शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अंबाजोगाईत मराठी विद्यापीठ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:06 IST

अंबाजोगाई (जि. बीड) येथील योगेश्वरी महाविद्यालय परिसरात गेली दोन दिवस सुरू असलेल्या बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला. तमाम रसिकांच्या साक्षीने अंबाजोगाईत मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून अंबाजोगाई आणि उदगीर या जिल्ह्यांची नव्याने निर्मिती करावी, असा ठराव संमत करण्यात आला.

ठळक मुद्देमराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप १२ ठराव संमत

सतीश जोशीअंबाजोगाई (जि. बीड) : येथील योगेश्वरी महाविद्यालय परिसरात गेली दोन दिवस सुरू असलेल्या बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला. तमाम रसिकांच्या साक्षीने अंबाजोगाईत मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून अंबाजोगाई आणि उदगीर या जिल्ह्यांची नव्याने निर्मिती करावी, असा ठराव संमत करण्यात आला.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी होते. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, दादा गोरे, दगडू लोमटे, संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, अमर हबीब, रामचंद्र तिरुके, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, भावना राजनौर, व्यंकटेश गायकवाड, किरण सगर, भास्कर बडे आदी उपस्थित होते.

या संमेलनात १२ ठराव संमत करण्यात आले. विविध क्षेत्रांतील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेती खर्चावर आधारित पिकांंना हमी भाव देऊन शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, लातूर-मुंबई, धर्माबाद-मुंबई या मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण करून परळी-बीड-नगर हा होऊ घातलेला रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, सर्वेक्षण झालेल्या घाटनांदूर-श्रीगोंदा या रेल्वेमार्गास मान्यता देऊन अंमल करावा, दासोपंतांचे साहित्य शासनाने प्रकाशित करावे, अंबाजोगाईस पर्यटनाचा ‘अ’ दर्जा द्यावा, मसापसाठी अंबाजोगाई पालिकेने जागा द्यावी, यासह मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईत स्थापन करण्याचा आणि उदगीर, अंबाजोगाई नव्या जिल्ह्यांची निर्मिती करावी, असे ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आले.

स्वागताध्यक्ष सभापती राजेसाहेब देशमुख यांनी हे संमेलन यशस्वी करणाºयांचे आभार मानले. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आपल्या भाषणात साहित्याच्या निर्मितीबद्दल भाष्य केले. मराठी लेखकात आत्मनिष्ठा नाही. जे साहित्य ते निर्माण करतात, त्याचे अनुकरण वास्तविक जीवनात नसते, असे ते म्हणाले. बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन