शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

दूध दर कोसळल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

कवडीमोल किमतीत पशुधन विकत शेतकरी करतोय बी-बियाणे खरेदी अमर हजारे दौला वडगाव : राज्यात दूध दराची मोठी घसरण झाल्याने ...

कवडीमोल किमतीत पशुधन विकत शेतकरी करतोय बी-बियाणे खरेदी

अमर हजारे

दौला वडगाव : राज्यात दूध दराची मोठी घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यातच पेरणीचे दिवस तोंडावर आहेत आणि मशागतीचे भाव आकाशाला भिडले आहेत. कवडीमोल किमतीत पशुधन विकत शेतकरी बी-बियाणे खरेदी करताना दिसत आहे.

महाराष्ट्रात टाळेबंदीच्या पूर्वी दुधाचे भाव समाधानकारक होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पशुधन वाढविण्याचा निर्णय घेतला आणि दुग्ध व्यवसायाचा मार्ग निवडला. यामुळे अनेक शेतकरी पुन्हा दुधाचा धंदा करू लागले. परंतु, अचानक महाराष्ट्रात पुन्हा टाळेबंदी लागू झाली आणि दुधाचे भाव गडगडले. यातच पशुखाद्य यांचे भाव मात्र तेजीत आहेत. दुधाच्या पैशातून पेंड आणि भुसा घेणेसुद्धा अवघड झाले आहे. दुधाच्या पगारातून पशुखाद्याची बरोबरीसुद्धा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे

यातच पशुसंवर्धन करण्यासाठी लागणारा चारा हा चढ्या भावाने मिळतो आहे. उसाचा भाव प्रतिटन तीन हजार रुपये असल्याने एका मोळीला साधारण ६३ रुपये इतका खर्च येतो आहे. एका जनावरासाठी दोन मोळी हा हिशेब ठेवला तरी १२६ रुपये इतका खर्च होतो आणि खुराक आला साधारण पन्नास रुपये आणि तीच गाय दहा लिटर दूध देत असेल तर पंधरा, सोळा रुपये प्रतिलिटरने १६० रुपये होतात. अशी बिकट परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची आहे.

जून महिना सुरू असल्याने आणि पाऊसही चांगला झाल्याने शेतकरी आता पेरणीच्या मार्गावर आहे. परंतु, सोयाबीनचा एका पिशवीचा भाव ३१२५ रुपये असून, कांदा बी सुद्धा चांगलेच तेजीत आहे. जी परिस्थिती बियाण्यांच्या बाबतीत आहे, तीच शेती मशागतीची सुद्धा आहे. ट्रॅक्टरच्या पेरणीच्या भावात मोठा बदल झाला आहे. एक हजार रुपये असणारी पेरणी आता पंधराशेपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ट्रॅक्टर नांगरट दोन हजारांपर्यंत, तर काकऱ्या पाळी १२०० रुपये इतक्या भावाने सुरू झाली आहे. डिझेल दरवाढीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. एकूणच काय तर बियाणे आणि ट्रॅक्टर मशागत वाढली असताना दुधाचा पडलेला भाव आणि गोधनाची मातीमोल किंमत ही शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतालचा फास झाला आहे . गोधन विकून पेरणी करावी की बायकोच्या मंगळसूत्रावर पेरणीसाठी हात घालावा या द्विधा मन:स्थितीत शेतकरी अडकला आहे

दुधाचे भाव पडल्याने आता मोठी पंचायत झाली आहे. घरात गोडेतेल घ्यावे की नाही हीच समस्या झाली आहे. यातच पुढे पेरणी उभी आहे. अशीच परिस्थिती चालू राहिल्यास व्याजाने पैसे घेऊन पेरणी करावी लागेल.

संदीप रामगुडे (शेतकरी)

दुधाचे भाव पडल्याने शेतीचा जोडधंदा तोट्यात आला आहे. यातच कांदा जाग्यावर सडला. त्यामुळे दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे , दिवसभर बाई शेतात काम करते तेव्हा एक तेलाची पिशवी येते, तर ट्रॅक्टरसाठी महिनाभर मजुरी करावी लागेल.

त्रिंबक जाधव (शेतकरी)