शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

नवीन तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रुईधारूर या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी ...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रुईधारूर या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीरचे देवणी पशु पैदास प्रमुख डॉ. प्रफुल्लकुमार पाटील हे होते. कार्यक्रमाला एम. एस. डी. ॲनिमल हेल्थचे क्षेत्रीय व्यवस्थापक कुणाल घुंगर्डे, तुळशीदास सोळंके, सतीश आढाव, सरपंच भागवत गिरी, उपसरपंच सोळंके, तिडके आदी उपस्थित होते.

काळानुरूप शेती ही परवडणारी नाही, त्याकरिता शेती तंत्रात बदल करावा लागत आहे आणि शेतकरी हा बदल घडवून आहेत. तरीसुद्धा शेती परवडत नाही. कारण शेतीतले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्याच कारणाने शेती परवडत नाही. रुई धारूर येथील तरुण शेतकरीवर्ग हा दुग्ध व्यवसायात भरपूर प्रमाणात उतरत आहे. या युवकांना दुग्ध व्यवसायाची अद्ययावत माहिती देत दूध उत्पादन कसे वाढवावे, याचे दाखले डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी दिले. आपल्या मार्गदर्शनात डॉ. प्रफुल्ल कुमार पाटील यांनी शेतकऱ्यांना विस्तृत माहिती दिली. जनावरांचा गोठा हा मुक्त पद्धतीचा असावा. जनावरांना चारा देण्यात येतो, त्या चाऱ्याचा दर्जा वाढवताना खर्च कसा कमी होईल. जो चारा जनावरांना दिला जातो, त्यातला बहुतांश चारा हा वाया जातो, तो कसा वाचला जाईल, कालवडी संगोपन करताना त्या वेतायोग्य कशा बनतील. दूध काढण्याच्या पद्धतीमध्ये बदल काय असावेत? या सर्व विषयांवर डॉ. प्रफुल्ल कुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गावातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे आयोजन सुनील सोळंके आणि बालासाहेब तिडके यांनी केले. अविनाश तिडके यांनी आभार मानले.