शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

थंडीने ज्वारी काकडली तर गहू, हरभर्‍यावर कीड; बीड जिल्ह्यातील शेतक-यांना आता उन्हाळी पिकांचे वेध  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:34 IST

मागील दोन आठवड्यांपासून गारठा वाढल्याने ज्वारीच्या वाढीला फटका बसत असून गहू, हरभर्‍याला सर्वोत्तम वातावरण असले तरी  किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दुसरीकडे कृषी विभागाने व तज्ज्ञांनी आवाहन करुनही ज्या शेतकर्‍यांनी कापूस उपटला नाही, त्यांच्या कापसाला बोंडे फुटू लागली आहेत. 

बीड : मागील दोन आठवड्यांपासून गारठा वाढल्याने ज्वारीच्या वाढीला फटका बसत असून गहू, हरभर्‍याला सर्वोत्तम वातावरण असले तरी  किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दुसरीकडे कृषी विभागाने व तज्ज्ञांनी आवाहन करुनही ज्या शेतकर्‍यांनी कापूस उपटला नाही, त्यांच्या कापसाला बोंडे फुटू लागली आहेत. 

बीड जिल्ह्यात यंदा पाऊसप्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहिल्याने शेतकरी विविध पिके घेत आहेत. यंदा रबी हंगामात ज्वारीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असलीतरी अलीकडच्या कालावधीत वाढत्या थंडीमुळे ज्वारी उत्पादकांना त्रास सहन करावा लागत आहे. गारठ्यामुळे उशिरा पेरलेली ज्वारी काकडली आहे. पोटर्‍यात आलेल्या ज्वारीमध्ये कणसाला पीळ पडण्याची शक्यता वाढली असून साखर चिकटाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ‘खडखड्या’ रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. काही ठिकाणी ज्वारीवर मावाची शक्यता असल्याने शिफारशीप्रमाणे उपाययोजना शेतकर्‍यांना करावी लागणार आहे. खडखड्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १०० लिटर पाण्यात २ किलो युरियाची फवारणी तसेच मावा असेल तर त्यात १५० मि.ली. रोगर (डायमेट्रेट) ची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी लागणार आहे. 

लहरी निसर्ग बोंडअळीमुळे फटका बसल्यानंतर शेतकर्‍यांनी कपाशी उपटून गहू आणि हरभर्‍याचा पेरा केला. कापसातून नुकसानीची कसर यातून काढता येईल अशी अपेक्षा असतानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे गहू आणि हरभर्‍यावर कडाक्याच्या थंडीचा परिणाम झाला आहे.

साखरचिकटा, खडखड्याचा प्रादुर्भावसुरुवातीला तसेच वेळेवर पेरा केलेली ज्वारी दाणे भरुन परिपक्व झाल्याने कसलाही धोका नाही, मात्र उशिरा पेरणी केलेल्या ज्वारीची वाढ खुंटत आहे, मात्र बीड जिल्ह्यात हे क्षेत्र कमी आहे. वाढत्या थंडीमुळे पेशीरस पानांवर साखरेप्रमाणे पसरत आहे. साखरचिकटादेखील वाढीला अडथळा ठरत आहे. उशिरा पेरलेल्या गव्हावर खोडकिडी, मावा, तांबेरा तर हरभर्‍यावर मर आणि घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी शिफारशीनुसार फवारणी करणे आवश्यक बनले आहे. 

उन्हाळी पिकांचे वेधयावर्षी चांगल्या पावसामुळे शेतकर्‍यांचा उन्हाळी बाजरी, उन्हाळी भुईमुगाचे पीक घेण्याकडे कल वाढत आहे. शिरुर, पाटोदा, गेवराई, बीड तालुक्यात उन्हाळी बाजरी तर बीड, धारुर, वडवणी, शिरुर, पाटोदा तालुक्यात उन्हाळी भुईमुगाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. 

कपाशीला बोंडे, पण भीतीगुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर कपाशी उपटण्याचे व पळाट्या जाळून टाकण्याचे तसेच एकही बोंड शेत व परिसरात राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले होते. पाणी उपलब्ध असलेल्या बहुतांश शेतकर्‍यांनी कपाशी उपटून गहू, हरभर्‍याचा पेरा केला. परंतु, ज्या कोरडवाहू शेतकर्‍यांनी नुकसान झालेच आहे, आता काय व्हायचे ते होईल या धाडसाने उपटण्याचा खर्च टाळून कपाशी तशीच ठेवली. हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. थंडीमुळे या कपाशीला बोंडे फुटू लागली आहेत. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे दिसून येत आहेत.

बोंडअळीचा धोका लक्षात घ्यावा कापसाला बोंडे फुटत असलीतरी गुलाबी बोंडअळीचा धोका लक्षात घ्यायला हवा. बोंडामध्ये सात महिने सुप्त अवस्थेत ही अळी राहते. त्यामुळे याचा परिणाम पुढील हंगामात पहायला मिळेल. आॅगस्टनंतर  कपाशीवर होणारा प्रादुर्भाव दिसून येईल.त्यामुळे कापूस हा उपटलाच पाहिजे.- रामेश्वर चांडक, कृषी तज्ज्ञ. 

जिल्ह्यातील पेरा ज्वारी    १ लाख ५१ हजार ३०७गहू            ३५ हजार ९०२ हरभरा    १ लाख १५ हजार ४१