शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

माजलगावात शेतकऱ्यांचा कापसाच्या मापासाठी चार तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 18:25 IST

आणखी एक खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा

ठळक मुद्देकापसाची वाहने ग्रेडिंगसाठी सोडण्यात आली

माजलगाव : येथे कापूस घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असताना पणन महासंघाकडून केवळ दोनच कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. यामुळे   शुक्रवारी दुपारी टीएमसी केंद्रावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेवटी  रमेश आडसकर यांच्या पुढाकाराने यार्डमध्ये उभी असलेली कापसाची वाहने ग्रेडिंगसाठी सोडण्यात आली तर आणखी एक खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

तालुक्यात यावर्षी कापसाचे प्रचंड उत्पादन झाले असून त्यामुळे शेतकरी खुष आहे. मात्र आपला कापूस खरेदी केंद्रावर घालण्यासाठी शेतकरी दररोज खेटे मारत असून तालुक्यात अंबादास व मनकॉट जिनींग या दोन ठिकाणीच शासकीय खरेदी सुरू आहे. त्यामुळे तेथे शेतकऱ्यांनी कापूस घालून आणलेल्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असल्याचे चित्र आहे. परंतु या ठिकाणी ग्रेडर अनंत मोरेची मनमानी सुरू असल्याने शेतकऱ्यांना चार-चार दिवसांपासून वाहनांचे भाडे भरत दिवसरात्र तिष्ठत राहावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला. शुक्रवारी दुपारी टीएमसी केंद्रावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

याची माहिती मिळताच  भाजप नेते रमेश आडसकर यांनी तेथे जात शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. तात्काळ संबंधित अधिकारी व ग्रेडर यांना प्रकरणाचे गांभीर्य सांगून इतर दोन खरेदी केंद्र सुरू करावयास भाग पाडले. तात्काळ पूर्वा जिनींग सुरू करण्यात आली. तर सोमवारी आणखी एक जिनींग सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली वाहने येथून हलवली. या ठिकाणी  जवळपास चारशे वाहने कापूस तीन खरेदी केंद्रावर विभागून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी रामेश्वर टवानी,रामू चांडक,ईश्वर खुरपे,मनोज फरके उपस्थित होते.

ग्रेडरकडून अडवणूक डीडीआर यांनी प्रत्येक जिनींगला वार ठरवून दिलेले आहेत. तरीही येथील ग्रेडर अनंत मोरे हे जागेचे कारण पुढे करून आमच्या जिनींगसाठी मापे घेण्यास टाळाटाळ करतात. यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आपला कापुस दूरवर घेऊन जाण्याची वेळ येत आहे. - प्रविण चांडक , जिनींग मालक

टॅग्स :BeedबीडcottonकापूसFarmerशेतकरी