शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

आडत बाजार बंद राहिल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

शेतकरी चिंतेत अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील आडत बाजारपेठ बंद राहिल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. कृषी ...

शेतकरी चिंतेत

अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील आडत बाजारपेठ बंद राहिल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यासाठी आयुक्त, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना सभापती, आमदार यांच्यावतीने लेखी निवेदन देऊन बाजार समितीचे व्यवहार सुरू करण्यासाठी वेळ ठरवून परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, २५ तारखेच्या आदेशात पुन्हा आडत बाजाराला लॉक ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीचा व्यवहार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आडत बाजारात होत असतो. शेतकरी शेतीमाल विकून व्यवहार करीत आसतात. शेतकरी सुगीत माल विक्री करीत असले तरी बहुतेक शेतकरी पैसा खर्च होतो म्हणून पेरणीसाठी माल शिल्लक ठेवतात. पेरणीच्या वेळी माल विक्री करून खत, बी, बियाणे खरेदी, मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च हा शेती मालावर भागवतात. गेल्या महिन्यात मोंढा बाजार काही टी घालून दुपारी ११पर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली होती. त्यामुळे तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी मोंढा बाजारात आणला आहे. पुन्हा कडक निर्बंध लावत आडत बाजार बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल विक्री न करता आडत दुकानात अडकून पडला आहे.

बाजार समिती सुरू करण्याबाबतचे निवेदन आ. नमिता मुंदडा व कृ.उ.बा. समितीचे सभापती गोंविंद देशमुख यांनी पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले होते. २४ मेच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशात बाजार समितीला पुन्हा लॉकच आसल्याचे नमुद करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. आडत बाजार बंद आसल्यामुळे खत बि बियाणे खरेदी कसे? करावे असा प्रश्न पडला.

गेल्या महिण्यात कांही वेळ आडत सुरू होत्या. त्यामुळे मी कांही शेती माल आडत बाजारात विक्रीसाठी नेला असून राहिलेला माल ही आडत बाजारात पाठवण्याच्या तयारी होतो. पण आडत बाजार बंद केल्याने अर्धा माल दुकानात तर कांही माल घरी पडून आहे. कालच्या आदेशात पुन्हा शासनाने आडत बाजार बंदचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहेत.शासणाने कांही तास तरी मोंढा बाजार सुरू करण्याची परवानगी दिली तरच शेतकरी खत बि बियाणे खरेदी करू शकतील.

सुंदर शिंदे, शेतकरी

शेतकऱ्यानी दुकानात माल टाकला तोही बाजरबंदमुळे आडकला तर कांही माल घरीच राहिला आहे. शेतकरी बाजार सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. शासनाने पुन्हा शेतकऱ्याला प्रतीक्षेतच ठेवल्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने शेतकऱ्याचा विचार करून बाजार सुरु करणे गरजेचे आहे.

संजय भन्साळी,

आडत व्यापारी, अंबाजोगाई.

===Photopath===

290521\img-20210528-wa0101_14.jpg