शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकरी अद्याप गतवर्षीच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 12:55 IST

crop insurance: गंगाभिषण थावरेंनी केली होती याचिका दाखल, उच्च न्यायालयात १४ जानेवारीला सुनावणी

बीड : गतवर्षीचा सन २०२०-२१ मधील पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हा विमा मिळावा यासाठी शेतकरी नेते भाई गंगाभिषण थावरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका (crop insurance) दाखल केली असून, यावर दुसरी सुनावणी १४ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.

जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात परतीचा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. गतवर्षी सुमारे १८ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. केंद्र शासन, राज्य शासन आणि शेतकरी हिस्सा असे सुमारे ७९८ कोटी रुपये विमा कंपनीला मिळाले होते. महसूल व कृषी विभागाने पंचनामे करुन चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला दिला होता. या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईही मिळाली. मात्र, त्यांना त्यांच्या हक्काचा विमा मिळणे अपेक्षित असताना विमा कंपनीने मात्र ७२ तासात तक्रार केली नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना विमा नाकारला. केवळ २० हजार शेतकऱ्यांना १३ कोटींचा विमा वाटप करून कंपनीने नफेखाेरी केली होती. त्यामुळे, महसूल व कृषी विभागाचे पंचनामे गृहित धरून शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांनी केलेली आहे.

सुरुवातीपासूनच भाई थावरे हे विमाप्रश्नी आक्रमक असून, १ जुलै २०२१ रोजी विमा कंपनीने विमा स्वीकारण्यास तयारी न दर्शविल्याने थावरे यांनी बैलगाडी मोर्चा काढला होता. तर, ७ ऑक्टोबर २०२० रोजी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले होते. यानंतर १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतसमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. १ जून २०२१ रोजी महिला शेतकऱ्यांनी प्रत्येक गावात ग्रामपंचायतमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते तर, १ जुलै २०२१ रोजी खतगव्हाणमध्ये चूलबंद आंदोलन केले होते. यानंतर ९ ऑगस्ट मोर्चा काढला होता व ४ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर एक सुनावणी झाली होती तर, आता दुसरी सुनावणी १४ जानेवारी २०२२ रोजी होणार आहेल अशी माहिती थावरे यांनी दिली.

म्हणून मिळाला अग्रीमथावरे यांनी कृषी आयुक्तांची भेट घेत पावसाने खंड दिल्याने पिके सुकून गेली होती, याबाबत विमा कंपनीला २५ टक्के अग्रीम देण्याबाबत मागणी केली होती. यावर तातडीने कृषी आयुक्तांनी कंपनीला आदेश दिले होते. यामुळे दिवाळीत शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम मिळाला आहे. याबद्दल थावरे यांनी कृषी आयुक्तांचे आभार मानले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाBeedबीडAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ