शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणीतसाठी शेतकरी मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST

राजेश राजगूरु तलवाडा शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेतले तरी ते उत्पादित करून बाजारात नेऊन हातात मेहनतीचे पैसे येईपर्यंत संकटे ...

राजेश राजगूरु

तलवाडा

शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेतले तरी ते उत्पादित करून बाजारात नेऊन हातात मेहनतीचे पैसे येईपर्यंत संकटे येणार नाहीत, हे शक्यच नसल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. ऊसतोड मजुरांकडून ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होताना दिसत आहे.यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शेतकरी मात्र भरडला जातोय. शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पैसे येण्याअगोदर या लोकांची भरती करावी लागत असल्याने ऊसतोडणीतही शेतकरी मेटाकुटीला येत आहे.

कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, ज्वारी व इतर पिकांच्या उत्पन्नाची शाश्वती दिवसेंदिवस कमी होत असल्याने तालुक्यातील शेतकरी भरवशाचे पीक म्हणून उसाच्या लागवडीवर भर देत आहे.

इतर पिकांच्या तुलनेत एकरी ३०-४० टनापर्यंत ऊस निघाला तर परवडतो, अशा विश्वासामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

मात्र ऊसतोडणीसाठी एकरी पाच ते दहा हजार रुपयांचा दर या मजुरांनी ठेवलेला आहे. त्यातच प्रत्येक खेपेला वाहनचालकास कारखान्याच्या अंतरानुसार पाचशे ते एक हजार रुपये द्यावे लागत आहेत. ऊस गाळपासाठी नेण्यास शेतकऱ्यांचा विशिष्ट कोड घ्यावा लागतो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जाते. हा गोरखधंदा बिनबोभाटपणे सुरू आहे. याबाबत तक्रार करण्यास कोणताही शेतकरी धजावत नसल्याने या लोकांचे जास्तच फावले आहे.

एकरी १०-१२ हजारांचा खर्च

मजुरांनी ऊसतोडणीचे रेटकार्डच बनवलेले आहेत. यात मजुर एकरी ५-१० हजार,चालक खेपेला ५००-१००० रुपये, एकरी २-३ खेपा जातात. कोडचे १००० रुपये, कारखान्याच्या कर्मचाऱ्यास असा एकरी १०-१२ हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना येत आहे.

मजुरांबद्दल सहानुभती शेतकऱ्यांच्या मुळावर

ऊसतोड कामगारांना मोठ्या कष्टाचे काम करावे लागते. याबाबत सगळीकडून सहानुभूती व आत्मियतेची भावना मिळते.मात्र या मजुरांना कारखान्याकडून टनाप्रमाणे मजुरी मिळते. उसाचे वाढे विकूनही थोडेफार पैसे मिळतात. आणि ऊसतोडणीसाठी शेतकरीही खुशीने एकरी २-३ हजार देत असतात; पण ऊसतोड मजुर शेतकऱ्यांची कीव करताना दिसत नाही. अडवणूक करीत असल्याचे चित्र आहे.

काही कारखान्यांचेच नियंत्रण

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटीवर तसेच कारखान्यांच्या मजुरांवर कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्याने शेतकऱ्यांना आधार मिळत आहे. ऊसतोडणीसाठी मजुरांनी पैसे मागितल्याची तक्रार आल्यास कारखान्याकडून गंभीर दखल घेत शेतकऱ्यांचे पैसे परत देण्यात येतात असा दंडक एक- दोन कारखान्यांनीच ठेवला आहे.

पैसे कमी दिल्यास करतात नुकसान

एखाद्या शेतकऱ्याने या मजुरांना थोडेफार कमी पैसे दिल्यास ऊस जमिनीपासून न तोडता वरूनच तोडणे, वाढ्याला उसाच्या कांड्या ठेवणे, पाचटात टिपरे ठेवणे, अशाप्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान करतात.

प्रतिक्रिया

माझ्या शेतात अडीच एकरात ऊस होता. माझ्याकडे बाहेरील कारखान्याचे मजूर होते. त्या मजुरांना एकरी दहा व चालक मिळून मला ३०,००० रुपये खर्च आला.

- अशोक बेडके, शेतकरी, राजापूर