शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

शेतकरी विरोधी धोरणांमुळेच देशात आर्थिक मंदी : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 17:28 IST

मंदी रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवावे

ठळक मुद्देपरकीय चलन मोठ्या प्रमाणात  खर्च होत आहे.

अंबाजोगाई : शासनाकडून शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण राबवीले जात असल्याने देशात आर्थिक मंदी आली आहे. ती रोखण्यासाठी शेती मालाला योग्य भाव व शेतकर्‍यांच्या हिताचे धोरण राबवीणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. राजू शेट्टी केले.

अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे मंगळवारी  आयोजीत करण्यात आलेल्या दुष्काळ मुक्तीच्या महामेळाव्यात ते बोलत होते.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोदा येथील सरपंच बाळासाहेब देशमुख होते.तर व्यासपीठावर  सत्तार शेख, जयजित शिंदे, अरूण कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, रसीका ढगे, प्रा. डॉ. प्रकाश पोकळे, अॅड. विजय जाधव, गणेश मांझे, रावसाहेब अंबानी, किशोर ढगे, किशन कदम, अनील पवार, योगेश शेळके, तालमणी उध्दवबापू आपेगावकर, अॅड. संतोष पवार होते. 

प्रास्ताविक करतांंना आपेगाव येथील शेतकरी जयजित शिंदे म्हणाले की,  आपेगाव येथील शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही म्हणून शासन- प्रशासनाने दखल घेतली नाही यामुळे  शेतकऱ्यांवर २५ किमी पायी चालण्याचा मोर्चा काढण्याची वेळ आली होती. या भागात गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर असून गुरे जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, महिला  मोठ्यासंख्येने उपस्थित होते 

रझाकार बरे म्हणण्याची वेळ पुढे बोलतांना राजू शेट्टी म्हणाले की, परदेशातून मोठ्या प्रमाणात जिवनावश्यक  वस्तू आयात  कराव्या लागत असल्याने  देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात  खर्च होत आहे. या कारणामुळे पैशाचे मुल्यांकन ढासळले असल्याने देशात आर्थिक मंदी आली आहे. विमा कंपन्याच्या माध्यमातून कंपन्याचे मालक जगवीण्याचे धोरण सरकार राबवत असल्याने त्यांच्यापेक्षा रझाकार बरे होते असे म्हणण्याचे वेळ आली असल्याची टिका शेट्टी यांनी केली. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीBeedबीडSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना