शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बीडमध्ये वातावरण बदलामुळे ‘व्हायरल’ची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:57 IST

डिसेंबरनंतर ओसरलेल्या थंडीमुळे वातावरण बदल होत असतानाच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला. महिनाभरापासून अशा आजारांचे रुग्ण उपचार घेत असतानाच फेब्रुवारी उजाडल्यापासून पुन्हा वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णांमध्ये भर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाल रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, न्युमोनिया, अतिसार, ब्रॉन्क्युलायटिसचे आजार असलेले रुग्णांची गर्दी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : डिसेंबरनंतर ओसरलेल्या थंडीमुळे वातावरण बदल होत असतानाच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला. महिनाभरापासून अशा आजारांचे रुग्ण उपचार घेत असतानाच फेब्रुवारी उजाडल्यापासून पुन्हा वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णांमध्ये भर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाल रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, न्युमोनिया, अतिसार, ब्रॉन्क्युलायटिसचे आजार असलेले रुग्णांची गर्दी झाली आहे.काही बालकांमध्ये सर्दी, खोकला आढळून आला असून, असे आजार आपोआप मुदतपूर्ण करताच बरे होतात. मात्र, प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आजारी व्यक्तींशी संपर्क टाळावा. आजारी व्यक्तीने थुंकू नये, बालकांना गर्दीच्या ठिकाणांपासून टाळले पाहिजे तरच हा आजार नियंत्रणात राहून गुंतागुंतीचा होणार नाही, असे सांगण्यात आले. तीव्र श्वसनदाह असलेल्या बालकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असून, श्वासाची गती वाढते, ताप येतो, चिडचिडेपणा अशी लक्षणे आढळून येतात. या आजारावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे महत्त्वाचे ठरते.न्युमोनियाचेही काही रुग्ण आढळले असून, फुफ्फुसावर परिणाम करणारा गंभीर आणि गुंतागुंतीचा आजार आहे. मात्र, अशा वेळी रुग्णाला आत्मविश्वासाने हाताळले तर हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. ताप आला तर घाबरायचे नाही. ओल्या कपड्याने पुसणे, तापेचे औषध देणे, वरण-भात, मूगदाळ खिचडीच्या माध्यमातून पोषण करणे, बाळाचे स्तनपान सुरु ठेवणे, स्वच्छ, शुध्द पाणी पिण्यास वापरणे महत्त्वाचे ठरते, जुलाब असणाºया रुग्णांसाठी स्वच्छ पाणी गाळलेले असावे. ओआरएसचा वापर करावा. ज्यामुळे रुग्णांना आधार होईल, असेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.महिनाभरापासून व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पालकांनी न घाबरता वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करुन घ्यावा. अँटीबायोटिकचा आग्रह न करता तापेसारखे आजार पाच दिवस गृहीत धरले पाहिजेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला कांजण्या, गोवर, गालफुगीच्या रुग्णांची वाढ होत आहे.- डॉ. संजय जानवळेबालरोगतज्ज्ञ