शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

खाद्यतेलाची उसळी, शेंगदाण्याची उडी, शेवगा उतरला, डाळिंब चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता.///////////////////////////////))))) किराणा बाजारात शांतता : टोमॅटो ...

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता.///////////////////////////////)))))

किराणा बाजारात शांतता : टोमॅटो १०, तर कोबी ५ रुपये किलो

बीड : बजेटनंतर खाद्यतेलाचे भाव नियंत्रणात राहतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा बजेट जाहीर झाल्यानंतर फोल ठरली. सरत्या आठवड्यात खाद्यतेलाच्या दराने किरकोळ घसरणीनंतर पुन्हा उसळी मारल्याने सर्वसामान्यांसाठी फोडणी महाग बनलेली आहे. भाजी बाजारात आवक समाधानकारक असल्याने भाज्यांचे दर सर्वसाधारणच होते. फळांच्या बाजारात मात्र डाळिंबाने चांगलाच भाव खाल्ला असून, त्याची विक्री २०० रुपये किलो दराने केली जात आहे.

संक्रांतीपासून किराणा बाजारात ग्राहकी शांतच आहे. खाद्यतेल, शेंगदाणे, गहू आणि तांदळात तेजीचे वारे होते, तर डाळींचे भाव स्थिर होते. साखर, गुळाचे भाव समान ३५ रुपये किलो होते. कोलम आणि बासमती तांदळाचे भाव किलाेमागे ५ ते १० रुपयांनी वधारले. सुकामेव्याला ग्राहकी नव्हती. नवा गहू येण्यास अवधी आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने गव्हाच्या दरात क्विंटलमागे १५० रुपयांची वाढ झाली आहे.

फळांच्या बाजारात कलिंगड, खरबूज, तसेच आंब्यांची आवक होत आहे. काश्मीरच्या डिलक्शन सफरचंदाची आवक घटल्याने सध्या परदेशी सफरचंदाची आवक सुरू आहे. तासगाव, सोलापूर भागातून द्राक्षांची आवक वाढत आहे. अननसालाही चांगली मागणी आहे. थंडीमुळे भेंडीला फटका बसल्याने उगवण कमी झाल्याने आवक घटली आहे. मात्र, शेवग्याची मोठी आवक होत आहे. टोमॅटो, कांदे, बटाट्यांचे भाव साधारण आहेत. उन्हामुळे कोथिंबीर पिवळी पडत असून, भाव तेजीत आहेत. लिंबाची मागणी असली तरी आवक कमी असल्याने भाव वधारले आहेत. भाजी, किराणा आणि फळ बाजारात मात्र ग्राहकी साधारणच होती.

------

तेलाचा भडका सुरूच

एक लिटर सूर्यफूल तेल १३५ वरून ५ रुपयांनी घटले व पुन्हा १० रुपयांनी वाढले. सोयाबीन तेल १२५ वरून ७ रुपयांनी कमी झाले व पुन्हा १२ रुपयांनी वाढले. शेंगदाणे १० रुपयांनी वाढले, भाव ११० रुपये होता. गहू २,७५० रुपये झाला. कोलम तांदळाचे भाव किलोमागे १० रुपये, तर बासमती तांदूळ ५ ते १० रुपयांनी वधारला.

----

कोथिंबीर, लिंबू तेजीकडे

कोथिंबिरीचा भाव एक रुपयावरून अडीच रुपये झाला, तर एक रुपयाचा लिंबू २ रुपयांना मिळत आहे. आवक वाढल्याने शेवग्याचे भाव ३० ते ४० रुपये किलोे होते. कांदे ३०, तर बटाटे २० रुपये किलो होते. कोबी ५ रुपये, भेंडी ४०, दोडके आणि वांगी ३० रुपये किलो होते. मटार शेंग ३० रुपये, तर गाजराचे भाव ४० रुपये किलो होते.

------

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता./////////////////////////////// मोसंबी ६०, तर द्राक्ष ७० ते ८० रुपये किलो होते. लालबाग, बदाम आंबे १५० रुपये किलो होते. पपईचा भाव मात्र १० रुपये किलो होता. परदेशी सफरचंद १५० ते १८० रुपये होते.

---------------

कुठलेही सामाजिक कार्यक्रम, सप्ताह, तिथी नसल्याने किराणा बाजारात केवळ महिनावारीचे ग्राहक आहे. उठाव कमी आहे.

-गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी

-------

भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने भाव कमीच आहेत. फक्त भेंडी, हिरवी मिरचीचे भाव वाढले, बाकी सर्व स्वस्त आहेत. -कैलास काळे, भाजी विक्रेता

----

डाळिंबाची आवक अत्यंत कमी व मागणी जास्त असल्याने कॅरेटचे भाव जास्त आहेत. अन्य फळांची आवक साधारण आहे. कलिंगड, खरबुजाला मागणी कमी आहे.

-एकबाल बागवान, फळविक्रेता