शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
“या अधिवेशनात...”; विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी
3
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
4
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
5
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
6
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
7
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
8
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
9
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
10
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
11
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
12
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
13
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
14
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
15
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
16
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
17
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
18
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
19
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
20
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाची उसळी, शेंगदाण्याची उडी, शेवगा उतरला, डाळिंब चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता.///////////////////////////////))))) किराणा बाजारात शांतता : टोमॅटो ...

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता.///////////////////////////////)))))

किराणा बाजारात शांतता : टोमॅटो १०, तर कोबी ५ रुपये किलो

बीड : बजेटनंतर खाद्यतेलाचे भाव नियंत्रणात राहतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा बजेट जाहीर झाल्यानंतर फोल ठरली. सरत्या आठवड्यात खाद्यतेलाच्या दराने किरकोळ घसरणीनंतर पुन्हा उसळी मारल्याने सर्वसामान्यांसाठी फोडणी महाग बनलेली आहे. भाजी बाजारात आवक समाधानकारक असल्याने भाज्यांचे दर सर्वसाधारणच होते. फळांच्या बाजारात मात्र डाळिंबाने चांगलाच भाव खाल्ला असून, त्याची विक्री २०० रुपये किलो दराने केली जात आहे.

संक्रांतीपासून किराणा बाजारात ग्राहकी शांतच आहे. खाद्यतेल, शेंगदाणे, गहू आणि तांदळात तेजीचे वारे होते, तर डाळींचे भाव स्थिर होते. साखर, गुळाचे भाव समान ३५ रुपये किलो होते. कोलम आणि बासमती तांदळाचे भाव किलाेमागे ५ ते १० रुपयांनी वधारले. सुकामेव्याला ग्राहकी नव्हती. नवा गहू येण्यास अवधी आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने गव्हाच्या दरात क्विंटलमागे १५० रुपयांची वाढ झाली आहे.

फळांच्या बाजारात कलिंगड, खरबूज, तसेच आंब्यांची आवक होत आहे. काश्मीरच्या डिलक्शन सफरचंदाची आवक घटल्याने सध्या परदेशी सफरचंदाची आवक सुरू आहे. तासगाव, सोलापूर भागातून द्राक्षांची आवक वाढत आहे. अननसालाही चांगली मागणी आहे. थंडीमुळे भेंडीला फटका बसल्याने उगवण कमी झाल्याने आवक घटली आहे. मात्र, शेवग्याची मोठी आवक होत आहे. टोमॅटो, कांदे, बटाट्यांचे भाव साधारण आहेत. उन्हामुळे कोथिंबीर पिवळी पडत असून, भाव तेजीत आहेत. लिंबाची मागणी असली तरी आवक कमी असल्याने भाव वधारले आहेत. भाजी, किराणा आणि फळ बाजारात मात्र ग्राहकी साधारणच होती.

------

तेलाचा भडका सुरूच

एक लिटर सूर्यफूल तेल १३५ वरून ५ रुपयांनी घटले व पुन्हा १० रुपयांनी वाढले. सोयाबीन तेल १२५ वरून ७ रुपयांनी कमी झाले व पुन्हा १२ रुपयांनी वाढले. शेंगदाणे १० रुपयांनी वाढले, भाव ११० रुपये होता. गहू २,७५० रुपये झाला. कोलम तांदळाचे भाव किलोमागे १० रुपये, तर बासमती तांदूळ ५ ते १० रुपयांनी वधारला.

----

कोथिंबीर, लिंबू तेजीकडे

कोथिंबिरीचा भाव एक रुपयावरून अडीच रुपये झाला, तर एक रुपयाचा लिंबू २ रुपयांना मिळत आहे. आवक वाढल्याने शेवग्याचे भाव ३० ते ४० रुपये किलोे होते. कांदे ३०, तर बटाटे २० रुपये किलो होते. कोबी ५ रुपये, भेंडी ४०, दोडके आणि वांगी ३० रुपये किलो होते. मटार शेंग ३० रुपये, तर गाजराचे भाव ४० रुपये किलो होते.

------

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता./////////////////////////////// मोसंबी ६०, तर द्राक्ष ७० ते ८० रुपये किलो होते. लालबाग, बदाम आंबे १५० रुपये किलो होते. पपईचा भाव मात्र १० रुपये किलो होता. परदेशी सफरचंद १५० ते १८० रुपये होते.

---------------

कुठलेही सामाजिक कार्यक्रम, सप्ताह, तिथी नसल्याने किराणा बाजारात केवळ महिनावारीचे ग्राहक आहे. उठाव कमी आहे.

-गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी

-------

भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने भाव कमीच आहेत. फक्त भेंडी, हिरवी मिरचीचे भाव वाढले, बाकी सर्व स्वस्त आहेत. -कैलास काळे, भाजी विक्रेता

----

डाळिंबाची आवक अत्यंत कमी व मागणी जास्त असल्याने कॅरेटचे भाव जास्त आहेत. अन्य फळांची आवक साधारण आहे. कलिंगड, खरबुजाला मागणी कमी आहे.

-एकबाल बागवान, फळविक्रेता