शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

शेत, पाणंद रस्त्याची कामे होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

अंबाजोगाई : शेत, शिव, पाणंद व गावरस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गावरस्ता समिती गठित करण्याचा निर्णय ...

अंबाजोगाई : शेत, शिव, पाणंद व गावरस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गावरस्ता समिती गठित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही अंबाजोगाई तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून गाव रस्ता समिती केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी. शेतमालाला बाजारात पोहोचविण्यासाठी आवश्यक रस्त्याची (पाणंद) कामे पूर्णत्वाला नेण्यासाठी गावपातळीवर गावसमित्या स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य शासनाने घेतला होता. तहसील कार्यालयामार्फत ग्रामपंचायतींना परिपत्रकाद्वारे अशा समित्या स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. या समित्या स्थापन झाल्या असत्या तर गावातील शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्ते मोठ्या प्रमाणात मोकळे झाले असते. प्रत्येकाला शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध झाला असता. ही यंत्रणा गावपातळीवरच कार्यरत असल्याने परस्परांतील वाद, तंटे, गावातच मिटवून रस्ते निर्माण होणार होते.

या ग्रामसमित्यांमध्ये सरपंच, अध्यक्ष तर मंडळाधिकारी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायतच्या महिला सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, कृषी साहाय्यक अधिकारी, बीट जमादार आदींचा समावेश असणार होता. या समित्या अस्तित्वात आल्या तर सर्वच विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचा समन्वय सहज उपलब्ध झाल्याने अनेक अडचणी सोडविल्या गेल्या असत्या. परंतु अशा समित्या अद्यापही कागदावरच आहेत. त्यांची अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न हीच ग्रामीण भागातील मुख्य समस्या असते.

या माध्यमातून गावपातळीवरच रस्त्याची कामे झाली असती.

ग्रामीण भागातील अनेक शिव रस्ते व पाणंद रस्ते आजही अतिक्रमण अवस्थेत आहेत. याचा मोठा अडथळा सामान्य शेतकऱ्यांना होतो. हे रस्ते अतिक्रमणमुक्त होऊन या रस्त्याच्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देऊन ग्रामसमितीच्या माध्यमातून असे रस्ते तत्काळ पूर्ण करावेत. या वर्षी झालेल्या मोठ्या पावसामुळे सर्वच रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.

गावोगावी या समित्यांच्या माध्यमातून रस्त्यांची पुनर्निमिती करण्यासाठी ही योजना दिशादर्शक ठरू शकते. यासाठी तहसील कार्यालयाने ग्रामसमित्या अस्तित्वात आणाव्यात, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे यांनी केली आहे.