शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

एकता मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:36 IST

शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य नगरी,मानूर येथे तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचा समारोप गुरुवारी उत्साहात झाला. ...

शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य नगरी,मानूर येथे तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचा समारोप गुरुवारी उत्साहात झाला. दोन दिवसांच्या या संमेलनामुळे साहित्यप्रेमी रसिकांना आणि तालुक्यातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.

कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षण या विषयावरील परिसंवादात प्रा.डॉ.सुधीर येवले आणि विषयतज्ज्ञ संध्या कुलकर्णी यांनी विचार मांडले . त्यानंतर ग्रामीण कथाकार भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन कार्यक्रमात संगिता होळकर-औटी यांच्यासह बालकथाकार पूजा सुरसे,ऋतुजा खेडकर,सोफियान पठाण यांनी सहभाग घेतला. दुपारी महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात शाहीर अनिलसिंह तिवारी आणि नकलाकार घोडके यांनी चांगलीच धमाल उडवून दिली. तर रेणुका विद्यालय,मानूर,घाटशिळा विद्यालय,घाटशीळ पारगाव,दहिफळे वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर नेले.

नवोदित आणि अनुभवी कवींनी एकाहुन एक कविता सादर करून कवी संमेलनात रंगत आणली. अध्यक्ष कवी माधव सावंत हे होते. लक्ष्मण खेडकर,प्रा.डॉ.अशोक घोळवे,श्रावण गिरी,दिपक महाले,संदीप काळे,प्रा.डॉ.विठ्ठल जाधव,सुरेखा येवले,युवराज वायभासे,श्रीराम गिरी,केशव कुकडे,इम्रान शेख,मनिषा लबडे,जया कुलथे,देविदास शिंदे,अविनाश बुटे,अजिनाथ ठोंबरे,द.ल.वारे,महेश मगर,भाऊसाहेब नेटके,सुनिल केकाण,सचिन अभंग,राजेंद्र लाड,संगीता होळकर,मधुकर केदार,राहुल ससाणे,निलेश दौंड,अण्णासाहेब तहकिक,शहादेव सुरासे,संध्याराणी कोल्हे,नानासाहेब खरात,शहारुख लखाणे,संजय राठोड,सानिका खेडकर,आकांक्षा सोनवणे,अनघा कुलकर्णी,संस्कृती बडे यांनी आपल्या कविता सादर केल्या. सूत्रसंचलन के.बी.शेख यांनी केले.

साहित्य संमेलनातील ठराव

संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेत अनिवार्यपणे करणे,शासकीय कार्यालयातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी मराठी भाषेतच आपली स्वाक्षरी करणे,भाषा संवर्धनासाठी वरीष्ठ स्तरावरून विविध उपक्रमांचे आयोजन करणे,मानूर येथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा असलेल्या शिल्पकृतीचे पुरातत्व विभागाने संवर्धन करणे,सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने शिरुर शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांना आणि उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाणपोईची उभारणी करणे असे पाच ठराव मंजूर करण्यात आले.

‘ अंतरीचे धावे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कवीसंमेलन सत्रात प्रसिद्ध कवी श्रावण गिरी यांच्या अंतरीचे धावे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन टिचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी कवीसंमेलनाध्यक्ष माधव सावंत,ग्रामीण कथाकार भास्कर बडे,अनंत कराड,गोकुळ पवार यांची उपस्थिती होती.