शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अद्याप गतवर्षीच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 12:55 IST

crop insurance: गंगाभिषण थावरेंनी केली होती याचिका दाखल, उच्च न्यायालयात १४ जानेवारीला सुनावणी

बीड : गतवर्षीचा सन २०२०-२१ मधील पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हा विमा मिळावा यासाठी शेतकरी नेते भाई गंगाभिषण थावरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका (crop insurance) दाखल केली असून, यावर दुसरी सुनावणी १४ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.

जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात परतीचा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. गतवर्षी सुमारे १८ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. केंद्र शासन, राज्य शासन आणि शेतकरी हिस्सा असे सुमारे ७९८ कोटी रुपये विमा कंपनीला मिळाले होते. महसूल व कृषी विभागाने पंचनामे करुन चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला दिला होता. या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईही मिळाली. मात्र, त्यांना त्यांच्या हक्काचा विमा मिळणे अपेक्षित असताना विमा कंपनीने मात्र ७२ तासात तक्रार केली नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना विमा नाकारला. केवळ २० हजार शेतकऱ्यांना १३ कोटींचा विमा वाटप करून कंपनीने नफेखाेरी केली होती. त्यामुळे, महसूल व कृषी विभागाचे पंचनामे गृहित धरून शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांनी केलेली आहे.

सुरुवातीपासूनच भाई थावरे हे विमाप्रश्नी आक्रमक असून, १ जुलै २०२१ रोजी विमा कंपनीने विमा स्वीकारण्यास तयारी न दर्शविल्याने थावरे यांनी बैलगाडी मोर्चा काढला होता. तर, ७ ऑक्टोबर २०२० रोजी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले होते. यानंतर १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतसमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. १ जून २०२१ रोजी महिला शेतकऱ्यांनी प्रत्येक गावात ग्रामपंचायतमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते तर, १ जुलै २०२१ रोजी खतगव्हाणमध्ये चूलबंद आंदोलन केले होते. यानंतर ९ ऑगस्ट मोर्चा काढला होता व ४ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर एक सुनावणी झाली होती तर, आता दुसरी सुनावणी १४ जानेवारी २०२२ रोजी होणार आहेल अशी माहिती थावरे यांनी दिली.

म्हणून मिळाला अग्रीमथावरे यांनी कृषी आयुक्तांची भेट घेत पावसाने खंड दिल्याने पिके सुकून गेली होती, याबाबत विमा कंपनीला २५ टक्के अग्रीम देण्याबाबत मागणी केली होती. यावर तातडीने कृषी आयुक्तांनी कंपनीला आदेश दिले होते. यामुळे दिवाळीत शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम मिळाला आहे. याबद्दल थावरे यांनी कृषी आयुक्तांचे आभार मानले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाBeedबीडAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ