शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

अतिक्रमणांमुळे वाहतूकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:32 IST

बीड : शहरातील जालना रोडवर सध्या सर्वत्र अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. बीड पालिकेकडून मागील ...

बीड : शहरातील जालना रोडवर सध्या सर्वत्र अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. बीड पालिकेकडून मागील अनेक महिन्यांपासून यावर कसलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर तात्काळ कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

महावितरण कार्यालय परिसरात घाण

बीड : शहरातील महावितरण विभागाच्या माळीवेस भागातील उपविभागीय कार्यालय परिसरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास येथील कर्मचारी व विविध कामांसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

प्रशिक्षण केंद्रासमोर

रिक्षा पार्किंग

बीड : आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक अनधिकृतपणे पार्किंग करीत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वाहतूक शाखा पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

पोलिसांसमोरच

अवैध वाहतूक

बीड : शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका या भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोरच अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षा, जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

चोऱ्या वाढल्याने गस्तीची गरज

वडवणी : गाडीतील पेट्रोल, बॅटरी, पाण्याची मोटार, पाईप, वायर अशा कंपाऊंडमधील वस्तुंच्या चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. तालुका व शहर परिसरातील विविध भागात साहित्याच्या सर्रास चोऱ्या होत आहेत. या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारक त्रस्त

शिरूर कासार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. समोरून एखादे वाहन गेल्यास दुचाकी चालकांना समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघातात वाढ होत आहे. धूळ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांचे वीज बील माफ करा

बीड : कोरोनामुळे शेतकरी, शेतमजूर यांचे नुकसान झालेले आहे. अशातच सक्तीची वीज बिल वसुली सुरू आहे. ही वसुली थांबवावी व वीज बिल माफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे, परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असून, वीज थकबाकीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडली जात असून, यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. यामुळे पिके वाळू लागली आहेत.

अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक

अंबाजोगाई : शहरातील अंतर्गत रस्ते अतिशय अरूंद असतानाही दिवसा शहरातील रस्त्यावरून जड वाहतूक होत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. शहरातील मंडीबाजार, गुरूवारपेठ या परिसरात मोठी वाहने व जड वाहने सातत्याने येत जात असल्याने याचा मोठा त्रास नागरिकांना निमूटपणे सहन करावा लागतो. वाहतुकीच्या वाढत्या कोंडीमुळे या परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसतो. अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक रात्रीच्या वेळी करावी, अशी मागणी व्यापारी सुनील जाधव यांनी केली.