शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

एकता मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:36 IST

शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य नगरी,मानूर येथे तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचा समारोप गुरुवारी उत्साहात झाला. ...

शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य नगरी,मानूर येथे तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचा समारोप गुरुवारी उत्साहात झाला. दोन दिवसांच्या या संमेलनामुळे साहित्यप्रेमी रसिकांना आणि तालुक्यातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.

कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षण या विषयावरील परिसंवादात प्रा.डॉ.सुधीर येवले आणि विषयतज्ज्ञ संध्या कुलकर्णी यांनी विचार मांडले . त्यानंतर ग्रामीण कथाकार भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन कार्यक्रमात संगिता होळकर-औटी यांच्यासह बालकथाकार पूजा सुरसे,ऋतुजा खेडकर,सोफियान पठाण यांनी सहभाग घेतला. दुपारी महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात शाहीर अनिलसिंह तिवारी आणि नकलाकार घोडके यांनी चांगलीच धमाल उडवून दिली. तर रेणुका विद्यालय,मानूर,घाटशिळा विद्यालय,घाटशीळ पारगाव,दहिफळे वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर नेले.

नवोदित आणि अनुभवी कवींनी एकाहुन एक कविता सादर करून कवी संमेलनात रंगत आणली. अध्यक्ष कवी माधव सावंत हे होते. लक्ष्मण खेडकर,प्रा.डॉ.अशोक घोळवे,श्रावण गिरी,दिपक महाले,संदीप काळे,प्रा.डॉ.विठ्ठल जाधव,सुरेखा येवले,युवराज वायभासे,श्रीराम गिरी,केशव कुकडे,इम्रान शेख,मनिषा लबडे,जया कुलथे,देविदास शिंदे,अविनाश बुटे,अजिनाथ ठोंबरे,द.ल.वारे,महेश मगर,भाऊसाहेब नेटके,सुनिल केकाण,सचिन अभंग,राजेंद्र लाड,संगीता होळकर,मधुकर केदार,राहुल ससाणे,निलेश दौंड,अण्णासाहेब तहकिक,शहादेव सुरासे,संध्याराणी कोल्हे,नानासाहेब खरात,शहारुख लखाणे,संजय राठोड,सानिका खेडकर,आकांक्षा सोनवणे,अनघा कुलकर्णी,संस्कृती बडे यांनी आपल्या कविता सादर केल्या. सूत्रसंचलन के.बी.शेख यांनी केले.

साहित्य संमेलनातील ठराव

संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेत अनिवार्यपणे करणे,शासकीय कार्यालयातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी मराठी भाषेतच आपली स्वाक्षरी करणे,भाषा संवर्धनासाठी वरीष्ठ स्तरावरून विविध उपक्रमांचे आयोजन करणे,मानूर येथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा असलेल्या शिल्पकृतीचे पुरातत्व विभागाने संवर्धन करणे,सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने शिरुर शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांना आणि उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाणपोईची उभारणी करणे असे पाच ठराव मंजूर करण्यात आले.

‘ अंतरीचे धावे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कवीसंमेलन सत्रात प्रसिद्ध कवी श्रावण गिरी यांच्या अंतरीचे धावे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन टिचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी कवीसंमेलनाध्यक्ष माधव सावंत,ग्रामीण कथाकार भास्कर बडे,अनंत कराड,गोकुळ पवार यांची उपस्थिती होती.