शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

बीडमध्ये वातावरण बदलामुळे ‘व्हायरल’ची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:57 IST

डिसेंबरनंतर ओसरलेल्या थंडीमुळे वातावरण बदल होत असतानाच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला. महिनाभरापासून अशा आजारांचे रुग्ण उपचार घेत असतानाच फेब्रुवारी उजाडल्यापासून पुन्हा वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णांमध्ये भर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाल रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, न्युमोनिया, अतिसार, ब्रॉन्क्युलायटिसचे आजार असलेले रुग्णांची गर्दी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : डिसेंबरनंतर ओसरलेल्या थंडीमुळे वातावरण बदल होत असतानाच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला. महिनाभरापासून अशा आजारांचे रुग्ण उपचार घेत असतानाच फेब्रुवारी उजाडल्यापासून पुन्हा वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णांमध्ये भर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाल रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, न्युमोनिया, अतिसार, ब्रॉन्क्युलायटिसचे आजार असलेले रुग्णांची गर्दी झाली आहे.काही बालकांमध्ये सर्दी, खोकला आढळून आला असून, असे आजार आपोआप मुदतपूर्ण करताच बरे होतात. मात्र, प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आजारी व्यक्तींशी संपर्क टाळावा. आजारी व्यक्तीने थुंकू नये, बालकांना गर्दीच्या ठिकाणांपासून टाळले पाहिजे तरच हा आजार नियंत्रणात राहून गुंतागुंतीचा होणार नाही, असे सांगण्यात आले. तीव्र श्वसनदाह असलेल्या बालकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असून, श्वासाची गती वाढते, ताप येतो, चिडचिडेपणा अशी लक्षणे आढळून येतात. या आजारावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे महत्त्वाचे ठरते.न्युमोनियाचेही काही रुग्ण आढळले असून, फुफ्फुसावर परिणाम करणारा गंभीर आणि गुंतागुंतीचा आजार आहे. मात्र, अशा वेळी रुग्णाला आत्मविश्वासाने हाताळले तर हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. ताप आला तर घाबरायचे नाही. ओल्या कपड्याने पुसणे, तापेचे औषध देणे, वरण-भात, मूगदाळ खिचडीच्या माध्यमातून पोषण करणे, बाळाचे स्तनपान सुरु ठेवणे, स्वच्छ, शुध्द पाणी पिण्यास वापरणे महत्त्वाचे ठरते, जुलाब असणाºया रुग्णांसाठी स्वच्छ पाणी गाळलेले असावे. ओआरएसचा वापर करावा. ज्यामुळे रुग्णांना आधार होईल, असेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.महिनाभरापासून व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पालकांनी न घाबरता वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करुन घ्यावा. अँटीबायोटिकचा आग्रह न करता तापेसारखे आजार पाच दिवस गृहीत धरले पाहिजेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला कांजण्या, गोवर, गालफुगीच्या रुग्णांची वाढ होत आहे.- डॉ. संजय जानवळेबालरोगतज्ज्ञ