्याने नियोजित पिके घेता आली नाहीत. यावर्षी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले आहे. परिणामी यावर्षी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावरदेखील पाणी फेरते की काय? या धास्तीने शेतकरीवर्ग सध्या चिंतेत आहे.

-अनंत कर्डीले , शेतकरी.