शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेतकरी आत्महत्या प्रकरणाचे अहवाल देण्यास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:33 IST

अनेक ठिकाणी संबंधित पोलिसांकडून शेतकरी आत्महत्येप्रकरणी अहवाल वेळेवर दिला जात नसल्यामुळे अंतिम अहवाल तयार होण्यास दिरंगाई होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात नापिकी, अतिवृष्टीमुळे गत काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे. शेतकरी आत्महत्येसंदर्भात अहवाल देण्यासाठी एक समिती स्थापन केलेली असते. यामध्ये विविध विभागांचा समावेश असतो. मात्र, अनेक ठिकाणी संबंधित पोलिसांकडून शेतकरी आत्महत्येप्रकरणी अहवाल वेळेवर दिला जात नसल्यामुळे अंतिम अहवाल तयार होण्यास दिरंगाई होत आहे.जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, प्रत्येक महिन्याकाठी शेतकरी आत्महत्येची सरासरी १५ आहे. ती आत्महत्या पात्र ठरल्यानंतर संबंधित शेतकरी कुटुंबाला शासनाकडून मिळणारे लाभ दिले जातात. त्यासाठी सर्व तालुकास्तरावर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, ठाणेप्रमुख यांची समिती गठीत केलेली असते. त्यांनी मिळून शेतकरी आत्महत्येच्यासंदर्भात अहवाल देणे गरजेचे असते मात्र, संबंधित पोलीस ठाण्यांकडून शेतकरी आत्महत्येचा अहवाल दिला जात नसल्यामुळे अंतिम अहवाल देण्यास विलंब होत आहे.अंतिम अहवाल कालमर्यादेत पूर्ण होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गेवराई तहसीलदारांना नोटीस दिली होती. या नोटीसला उत्तर देताना पोलीस ठाणे प्रमुखांकडून आत्महत्येसंदर्भातील अहवाल दिला जात नसल्यामुळे अंतिम अहवाल पाठवण्यास दिरंगाई होत असल्याचे तहसीलदारांनी नमूद केले आहे. यामध्ये विशेषत: चकलंबा पोलीस ठाणे प्रमुखाकडून अहवाल न आल्याचे उल्लेख केला आहे. यामुळे पोलिसांना शेतकरी आत्महत्येसंदर्भात गांभीर्य नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत केली जाते. यामध्ये आर्थिक मदतीसह विविध योजनांचा लाभ त्यांना दिला जातो. मात्र, शेतकरी आत्महत्येची कारणे व अहवाल आल्यानंतर ती पात्र किंवा अपात्र याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे अहवाल सर्व विभागाकडून तात्काळ पाठवण्याच्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना सूचना दिलेल्या आहेत.जिल्ह्यातील बीड आणि गेवराई तालुक्यातील शेतकरी आत्महत्येचे अहवाल कालमर्यादेमध्ये दिले जात नहीत. यासंदर्भात संबंधित तहसीलदार यांच्याशी जिल्हा प्रशासनाकडून संपर्क केला असता, पोलीस ठाण्यांकडून अहवाल दिले जात नाहीत असे उत्तर दिले जाते.४मात्र, तहसीलदारांनी वेळोवेळी अहवालासाठी संबंधित ठाण्यांकडे संपर्क करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडूनही योग्य कार्यवाही होत नाही. तहसीलदारांनी योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करु असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्रGovernmentसरकार