शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत मराठी विद्यापीठ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:06 IST

अंबाजोगाई (जि. बीड) येथील योगेश्वरी महाविद्यालय परिसरात गेली दोन दिवस सुरू असलेल्या बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला. तमाम रसिकांच्या साक्षीने अंबाजोगाईत मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून अंबाजोगाई आणि उदगीर या जिल्ह्यांची नव्याने निर्मिती करावी, असा ठराव संमत करण्यात आला.

ठळक मुद्देमराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप १२ ठराव संमत

सतीश जोशीअंबाजोगाई (जि. बीड) : येथील योगेश्वरी महाविद्यालय परिसरात गेली दोन दिवस सुरू असलेल्या बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला. तमाम रसिकांच्या साक्षीने अंबाजोगाईत मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून अंबाजोगाई आणि उदगीर या जिल्ह्यांची नव्याने निर्मिती करावी, असा ठराव संमत करण्यात आला.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी होते. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, दादा गोरे, दगडू लोमटे, संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, अमर हबीब, रामचंद्र तिरुके, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, भावना राजनौर, व्यंकटेश गायकवाड, किरण सगर, भास्कर बडे आदी उपस्थित होते.

या संमेलनात १२ ठराव संमत करण्यात आले. विविध क्षेत्रांतील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेती खर्चावर आधारित पिकांंना हमी भाव देऊन शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, लातूर-मुंबई, धर्माबाद-मुंबई या मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण करून परळी-बीड-नगर हा होऊ घातलेला रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, सर्वेक्षण झालेल्या घाटनांदूर-श्रीगोंदा या रेल्वेमार्गास मान्यता देऊन अंमल करावा, दासोपंतांचे साहित्य शासनाने प्रकाशित करावे, अंबाजोगाईस पर्यटनाचा ‘अ’ दर्जा द्यावा, मसापसाठी अंबाजोगाई पालिकेने जागा द्यावी, यासह मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईत स्थापन करण्याचा आणि उदगीर, अंबाजोगाई नव्या जिल्ह्यांची निर्मिती करावी, असे ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आले.

स्वागताध्यक्ष सभापती राजेसाहेब देशमुख यांनी हे संमेलन यशस्वी करणाºयांचे आभार मानले. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आपल्या भाषणात साहित्याच्या निर्मितीबद्दल भाष्य केले. मराठी लेखकात आत्मनिष्ठा नाही. जे साहित्य ते निर्माण करतात, त्याचे अनुकरण वास्तविक जीवनात नसते, असे ते म्हणाले. बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन