शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

खाद्यतेलाची उसळी, शेंगदाण्याची उडी, शेवगा उतरला, डाळिंब चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता.///////////////////////////////))))) किराणा बाजारात शांतता : टोमॅटो ...

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता.///////////////////////////////)))))

किराणा बाजारात शांतता : टोमॅटो १०, तर कोबी ५ रुपये किलो

बीड : बजेटनंतर खाद्यतेलाचे भाव नियंत्रणात राहतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा बजेट जाहीर झाल्यानंतर फोल ठरली. सरत्या आठवड्यात खाद्यतेलाच्या दराने किरकोळ घसरणीनंतर पुन्हा उसळी मारल्याने सर्वसामान्यांसाठी फोडणी महाग बनलेली आहे. भाजी बाजारात आवक समाधानकारक असल्याने भाज्यांचे दर सर्वसाधारणच होते. फळांच्या बाजारात मात्र डाळिंबाने चांगलाच भाव खाल्ला असून, त्याची विक्री २०० रुपये किलो दराने केली जात आहे.

संक्रांतीपासून किराणा बाजारात ग्राहकी शांतच आहे. खाद्यतेल, शेंगदाणे, गहू आणि तांदळात तेजीचे वारे होते, तर डाळींचे भाव स्थिर होते. साखर, गुळाचे भाव समान ३५ रुपये किलो होते. कोलम आणि बासमती तांदळाचे भाव किलाेमागे ५ ते १० रुपयांनी वधारले. सुकामेव्याला ग्राहकी नव्हती. नवा गहू येण्यास अवधी आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने गव्हाच्या दरात क्विंटलमागे १५० रुपयांची वाढ झाली आहे.

फळांच्या बाजारात कलिंगड, खरबूज, तसेच आंब्यांची आवक होत आहे. काश्मीरच्या डिलक्शन सफरचंदाची आवक घटल्याने सध्या परदेशी सफरचंदाची आवक सुरू आहे. तासगाव, सोलापूर भागातून द्राक्षांची आवक वाढत आहे. अननसालाही चांगली मागणी आहे. थंडीमुळे भेंडीला फटका बसल्याने उगवण कमी झाल्याने आवक घटली आहे. मात्र, शेवग्याची मोठी आवक होत आहे. टोमॅटो, कांदे, बटाट्यांचे भाव साधारण आहेत. उन्हामुळे कोथिंबीर पिवळी पडत असून, भाव तेजीत आहेत. लिंबाची मागणी असली तरी आवक कमी असल्याने भाव वधारले आहेत. भाजी, किराणा आणि फळ बाजारात मात्र ग्राहकी साधारणच होती.

------

तेलाचा भडका सुरूच

एक लिटर सूर्यफूल तेल १३५ वरून ५ रुपयांनी घटले व पुन्हा १० रुपयांनी वाढले. सोयाबीन तेल १२५ वरून ७ रुपयांनी कमी झाले व पुन्हा १२ रुपयांनी वाढले. शेंगदाणे १० रुपयांनी वाढले, भाव ११० रुपये होता. गहू २,७५० रुपये झाला. कोलम तांदळाचे भाव किलोमागे १० रुपये, तर बासमती तांदूळ ५ ते १० रुपयांनी वधारला.

----

कोथिंबीर, लिंबू तेजीकडे

कोथिंबिरीचा भाव एक रुपयावरून अडीच रुपये झाला, तर एक रुपयाचा लिंबू २ रुपयांना मिळत आहे. आवक वाढल्याने शेवग्याचे भाव ३० ते ४० रुपये किलोे होते. कांदे ३०, तर बटाटे २० रुपये किलो होते. कोबी ५ रुपये, भेंडी ४०, दोडके आणि वांगी ३० रुपये किलो होते. मटार शेंग ३० रुपये, तर गाजराचे भाव ४० रुपये किलो होते.

------

///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता./////////////////////////////// मोसंबी ६०, तर द्राक्ष ७० ते ८० रुपये किलो होते. लालबाग, बदाम आंबे १५० रुपये किलो होते. पपईचा भाव मात्र १० रुपये किलो होता. परदेशी सफरचंद १५० ते १८० रुपये होते.

---------------

कुठलेही सामाजिक कार्यक्रम, सप्ताह, तिथी नसल्याने किराणा बाजारात केवळ महिनावारीचे ग्राहक आहे. उठाव कमी आहे.

-गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी

-------

भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने भाव कमीच आहेत. फक्त भेंडी, हिरवी मिरचीचे भाव वाढले, बाकी सर्व स्वस्त आहेत. -कैलास काळे, भाजी विक्रेता

----

डाळिंबाची आवक अत्यंत कमी व मागणी जास्त असल्याने कॅरेटचे भाव जास्त आहेत. अन्य फळांची आवक साधारण आहे. कलिंगड, खरबुजाला मागणी कमी आहे.

-एकबाल बागवान, फळविक्रेता