शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

गोदावरीची पाणीपातळी वाढल्याने पाचांळेश्वर आणि राक्षसभुवन येथील मंदिरे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 15:43 IST

जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने गेवराई तालुक्यातील 32 गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.

ठळक मुद्दे३२ गावे १३ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

गेवराई : पैठण येथील जायकवाडी धरणातून गुरूवारी रात्री १८ दरवाजे उघडून ७५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पाचांळेश्वर येथील आत्मतिर्थ मंदिर, राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर पाण्याखाली गेले आहेत. पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने गोदावरी काठच्या गावांना प्रभारी तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने गेवराई तालुक्यातील 32 गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे तिर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त मंदिर, राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर पूर्णपणे पाण्यात गेले आहे.  पाणीपातळी अधिक झाल्यास तालुक्यातील गुंतेगावं, बोरगांव, पाथरवाला, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिपंळगावं, नागझरी, खामगाव, आगरनादुंर, पांढरी,मिरगावं,पागुळगावं, राजापुर,रामपुरी,भोगलगावं आदि गावांना पाण्याचा वेढा पडू शकतो. यामुळे या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

३२ गावे १३ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत२००६ व २००७ साली जायकवाडी धरणातुन अडिच लाख क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील ३२ गावात पुराचे पाणी घुसल्याने नागरिकाचे स्थलांतर करण्यात आले होते. पुराने हजारो हेक्टर शेतीचे व घराचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने या गावच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. मात्र तब्बल १३ वर्षानंतरही या गावांचे पुनर्वसन झाले नाही. कोणत्याही लोक प्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. यामुळे या ३२ गावातील नागरीक पावसाळ्यात जिव मुठीत घेऊन येथे राहतात. 

टॅग्स :BeedबीडTempleमंदिरgodavariगोदावरी