शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ऊसतोडणीतसाठी शेतकरी मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST

राजेश राजगूरु तलवाडा शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेतले तरी ते उत्पादित करून बाजारात नेऊन हातात मेहनतीचे पैसे येईपर्यंत संकटे ...

राजेश राजगूरु

तलवाडा

शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेतले तरी ते उत्पादित करून बाजारात नेऊन हातात मेहनतीचे पैसे येईपर्यंत संकटे येणार नाहीत, हे शक्यच नसल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. ऊसतोड मजुरांकडून ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होताना दिसत आहे.यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शेतकरी मात्र भरडला जातोय. शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पैसे येण्याअगोदर या लोकांची भरती करावी लागत असल्याने ऊसतोडणीतही शेतकरी मेटाकुटीला येत आहे.

कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, ज्वारी व इतर पिकांच्या उत्पन्नाची शाश्वती दिवसेंदिवस कमी होत असल्याने तालुक्यातील शेतकरी भरवशाचे पीक म्हणून उसाच्या लागवडीवर भर देत आहे.

इतर पिकांच्या तुलनेत एकरी ३०-४० टनापर्यंत ऊस निघाला तर परवडतो, अशा विश्वासामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

मात्र ऊसतोडणीसाठी एकरी पाच ते दहा हजार रुपयांचा दर या मजुरांनी ठेवलेला आहे. त्यातच प्रत्येक खेपेला वाहनचालकास कारखान्याच्या अंतरानुसार पाचशे ते एक हजार रुपये द्यावे लागत आहेत. ऊस गाळपासाठी नेण्यास शेतकऱ्यांचा विशिष्ट कोड घ्यावा लागतो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जाते. हा गोरखधंदा बिनबोभाटपणे सुरू आहे. याबाबत तक्रार करण्यास कोणताही शेतकरी धजावत नसल्याने या लोकांचे जास्तच फावले आहे.

एकरी १०-१२ हजारांचा खर्च

मजुरांनी ऊसतोडणीचे रेटकार्डच बनवलेले आहेत. यात मजुर एकरी ५-१० हजार,चालक खेपेला ५००-१००० रुपये, एकरी २-३ खेपा जातात. कोडचे १००० रुपये, कारखान्याच्या कर्मचाऱ्यास असा एकरी १०-१२ हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना येत आहे.

मजुरांबद्दल सहानुभती शेतकऱ्यांच्या मुळावर

ऊसतोड कामगारांना मोठ्या कष्टाचे काम करावे लागते. याबाबत सगळीकडून सहानुभूती व आत्मियतेची भावना मिळते.मात्र या मजुरांना कारखान्याकडून टनाप्रमाणे मजुरी मिळते. उसाचे वाढे विकूनही थोडेफार पैसे मिळतात. आणि ऊसतोडणीसाठी शेतकरीही खुशीने एकरी २-३ हजार देत असतात; पण ऊसतोड मजुर शेतकऱ्यांची कीव करताना दिसत नाही. अडवणूक करीत असल्याचे चित्र आहे.

काही कारखान्यांचेच नियंत्रण

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटीवर तसेच कारखान्यांच्या मजुरांवर कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्याने शेतकऱ्यांना आधार मिळत आहे. ऊसतोडणीसाठी मजुरांनी पैसे मागितल्याची तक्रार आल्यास कारखान्याकडून गंभीर दखल घेत शेतकऱ्यांचे पैसे परत देण्यात येतात असा दंडक एक- दोन कारखान्यांनीच ठेवला आहे.

पैसे कमी दिल्यास करतात नुकसान

एखाद्या शेतकऱ्याने या मजुरांना थोडेफार कमी पैसे दिल्यास ऊस जमिनीपासून न तोडता वरूनच तोडणे, वाढ्याला उसाच्या कांड्या ठेवणे, पाचटात टिपरे ठेवणे, अशाप्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान करतात.

प्रतिक्रिया

माझ्या शेतात अडीच एकरात ऊस होता. माझ्याकडे बाहेरील कारखान्याचे मजूर होते. त्या मजुरांना एकरी दहा व चालक मिळून मला ३०,००० रुपये खर्च आला.

- अशोक बेडके, शेतकरी, राजापूर