शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शेतकऱ्यांनी ई-केवायसी ७ सप्‍टेंबरपर्यंत करुन घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By शिरीष शिंदे | Updated: September 4, 2022 17:45 IST

केवायसी न केल्यास १२ सप्‍टेंबर रोजी वितरीत होणारा १४ वा हप्‍ता मिळणार नसल्याची माहिती.

बीड: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील ज्या लाभार्थ्‍यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी ७ सप्‍टेंबरपर्यंत करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. त्या शिवाय १२ सप्‍टेंबर रोजी वितरीत होणारा १४ वा हप्‍ता मिळणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील कालावधीचा लाभ मिळण्‍यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्‍या लाभार्थ्‍यांनी ही प्रकि्रया केली नाही, अशा लाभार्थ्‍यांचा पुढील लाभ थांबविला जाणार आहे. ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया अतिशय सोपी असून ती करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्‍यासाठी खालील दोन पद्धतीने ही प्रक्रिया करता येईल.

लाभार्भी स्‍वतः pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर या टॅबमध्ये किंवा पीएम किसान अँपद्वारे ओटीपी द्वारे मोफत करता येईल. अथवा आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे ई-केवायसी प्रमाणीकरण करता येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्र (सीएससी सेंटर) येथे बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल.

दीड लाखाहून अधीक केवायसी अपूर्णजिल्‍हयातील ४ लाख ७९ हजार ८९० पैकी ३,१५,२७९ लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण तर १,६४,६११ लाभार्थ्‍यांनी केवायसी अद्याप केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांचा या योजनेचा पुढील कालावधीचा लाभ थांबविला जाणार आहे. ज्‍या लाभार्थ्‍यांनी ही प्रक्रिया अद्याप केलेली नाही, त्‍यांनी ७ सप्‍टेंबर पूर्वी दोन पद्धतीपैकी एका पध्‍दतीने ही प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा पुढील लाभ सुरळीत करून घेण्‍याबाबत शासनाने कळविले असून त्‍यासाठी जिल्‍हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी