शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST

कडा : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यास ऐन बहरात आलेली गहू,हरभरा, मका, कांदा ही पिके वाया ...

कडा : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यास ऐन बहरात आलेली गहू,हरभरा, मका, कांदा ही पिके वाया जाण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

यावर्षी पाऊस जोरदार पडल्याने तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर रबीची पेरणी झाली. कमी पाण्यात लवकर येणाऱ्या गव्हाच्या जाती उपलब्घ असल्यानेही गव्हाचे क्षेत्र वाढलेले आहे. मात्र, रबी हंगामावर यावर्षी ढगाळ वातावरणाचे सावट आहे. रोगांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागली. त्यातच चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. शिवाय सकाळी दाट धुक्याची चादर पडत असल्याने रबी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. येथील कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांना विचारणा केली असता सध्या ढगाळ वातावरणामुळे अळी व किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो यापासून बचाव करण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात असे त्यांनी सांगितले.

आभाळाचा कांद्यावर परिणाम

मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर गगनाला भिडल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. सहा हजार रुपये किलोप्रमाणे बियाणे खरेदी करून कांद्याची लागवड केलेली आहे. मात्र, आठ दिवसांपासून आष्टी तालुक्यात सूर्यदर्शनच झाले नाही. ढगाळ वातावरणाचा कांद्याच्या पिकावर मोठा परिणाम झालेला आहे. शेतातच कांद्याचे रोपे जागेवर जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

हरभरा पडतोय पिवळा

हरभराही ढगाळ वातावरणाने पिवळा पडला आहे. या रोगापासून बचावासाठी शेतकऱ्यांना आता औषध फवारणी करणे गरजेचे झाले आहे. ज्वारी पिकावरही ढगाळ वातावरणाचा मोठा परिणाम झालेला पहावयास मिळत आहे. ज्वारीला सध्या दाणे भरत असून अनेक ठिकाणी चिकटा रोग पडल्याने ज्वारीचे पीकही धोक्यात आले आहे. तर ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने गव्हावर मावा आला आहे. काही भागांत गव्हावर अळीचाही प्रादुर्भाव झाला आहे.

उत्पन्न घटण्याची भीती

गेल्या आठवड्यात सतत ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एवढेच नव्हे, तर जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी थंडी अजूनही वाढलेली नाही. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे.

- हरिभाऊ सांगळे ,शेतकरी.

पाणी आहे तर निसर्ग साथ देईना

मागील तीन वर्षे दुष्काळात गेल्याने नियोजित पिके घेता आली नाहीत. यावर्षी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले आहे. परिणामी यावर्षी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावरदेखील पाणी फेरते की काय? या धास्तीने शेतकरीवर्ग सध्या चिंतेत आहे.

-अनंत कर्डीले , शेतकरी.