शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्या खा अन् निरोगी रहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST

बीड : नैसर्गिकरीत्या उगवलेल्या रानभाज्या या मानवी आहारात सर्रासपणे वापरल्या जात होत्या. मात्र, काळानुसार या रानभाज्यांचा वापर कमी ...

बीड : नैसर्गिकरीत्या उगवलेल्या रानभाज्या या मानवी आहारात सर्रासपणे वापरल्या जात होत्या. मात्र, काळानुसार या रानभाज्यांचा वापर कमी होत असल्याचे चित्र आहे. या रानभाज्यांमुळे अनेक प्रकारचे फायदे असून, याची ओळख व्हावी यासाठी कृषी विभागाकडून जिल्हाभरात तालुक्याच्या ठिकाणी रानभाज्यांची ओळख करून देण्यासाठी प्रदर्शन भरवले जात आहे.

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?

कुर्डूची भाजी

हे एक प्रकारचं तण असतं. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुर्डू जातीची पालेभाजी दिसू लागते. कुर्डू पालेभाजीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.

चिवळची भाजी

ही पावसाळ्यात शेतात दिसते, चिवळची भाजी खाल्ल्याने रक्तपित्तात ही भाजी प्रशस्त तर ज्वरात पथ्यकर आहे. तसेच शरीरातील उष्णता कमी करणारी व लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.

टाकळ्याची भाजी

टाकळ्याची भाजी दिसायला मेथीच्या भाजीसारखीच दिसते. रानोमाळ टाकळ्याची भाजी गवताबरोबर पसरलेली आपण पाहू शकतो. ठाणे, मुंबईच्या बाजारात मेथीच्या जुडीसारखी ही भाजी घेता येते.

पाथरीची भाजी

पाथरी शेतातील पिकांमध्ये आढळून येते. पाथरीची भाजी शेतातील जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खातात.

हादगा

हादग्याच्या झाडाची वाढ ३० फुटापर्यंत होते. त्याची फुले, शेंगाची भाजी केली जाते. फुले गुणाने थंड आहेत, त्यामुळे त्रिदोषांपैकी वातदोष कमी होण्याकरिता, तसेच कफ व पित्तदोषही साम्यावस्येत आणण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो.

या रानभाज्या झाल्या गायब

आघाडा

या भाजीमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते; ही भाजी 'पाचक' असून मूतखडा, मूळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे. आघाडा रक्तवर्धक आहे व हाडे बळकट होण्यासाठी तो खाल्ला जातो. मात्र, आहारातून ती गायब झाली आहे.

करटोली

रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी करटोली गुणकारी आहेत. या फळभाजीमध्ये खूप बिया असतात. मात्र, ही भाजी चवीला चांगली असते, मात्र भाजी करण्याची कृती माहिती नसल्याचे चित्र आहे.

शक्तिवर्धक रानभाज्या

पावसाळ्यातीन रानभाज्या या आहारात असणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या रोगांवर परिणाम होत असून, सर्व भाज्या या शक्तिवर्धक आहेत. याचीच माहिती व्हावी यासाठी जिल्हाभरात रानभाजी ओळख व पाककृती प्रदर्शन राबवले जात आहे. नागरिकांनी सहभागी व्हावे.

-दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड