शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

खाद्यतेलाने महागाईत तेल ओतले, बिनभाजीची फोडणी कशी द्यायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:34 IST

मागील वर्षी २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यातील खाद्यतेलाचे दर मार्चमध्ये लिटरमागे दहा ते पंधरा रूपयांनी उतरले. मात्र त्यानंतर तेलाचे भाव ...

मागील वर्षी २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यातील खाद्यतेलाचे दर मार्चमध्ये लिटरमागे दहा ते पंधरा रूपयांनी उतरले. मात्र त्यानंतर तेलाचे भाव कधी २ तर कधी ५ रूपये लिटरने टप्प्या टप्प्याने वाढत गेले. संथगतीने दरवाढ सुरूच होती. ऑक्टोबर- नोव्हेंबरदरम्यान लिटरमागे १० ते २५ रूपयांची वाढ झाली. दिवाळीनंतर खाद्यतेलाचे भाव उतरतील अशी व्यापारी व ग्राहकंची अपेक्षा फोल ठरली. अनपेक्षितपणे तेलदराचा भडका सुरू राहिला. खद्यतेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून महिन्याच्या बजेटवर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.

खायला चुकणार नाही

खाद्यतेलाचे भाव वाढले असलेतरी खायला चुकणार कसे? दैनंदिन जीवनात तेल आवश्यक बनले आहे. महिन्याला खरेदीचे प्रमाण कमी केले तरी गरजेच्या वेळी वापरासाठी अतिरिक्त खरेदी करावीच लागते. बिनफोडणीची भाजी कोणती करावी? केली तर सर्वांना आवडेल असे नाही. -- कंचन खिंवसरा, बीड

--------

कितीही दरवाढ झाली तरी साखर, मीठ, तेल अत्यावश्यक आहे. पालेभाज्यांसाठी कमी प्रमाणात तेल वापरता येईल मात्र इतर भाज्यांना तेल थोडे जास्तच लागते. प्रती माणसी महिन्याला अर्धा किलो तेल आश्यक असलेतरी अगदी काटेकोर प्रमाण धरून संसार कसा चालेल? - अयोध्या पाटील, बीड.

------------

खाद्यतेलाचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असलेतरी त्या सहनशील असतात. रोजच्या स्वयंपाकात तेल अत्यावश्यक आहेत. खरेदी करताना तेलाऐवजी इतर वस्तुंचे प्रमाण कमी करावे लागते. यातून आर्थिक ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करतो पण तेल खूपच महागले आहे. - जया खेडकर, बीड.

----------

खाद्यतेलाचे दर (प्रति लिटर) २०२०

पाम ८५, सोयाबीन ९०, सूर्यफूल ९५, सरकी ८८, शेंगदाणा १३०, करडी १४०

खाद्यतेलाचे दर (प्रति लिटर) २०२१

पाम १२५ , सोयाबीन १४०, सूर्यफूल १७०, सरकी १३८, शेंगदाणा १७५, करडी २००

----

सूर्यफूल तेजीत येताच सोया, पामतेल वधारल

ऑक्टोबरमध्ये सूर्यफूल तेलाचे भाव भडकताच सोयाबीन अणि पामतेलाचे दर तेजीत आले. गतवर्षीच्या तुलनेत सर्यफूल तेलात लिटरमागे ८५ रूपयांची वाढ झाली. तर करडीचे तेल ६० रूपयांनी वधारले.

------

सूर्यफूल तेल आयातीवर अवलंबून आहे. युक्रेन, रशियात उत्पादन ५० टक्क्यांपर्यंतच झाले आहे. तर भारतात आयात शुल्क वाढल्याने तेजी आली. परिणामी स्थानिक तेलही महाग झाले. तेलाचे भाव ४० ते ८० रूपयांपर्यंत वाढले असलेतरी विक्रीवर परिणाम झालेला नाही. भाव ऐकताच ग्राहक प्रथमदर्शनी घेत नाही, मात्र भावाबाबत खात्री पटल्यानंतर खरेदी करतो. - गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी

--------