शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

मालजगावात चारी नादुरुस्त; पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:38 IST

माजलगाव धरणातून शेतीच्या सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देदोन पाळ्या होऊनही पिकांना मिळेना थेंबभर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव धरणातून शेतीच्या सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत असताना संंबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांतून संताप व्यक्त होत आहे.

माजलगाव धरण क्षेत्रामधील वितरीका क्रमांक १ मधील मायनर ५ मधील चारी नादुरुस्त आहे. परिसरातील शेतकºयांनी अनेक वेळा चारी नादुरुस्त असल्याबाबत कॅनल निरीक्षकाला सांगण्यात आले. याउपरही दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे दुसºया पाणी पाळीचे लाखो लिटर पाणी वाहून जाऊन अनेकांच्या कापसाचे नुकसान झाले, तर अनेकांच्या शेतात तळे साचले होते.

पाटबंधारे विभागाने या परिसरात पोकलेन पाठवले होते; मात्र संंबंधित अधिका-यांनी मर्जीतीलच लोकांच्या शेतातील चारी दुरुस्तीचे काम केले. बाकी काम अर्धवट सोडून पोकलेन वापस घेऊन गेले. त्यामुळे पाणी पाळीने अनेक शेतक-यांच्या शेतात तळे साचून कापूस, ज्वारीचे नुकसान झाले. पाटबंधारे विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पाणी असूनही शेतक-यांना त्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली असून, लाखो लिटर पाणी डोळ्यादेखत वाहून जात आहे. चारी दुरूस्त करावी, अशी मागणी जोतीराम पठाडे, सूर्यकांत होके, विश्वनाथ शेटे, श्रीराम राठोड, राजेश कुलथे, विठ्ठल नरसाळे आदींनी केली आहे.या चा-यांचा सर्व्हे करून तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल, असे माजलगाव पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी बी. आर. शेख यांनी सांगितले.नियोजन, तरीही नासाडीमाजलगाव धरण शंभर टक्के भरल्याने सिंचन विभागाकडून पाणी पाळीचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने ठिकठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे चित्र आहे.