शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कड्यात अतिक्रमणांमुळे बाजारपेठेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

कडा : आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या कडा गावामध्ये धामणगाव रस्त्यावर अतिक्रमणांमुळे बाजारपेठेचे ...

कडा : आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या कडा गावामध्ये धामणगाव रस्त्यावर अतिक्रमणांमुळे बाजारपेठेचे वाटोळे होऊ लागले आहे. अनेकांनी रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतच अतिक्रमण केल्यामुळे रस्त्यावर वारंवार अपघात होत असून, अनेकांनी जीव गमावले आहेत तर वाहनांच्या होणाऱ्या गर्दीमुळे सतत ट्रॅफिक जामचा फटका येणाऱ्या-जाणाऱ्यांना बसत आहे. कडा गावातून जात असलेल्या अमरापूर - कर्जत रस्त्याचे काम सुरू गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र धामणगाव रस्त्यावर अतिक्रमणामुळे रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. कडा येथे आष्टी तालुक्यातील एकमेव असलेली सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असून, याच रस्त्यावर बैल बाजार, शेळ्यांचा बाजार, कांदा तसेच धान्याची अडत दुकाने आहेत. यामुळे कड्यामध्ये आष्टी, पाटोदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शिरूर, करमाळा, पैठण इत्यादी तालुक्यामधून कांद्याची आवक आठवड्यातून तीन वेळा होते. त्यामुळे गर्दीचे शहर म्हणून कडा गाव ओळखले जाते. शिवाय कडा येथे बैलांचा व गाईंचा मोठा बाजार भरत असल्याने रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र धामणगाव रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत रस्त्यावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमणे केल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच अरुंद रस्त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

कडामार्गे अमरापूर, पाथर्डी, मिरजगाव, कर्जत हा महामार्ग जाणार आहे. गावातून जाणाऱ्या या रस्त्यामुळे मार्केट यार्ड ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान रस्त्याचे सुमारे तीस मीटर एवढे रुंदीकरण होणार आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अमरापूर ते कर्जतदरम्यान हा रस्ता होणार आहे. औरंगाबाद ते बारामतीदरम्यानचा प्रवास या रस्त्याच्या कामामुळे सुखकर होणार आहे. जामखेड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नियंत्रणात हे काम सुरू आहे. अमरापूर ते कडादरम्यान रस्ता रुंदीकरणाची तयारी झाली आहे. आता गावातील रस्त्यांची मोजणी झाली आहे. त्यानुसार रस्त्याच्या कडेला असणारी काही बांधकामे मात्र त्यामुळे पाडावी लागणार आहेत. रस्ता सिमेंटचा आणि विस्तारित होणार असल्याने कडा गावासाठी याचा भविष्यात फायदा होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीत बांधकाम करणाऱ्या दुकानदारांना काही दिवसांपूर्वी जामखेड सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

आष्टी तालुक्यातील कड्याची बाजारपेठ महत्त्वाची असून, तालुक्यातील शंभराच्या जवळपास गावांचा दैनंदिन संपर्क असतो. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने नेहमी वर्दळ असते. त्यामुळे अतिक्रमण काढल्याने शहराच्या वैभवात भर पडेल असे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.

===Photopath===

200621\20bed_7_20062021_14.jpg