शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

शेतकऱ्यांनो खचू नका, नुकसानीची भरपाई नक्कीच देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST

गेवराई : शेतकऱ्यांनो घाबरू नका, तुमचे जे नुकसान झाले त्याची भरपाई नक्कीच देण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. ...

गेवराई : शेतकऱ्यांनो घाबरू नका, तुमचे जे नुकसान झाले त्याची भरपाई नक्कीच देण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे शासन भरपाई देण्यास कटिबद्ध आहे, असा धीर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील दौऱ्यात शेतकऱ्यांना दिला. तालुक्यात सोमवारी रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने तलवाडा सर्कलमधील रामनगर, राजुरीमळा, राजापूरसह विविध भागात शेतातील उभी पिके भुईसपाट होऊन मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी रामनगर, राजुरमळा भागातील शेताच्या बांधावर बैलगाडीतून जाऊन पाहणी केली.

यावेळी पालकमंत्र्यांनी नुकसान झालेल्या शेतीची, रस्त्यावरील पुलांची तसेच घराची पडझडीची पाहणी केली. लवकरच पंचनामे करून नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला शासनाच्या वतीने मदत पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी माजी आ. अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी सचिन सानप, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब सोनवणे, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलवाड्याचे सरपंच विष्णू हात्ते, आक्रम सौदागर, मंडळ अधिकारी जितेंद्र लेडांळसह या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

020921\02_2_bed_13_02092021_14.jpeg~020921\02_2_bed_14_02092021_14.jpeg

गेवराई तालुक्यातील फळबागांचे नुकसान पाहणी~गेवराई तालुक्यातील फळबागांचे नुकसान पाहणी