शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बीडमध्ये वातावरण बदलामुळे ‘व्हायरल’ची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:57 IST

डिसेंबरनंतर ओसरलेल्या थंडीमुळे वातावरण बदल होत असतानाच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला. महिनाभरापासून अशा आजारांचे रुग्ण उपचार घेत असतानाच फेब्रुवारी उजाडल्यापासून पुन्हा वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णांमध्ये भर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाल रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, न्युमोनिया, अतिसार, ब्रॉन्क्युलायटिसचे आजार असलेले रुग्णांची गर्दी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : डिसेंबरनंतर ओसरलेल्या थंडीमुळे वातावरण बदल होत असतानाच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला. महिनाभरापासून अशा आजारांचे रुग्ण उपचार घेत असतानाच फेब्रुवारी उजाडल्यापासून पुन्हा वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णांमध्ये भर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाल रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, न्युमोनिया, अतिसार, ब्रॉन्क्युलायटिसचे आजार असलेले रुग्णांची गर्दी झाली आहे.काही बालकांमध्ये सर्दी, खोकला आढळून आला असून, असे आजार आपोआप मुदतपूर्ण करताच बरे होतात. मात्र, प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आजारी व्यक्तींशी संपर्क टाळावा. आजारी व्यक्तीने थुंकू नये, बालकांना गर्दीच्या ठिकाणांपासून टाळले पाहिजे तरच हा आजार नियंत्रणात राहून गुंतागुंतीचा होणार नाही, असे सांगण्यात आले. तीव्र श्वसनदाह असलेल्या बालकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असून, श्वासाची गती वाढते, ताप येतो, चिडचिडेपणा अशी लक्षणे आढळून येतात. या आजारावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे महत्त्वाचे ठरते.न्युमोनियाचेही काही रुग्ण आढळले असून, फुफ्फुसावर परिणाम करणारा गंभीर आणि गुंतागुंतीचा आजार आहे. मात्र, अशा वेळी रुग्णाला आत्मविश्वासाने हाताळले तर हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. ताप आला तर घाबरायचे नाही. ओल्या कपड्याने पुसणे, तापेचे औषध देणे, वरण-भात, मूगदाळ खिचडीच्या माध्यमातून पोषण करणे, बाळाचे स्तनपान सुरु ठेवणे, स्वच्छ, शुध्द पाणी पिण्यास वापरणे महत्त्वाचे ठरते, जुलाब असणाºया रुग्णांसाठी स्वच्छ पाणी गाळलेले असावे. ओआरएसचा वापर करावा. ज्यामुळे रुग्णांना आधार होईल, असेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.महिनाभरापासून व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पालकांनी न घाबरता वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करुन घ्यावा. अँटीबायोटिकचा आग्रह न करता तापेसारखे आजार पाच दिवस गृहीत धरले पाहिजेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला कांजण्या, गोवर, गालफुगीच्या रुग्णांची वाढ होत आहे.- डॉ. संजय जानवळेबालरोगतज्ज्ञ