शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

खाद्यतेलाची उसळी, शेंगदाण्याची उडी, शेवगा उतरला, डाळिंब चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता.///////////////////////////////))))) किराणा बाजारात शांतता : टोमॅटो ...

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता.///////////////////////////////)))))

किराणा बाजारात शांतता : टोमॅटो १०, तर कोबी ५ रुपये किलो

बीड : बजेटनंतर खाद्यतेलाचे भाव नियंत्रणात राहतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा बजेट जाहीर झाल्यानंतर फोल ठरली. सरत्या आठवड्यात खाद्यतेलाच्या दराने किरकोळ घसरणीनंतर पुन्हा उसळी मारल्याने सर्वसामान्यांसाठी फोडणी महाग बनलेली आहे. भाजी बाजारात आवक समाधानकारक असल्याने भाज्यांचे दर सर्वसाधारणच होते. फळांच्या बाजारात मात्र डाळिंबाने चांगलाच भाव खाल्ला असून, त्याची विक्री २०० रुपये किलो दराने केली जात आहे.

संक्रांतीपासून किराणा बाजारात ग्राहकी शांतच आहे. खाद्यतेल, शेंगदाणे, गहू आणि तांदळात तेजीचे वारे होते, तर डाळींचे भाव स्थिर होते. साखर, गुळाचे भाव समान ३५ रुपये किलो होते. कोलम आणि बासमती तांदळाचे भाव किलाेमागे ५ ते १० रुपयांनी वधारले. सुकामेव्याला ग्राहकी नव्हती. नवा गहू येण्यास अवधी आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने गव्हाच्या दरात क्विंटलमागे १५० रुपयांची वाढ झाली आहे.

फळांच्या बाजारात कलिंगड, खरबूज, तसेच आंब्यांची आवक होत आहे. काश्मीरच्या डिलक्शन सफरचंदाची आवक घटल्याने सध्या परदेशी सफरचंदाची आवक सुरू आहे. तासगाव, सोलापूर भागातून द्राक्षांची आवक वाढत आहे. अननसालाही चांगली मागणी आहे. थंडीमुळे भेंडीला फटका बसल्याने उगवण कमी झाल्याने आवक घटली आहे. मात्र, शेवग्याची मोठी आवक होत आहे. टोमॅटो, कांदे, बटाट्यांचे भाव साधारण आहेत. उन्हामुळे कोथिंबीर पिवळी पडत असून, भाव तेजीत आहेत. लिंबाची मागणी असली तरी आवक कमी असल्याने भाव वधारले आहेत. भाजी, किराणा आणि फळ बाजारात मात्र ग्राहकी साधारणच होती.

------

तेलाचा भडका सुरूच

एक लिटर सूर्यफूल तेल १३५ वरून ५ रुपयांनी घटले व पुन्हा १० रुपयांनी वाढले. सोयाबीन तेल १२५ वरून ७ रुपयांनी कमी झाले व पुन्हा १२ रुपयांनी वाढले. शेंगदाणे १० रुपयांनी वाढले, भाव ११० रुपये होता. गहू २,७५० रुपये झाला. कोलम तांदळाचे भाव किलोमागे १० रुपये, तर बासमती तांदूळ ५ ते १० रुपयांनी वधारला.

----

कोथिंबीर, लिंबू तेजीकडे

कोथिंबिरीचा भाव एक रुपयावरून अडीच रुपये झाला, तर एक रुपयाचा लिंबू २ रुपयांना मिळत आहे. आवक वाढल्याने शेवग्याचे भाव ३० ते ४० रुपये किलोे होते. कांदे ३०, तर बटाटे २० रुपये किलो होते. कोबी ५ रुपये, भेंडी ४०, दोडके आणि वांगी ३० रुपये किलो होते. मटार शेंग ३० रुपये, तर गाजराचे भाव ४० रुपये किलो होते.

------

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता./////////////////////////////// मोसंबी ६०, तर द्राक्ष ७० ते ८० रुपये किलो होते. लालबाग, बदाम आंबे १५० रुपये किलो होते. पपईचा भाव मात्र १० रुपये किलो होता. परदेशी सफरचंद १५० ते १८० रुपये होते.

---------------

कुठलेही सामाजिक कार्यक्रम, सप्ताह, तिथी नसल्याने किराणा बाजारात केवळ महिनावारीचे ग्राहक आहे. उठाव कमी आहे.

-गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी

-------

भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने भाव कमीच आहेत. फक्त भेंडी, हिरवी मिरचीचे भाव वाढले, बाकी सर्व स्वस्त आहेत. -कैलास काळे, भाजी विक्रेता

----

डाळिंबाची आवक अत्यंत कमी व मागणी जास्त असल्याने कॅरेटचे भाव जास्त आहेत. अन्य फळांची आवक साधारण आहे. कलिंगड, खरबुजाला मागणी कमी आहे.

-एकबाल बागवान, फळविक्रेता