शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

जायकवाडीचे पाणी डिग्रसच्या गोदापात्रात पोहोंचल्याने शेतकरी आनंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 17:44 IST

परळी, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना दिलासा

ठळक मुद्देशेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

परळी (बीड ) : जायकवाडी धरणाचेपाणी गुरुवारी सकाळी डिग्रस येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहचले आहे. मागील 2 वर्षापासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते. आता पात्रात पाणी येणे सुरू झाल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. 

परळी तालुक्यातील डिग्रस, पोहनेर, तेलसमुख, बोरखेड या चार गावातून गोदावरी नदी जाते. पैठण येथील जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी आज सकाळी 6.45 वाजता परळी तालुक्यातील डीग्रस या गावी पोहचले आहे. यानंतर पोहनेर ,तेलसमुख, व बोरखेड  या गावातून सोनपेठ तालुक्यातील विटा व  गंगाखेड वरून नांदेडला जाते. यामुळे परळी, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या गावांचा आणि परिसरातील 15 ते 20 गावातील शेतीसाठीचा आणि पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

गोदावरी नदीवरील बंधारा अपूर्णतालुक्यातील पोहनेर येथिल गोदावरी वरील बंधारा 15 वर्षपूर्वी मंजूर करण्यात आला आहे, परंतु त्याचे संपुर्ण काम झालेले नाही, वास्तविक पाहता नाशिक ते तेलंगणा बॉर्डर पर्यंत गोदावरीच्या पात्रात एकूण छोटे सरासरी 15 ते 20 बंधारे 2005 साली मंजूर करण्यात आले होते. त्यातील पोहनेर/तारगव्हान हा एकमेव बंधारा अपुर्ण आहे. हा बंधारा झाला असता तर आज 15 हजार हेक्टरच्या वर जमीन सिंचनाखाली आली असती आणि ढालेगाव ते पोहनेर 20 किमी पाणी गोदावरी मध्ये अडले असते. पात्राच्या दोन्ही बाजूचे गाव मिळून परिसरातील 50 ते 60 गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता. परंतु, पाणी पोहनेर ला येऊनही पुढे वाहून जाणार आहे अशी कैफियत पोहनेरचे अ‍ॅड. रमेश साखरे यांनी मांडली. निधी नसल्याने हे काम अपूर्ण असल्याचे हिवरा गावचे माजी सरपंच राजाभाऊ निर्मळ यांनी म्हटले आहे

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीBeedबीड