बीड : मराठा मोर्चाची तयारी सुरू आहे. ५ जूनला बीडमध्ये मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी १२ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मोर्चात पक्ष, गटतट विसरून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केले.
कपिलधार येथे रविवारी आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर मेटे यांनी बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. आरक्षणासाठीची भूमिका जाहीर करावी. ओबीसीप्रमाणे शैक्षणिक शुल्कात सवलती द्याव्यात. शिष्यवृत्ती सुरु करावी. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून व्यवसायासाठी ५० हजारापर्यंत भागभांडवल द्यावे. राज्य मागासवर्गीय आयोगाची पुनर्रचना करावी, आदी मागण्यांसाठी मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चातून सरकारला जाब विचारला जाईल. कोरोना नियमांचे पालन करुन मोर्चा निघणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एसईबीसीतून निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने सेवेत सामावून घ्यावे, यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असेही आ. मेटे यांनी सांगितले.
यावेळी बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी.जाधव, ॲड. मंगेश पोकळे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, गंगाधर काळकुटे, सुहास पाटील, प्रा.ग़ोपाळ धांडे, महेश धांडे, अशोक सुखवसे, मनोज जाधव यांची उपस्थिती होती.
===Photopath===
230521\23_2_bed_18_23052021_14.jpeg
===Caption===
पत्रकारपरिषदेत बोलताना आमदार विनायक मेटे, ॲड.मंगेश पोकळेव मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बीबी जाधव