शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST

कडा : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यास ऐन बहरात आलेली गहू,हरभरा, मका, कांदा ही पिके वाया ...

कडा : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यास ऐन बहरात आलेली गहू,हरभरा, मका, कांदा ही पिके वाया जाण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

यावर्षी पाऊस जोरदार पडल्याने तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर रबीची पेरणी झाली. कमी पाण्यात लवकर येणाऱ्या गव्हाच्या जाती उपलब्घ असल्यानेही गव्हाचे क्षेत्र वाढलेले आहे. मात्र, रबी हंगामावर यावर्षी ढगाळ वातावरणाचे सावट आहे. रोगांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागली. त्यातच चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. शिवाय सकाळी दाट धुक्याची चादर पडत असल्याने रबी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. येथील कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांना विचारणा केली असता सध्या ढगाळ वातावरणामुळे अळी व किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो यापासून बचाव करण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात असे त्यांनी सांगितले.

आभाळाचा कांद्यावर परिणाम

मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर गगनाला भिडल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. सहा हजार रुपये किलोप्रमाणे बियाणे खरेदी करून कांद्याची लागवड केलेली आहे. मात्र, आठ दिवसांपासून आष्टी तालुक्यात सूर्यदर्शनच झाले नाही. ढगाळ वातावरणाचा कांद्याच्या पिकावर मोठा परिणाम झालेला आहे. शेतातच कांद्याचे रोपे जागेवर जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

हरभरा पडतोय पिवळा

हरभराही ढगाळ वातावरणाने पिवळा पडला आहे. या रोगापासून बचावासाठी शेतकऱ्यांना आता औषध फवारणी करणे गरजेचे झाले आहे. ज्वारी पिकावरही ढगाळ वातावरणाचा मोठा परिणाम झालेला पहावयास मिळत आहे. ज्वारीला सध्या दाणे भरत असून अनेक ठिकाणी चिकटा रोग पडल्याने ज्वारीचे पीकही धोक्यात आले आहे. तर ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने गव्हावर मावा आला आहे. काही भागांत गव्हावर अळीचाही प्रादुर्भाव झाला आहे.

उत्पन्न घटण्याची भीती

गेल्या आठवड्यात सतत ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एवढेच नव्हे, तर जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी थंडी अजूनही वाढलेली नाही. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे.

- हरिभाऊ सांगळे ,शेतकरी.

पाणी आहे तर निसर्ग साथ देईना

मागील तीन वर्षे दुष्काळात गेल्याने नियोजित पिके घेता आली नाहीत. यावर्षी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले आहे. परिणामी यावर्षी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावरदेखील पाणी फेरते की काय? या धास्तीने शेतकरीवर्ग सध्या चिंतेत आहे.

-अनंत कर्डीले , शेतकरी.