शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मालजगावात चारी नादुरुस्त; पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:38 IST

माजलगाव धरणातून शेतीच्या सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देदोन पाळ्या होऊनही पिकांना मिळेना थेंबभर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव धरणातून शेतीच्या सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत असताना संंबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांतून संताप व्यक्त होत आहे.

माजलगाव धरण क्षेत्रामधील वितरीका क्रमांक १ मधील मायनर ५ मधील चारी नादुरुस्त आहे. परिसरातील शेतकºयांनी अनेक वेळा चारी नादुरुस्त असल्याबाबत कॅनल निरीक्षकाला सांगण्यात आले. याउपरही दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे दुसºया पाणी पाळीचे लाखो लिटर पाणी वाहून जाऊन अनेकांच्या कापसाचे नुकसान झाले, तर अनेकांच्या शेतात तळे साचले होते.

पाटबंधारे विभागाने या परिसरात पोकलेन पाठवले होते; मात्र संंबंधित अधिका-यांनी मर्जीतीलच लोकांच्या शेतातील चारी दुरुस्तीचे काम केले. बाकी काम अर्धवट सोडून पोकलेन वापस घेऊन गेले. त्यामुळे पाणी पाळीने अनेक शेतक-यांच्या शेतात तळे साचून कापूस, ज्वारीचे नुकसान झाले. पाटबंधारे विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पाणी असूनही शेतक-यांना त्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली असून, लाखो लिटर पाणी डोळ्यादेखत वाहून जात आहे. चारी दुरूस्त करावी, अशी मागणी जोतीराम पठाडे, सूर्यकांत होके, विश्वनाथ शेटे, श्रीराम राठोड, राजेश कुलथे, विठ्ठल नरसाळे आदींनी केली आहे.या चा-यांचा सर्व्हे करून तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल, असे माजलगाव पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी बी. आर. शेख यांनी सांगितले.नियोजन, तरीही नासाडीमाजलगाव धरण शंभर टक्के भरल्याने सिंचन विभागाकडून पाणी पाळीचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने ठिकठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे चित्र आहे.