शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मालजगावात चारी नादुरुस्त; पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:38 IST

माजलगाव धरणातून शेतीच्या सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देदोन पाळ्या होऊनही पिकांना मिळेना थेंबभर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव धरणातून शेतीच्या सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत असताना संंबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांतून संताप व्यक्त होत आहे.

माजलगाव धरण क्षेत्रामधील वितरीका क्रमांक १ मधील मायनर ५ मधील चारी नादुरुस्त आहे. परिसरातील शेतकºयांनी अनेक वेळा चारी नादुरुस्त असल्याबाबत कॅनल निरीक्षकाला सांगण्यात आले. याउपरही दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे दुसºया पाणी पाळीचे लाखो लिटर पाणी वाहून जाऊन अनेकांच्या कापसाचे नुकसान झाले, तर अनेकांच्या शेतात तळे साचले होते.

पाटबंधारे विभागाने या परिसरात पोकलेन पाठवले होते; मात्र संंबंधित अधिका-यांनी मर्जीतीलच लोकांच्या शेतातील चारी दुरुस्तीचे काम केले. बाकी काम अर्धवट सोडून पोकलेन वापस घेऊन गेले. त्यामुळे पाणी पाळीने अनेक शेतक-यांच्या शेतात तळे साचून कापूस, ज्वारीचे नुकसान झाले. पाटबंधारे विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पाणी असूनही शेतक-यांना त्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली असून, लाखो लिटर पाणी डोळ्यादेखत वाहून जात आहे. चारी दुरूस्त करावी, अशी मागणी जोतीराम पठाडे, सूर्यकांत होके, विश्वनाथ शेटे, श्रीराम राठोड, राजेश कुलथे, विठ्ठल नरसाळे आदींनी केली आहे.या चा-यांचा सर्व्हे करून तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल, असे माजलगाव पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी बी. आर. शेख यांनी सांगितले.नियोजन, तरीही नासाडीमाजलगाव धरण शंभर टक्के भरल्याने सिंचन विभागाकडून पाणी पाळीचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने ठिकठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे चित्र आहे.